शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

वर्धा जिल्ह्यात रुग्ण संख्या मर्यादित ठेवण्यात प्रशासनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:19 IST

वर्धा जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. सर्वात कमी रुग्ण असलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.

ठळक मुद्देराज्यभरातून सर्वात कमी रुग्ण वर्ध्यातचप्रभावी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात मे महिन्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला. तरीही जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोनाची रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात मोठे यश मिळविले आहे. जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तेही लवकरच कोरोनामुक्त होणार असल्याचे सांगण्यात आले असून सर्वात कमी रुग्ण असलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.एका महिलेचा मृत्यू पश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली. त्यानंतर बाहेर जिल्ह्यातून वर्ध्यात राहायला किंवा उपचाराकरिता आलेल्या व्यक्तींमुळे रुग्णसंख्या ही २६ वर पोहोचली. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील १३ तर बाहेर जिल्ह्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये जिल्ह्यातील २ आणि बाहेर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. बाहेर जिल्ह्यातील सर्व रुग्ण बरे होवून आपापल्या गावी रवाना करण्यात आले. तर वर्ध्यातील ५ रुग्णांवर सध्या उपचार सुरुआहे. यामध्ये चौघांवर वर्ध्यात तर एकावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. आताही रुग्ण संख्या वाढू नयेत यासाठी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच आहे. आलेल्यांना क्वारंटाईन करणे, त्याची माहिती घेणे यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविका दिवसरात्र कार्यरत आहे.

शिथिलता अन् उपायोजनाहीलॉकडाऊनंतरच्या शिथिलतेच्या तिसऱ्या टप्प्यात जनजीवन पूर्वपदावर आले आहेत. मात्र, जिल्ह्याच्या सीमा बंद असून अंतरजिल्ह्यात दुकाने, उद्योग सुरु केले आहेत. प्रत्येक भागामध्ये नोडल अधिकारी, प्रशासन लक्ष देवून सोशल डिस्टन्सिंगसह इतरही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देवून आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझरची व्यवस्था न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने प्रारंभापासूनच प्रभावी अंमलबजावणी केल्याने वर्ध्यातील उपायोजनांची देशपातळीवर दखल घेतल्या गेली. याच उपाययोजनेमुळे कोरोनाच्या लढ्यातही वर्धा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या