शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

पाच पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

By admin | Updated: November 29, 2014 23:24 IST

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या शनिवारी पार पडलेल्या बैठकीत सुसुंद्रा, सारवाडी, सावळी (बु.), आजनसरा व कोरा-साखरी येथील पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

वर्धा : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या शनिवारी पार पडलेल्या बैठकीत सुसुंद्रा, सारवाडी, सावळी (बु.), आजनसरा व कोरा-साखरी येथील पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच विंधन विहिरींसाठी हातपंप संच, ३२ मि.मी. व्यासाचे जी.आय. पाईप्स व सुटे भाग खरेदीसाठीच्या शिफारशीचा ठरावही मंजूर करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.समितीला असलेल्या अधिकारान्वये कारंजा तालुक्यातील सर्वाधिक तीन गावातील पाणी पुरवठा योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये सुसुंद्रा (किंमत ६२,९७, ५०० रुपये), सारवाडी (१,२४,९६,६३६ रुपये) व सावळी (बु.) (५१,८६,१२७ रुपये) या गावांसह हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा (१,४७,३९०० रुपये) व समुद्रपूर तालुक्यातील कोरा व साखरा येथे १ कोटी १३ लाख १२ हजार ४०६ रुपयांच्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेला चर्चेअंती समितीने मान्यता प्रदान केली.या बैठकीत पाणी पुरवठा कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये २०१३-१४ मध्ये ५८ पैकी पाच साध्य झाले असून उपलब्ध ८ कोटी ७२ लाख ३९ हजार रुपयांपैकी ५ कोटी ५० लाख २४ हजार रुपयांचा निधी खर्च झाल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. याबाबत उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी ५८ गावांची निवड कोणत्या निकषाद्वारे करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे होत्या. बैठकीला उपाध्यक्ष विलास कांबळे, सभापती श्यामलता अग्रवाल, मिलिंद भेंडे, वसंता पाचोडे, चेतना मानमोडे व सदस्य गोपाल कालोकर, निर्मला बिजवे, वैशाली गोमासे, मंदा चौधरी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)