शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

स्मशानभूमिकरिता प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 21:58 IST

परिसरातील आर्वी येथे स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांनी गावातच मृतदेह जाळण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देगावातच करणार होते अंत्यसंस्कार : अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभेने ठराव घेण्याच्या केल्या सूचना

आॅनलाईन लोकमतगिरड :परिसरातील आर्वी येथे स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांनी गावातच मृतदेह जाळण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रशासन व गावकऱ्यांत चर्चा झाल्याने शेवटी गावाबाहेरील ठरवुन दिलेल्या जागेवर तात्पूर्ती स्मशानभूमि देण्यात आल्याने तिथे अंतिम संस्कार करण्यात आला.काही वर्षांपुर्वी गावलगत असलेल्या शेताजवळील जागेवर येथील नागरिक अंत्यसंस्कार आटोपत होते. कालांतराने शेतमालकाने ही जागा आपल्या ताब्यात घेत येथे शेती करणे सुरू केले. यामुळे या गावात अंत्यसंस्कार करण्याकरिता जागेचा प्रश्न गंभीर झाला होता. याबाबत सबंधित प्रशासनाकडे स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र हा प्रश्न मार्गी लागलाच नाही२५ जानेवारीला येथील वृद्ध मारोती चट्टे याचा वृद्धापकाळाने मुत्यू झाला. त्यांच्याकडे शेतजमीन नसल्याने त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा हा प्रश्न गावकºयांसमोर निर्माण झाला. याच संधीचा फायदा घेत गावकऱ्यांनी संबधित प्रशासन स्मशानभूमिकरिता जो पर्यंत कायमस्वरुपी जागा उपल्बध करुन देत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करायचा नाही, अशी भूमिका घेतली. घटनेची माहिती समुद्रपूर येथील तहसीलदार दीपक करंडे यांना मिळताच ते व नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गिरडचे ठाणेदार महेंद्र ठाकुर व कर्मचाºयांसह आर्वीत दाखल झाले. सरपंच संजय राऊत, तलाठी जांभुळे, मंडळअधिकारी नागापुरे यांच्यासह बहादुरसिंग अकाली, गजानन गारघाटे, विलास नवघरे यानी गावातील नागरिकांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढत अंत्यसंस्काराकरिता तात्पुर्ती जागा उपल्बध करून देत गावाच्या बाहेर खाली जागेचे नियोजन केले. तसेच ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रशासनाकडे रितसर मागणी करून कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून देण्याची हमी तहसीलदार दीपक करंडे यांनी दिली. शेवटी प्रशासन व गावकऱ्यांमध्ये चर्चा करुण गावा बाहेरील तात्पुर्ती ठरवून दिलेल्या जागेवर वृध्दाचा अंतिम संस्कार करण्यात आला.