शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

निंबोलीच्या पुनर्वसनाला प्रशासकीय ‘ग्रहण’

By admin | Updated: December 18, 2014 23:00 IST

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले निंबोली (शेंडे) गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेले; पण अद्याप गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही़ एका तप लोटूनही पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांच्या

आर्वी : तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले निंबोली (शेंडे) गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेले; पण अद्याप गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही़ एका तप लोटूनही पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नसल्याचे दिसते़ या गावाच्या पुनर्वसनाला प्रशासकीय ग्रहण लागल्याचेच दिसते़ निंबोली (शेंडे) या गावातील परिवहन परिवहन महामंडळाची बस गत सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे या गावातील ९० शालेय मुला- मुलींना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो़ आर्वी आणि देऊरवाडा येथील शाळेत गत सहा महिन्यांपासून या विद्यार्थ्यांचा खासगी वाहनांनी धोकादायक प्रवास सुरू आहे़ हे गाव निम्न वर्धा पुनर्वसन बाधित गावात येत असून सर्व गावांचे पुनर्वसन आर्वी व लगत करण्यात आले; पण निंबोलीचे पुनर्वसन रखडले आहे़ येथील ग्रामस्थांनी आर्वी-देऊरवाडा मार्गावरील दौलतपूर मौजातील शेतजमीन पुनर्वसनासाठी मागितली होती; पण ओलिताची असल्याने संबंधित शेत मालकांनी ती जमीन पुनर्वसनासाठी देण्यास नकार दिला़ शिवाय या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली़ लाभ क्षेत्राची जमीन पुनर्वसनास देता येत नाही, असा नियम असल्याचे पुनर्वसन विभाग सांगत आहे़ मग, ही जागा या विभागाने पुनर्वसनासाठी का निवडली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ प्रशासकीय अनागोंदीत गत १२ वर्षांपासून या गावाचे पुनर्वसन रखडले आहे़ यामुळे गावात जाण्यासाठी रस्ते नाही़ यामुळे आर्वी आगाराने गत सहा महिन्यांपासून निंबोली शेंडे येथील बंद केली आहे़ या गावातील सुमारे ९० शालेय विद्यार्थी दररोज खासगी वाहनाने प्रवास करून तालुक्यातील देऊरवाडा व आर्वी येथे शिकण्यासाठी ये-जा करतात़ या वाहनाचे प्रती विद्यार्थी प्रवास भाडे देऊरवाड्यासाठी ६०० रुपये महिना तर आर्वीसाठी ७०० रुपये महिना आहे़ हा आर्थिक भुर्दंड येथील गावकरी सहा महिन्यांपासून नाहक सहन करीत आहेत़ पुनर्वसन न झाल्याने गावात कुठल्याही मूलभूत सोई-सुविधा नाहीत़ गावाचा संपूर्ण विकास रखडला आहे़ ग्रामस्थांना कामासाठी आर्वी येथे १८ किमी पायपीट करीत जावे लागते़ गावात रात्री कुणी आजारी पडले तर खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. प्रशासनाने याकडे लक्ष देत पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)