शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

वर्धा जिल्ह्यात रुग्ण संख्या मर्यादित ठेवण्यात प्रशासनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:19 IST

वर्धा जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. सर्वात कमी रुग्ण असलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.

ठळक मुद्देराज्यभरातून सर्वात कमी रुग्ण वर्ध्यातचप्रभावी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात मे महिन्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला. तरीही जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोनाची रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात मोठे यश मिळविले आहे. जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तेही लवकरच कोरोनामुक्त होणार असल्याचे सांगण्यात आले असून सर्वात कमी रुग्ण असलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.एका महिलेचा मृत्यू पश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली. त्यानंतर बाहेर जिल्ह्यातून वर्ध्यात राहायला किंवा उपचाराकरिता आलेल्या व्यक्तींमुळे रुग्णसंख्या ही २६ वर पोहोचली. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील १३ तर बाहेर जिल्ह्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये जिल्ह्यातील २ आणि बाहेर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. बाहेर जिल्ह्यातील सर्व रुग्ण बरे होवून आपापल्या गावी रवाना करण्यात आले. तर वर्ध्यातील ५ रुग्णांवर सध्या उपचार सुरुआहे. यामध्ये चौघांवर वर्ध्यात तर एकावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. आताही रुग्ण संख्या वाढू नयेत यासाठी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच आहे. आलेल्यांना क्वारंटाईन करणे, त्याची माहिती घेणे यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविका दिवसरात्र कार्यरत आहे.

शिथिलता अन् उपायोजनाहीलॉकडाऊनंतरच्या शिथिलतेच्या तिसऱ्या टप्प्यात जनजीवन पूर्वपदावर आले आहेत. मात्र, जिल्ह्याच्या सीमा बंद असून अंतरजिल्ह्यात दुकाने, उद्योग सुरु केले आहेत. प्रत्येक भागामध्ये नोडल अधिकारी, प्रशासन लक्ष देवून सोशल डिस्टन्सिंगसह इतरही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देवून आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझरची व्यवस्था न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने प्रारंभापासूनच प्रभावी अंमलबजावणी केल्याने वर्ध्यातील उपायोजनांची देशपातळीवर दखल घेतल्या गेली. याच उपाययोजनेमुळे कोरोनाच्या लढ्यातही वर्धा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या