शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात साकारला ‘आदर्श’ भाजी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

शहरातील मुख्य भाजीबाजारात मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग करीता वर्ध्यातील भाजीबाजार १८ ठिकाणी हलविण्यात आला आहे. यादरम्यान महादेवपुरा परिसरात भाजीबाजार सुरु करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नव्हते.

ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी उपाययोजना : जिल्हा प्रशासनाला रोटरी क्लबची साथ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संचारबंदीच्या काळातही भाजीबाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरीही भाजीबाजारात सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन होतांना दिसून येत आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लबच्या सहकार्याने वर्ध्यातील केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आदर्श भाजीबाजार साकारण्यात आला आहे. हा भाजीबाजार शुक्रवारपासून ग्राहकांकरिता उपलब्ध होणार आहे.शहरातील मुख्य भाजीबाजारात मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग करीता वर्ध्यातील भाजीबाजार १८ ठिकाणी हलविण्यात आला आहे. यादरम्यान महादेवपुरा परिसरात भाजीबाजार सुरु करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नव्हते. त्यामुळे येथील बाजार आता शुक्रवारपासून केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावरील आदर्श भाजी बाजारत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.या करिता वर्ध्यातील रोटरी क्बलचे मोठे सहकार्य मिळाले असून महेश मोकलकर, आसिफ जाहिद, अध्यक्ष पंकज शर्मा, अमित गांधी, नितीन शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी गेल्या आठ दिवसांपासून मेहनत घेत आहे. त्यांनी बाजाराची व्यवस्था करुन दिली असून आज विभागीय आयुक्त डॉ. सजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे व तहसीलदा प्रीती डुडुलकर यांनी या भागाची पाहणी केली. तसेच आयुक्तांनी याकरिता हिरवी झेंडी दाखविली असून शुक्रवार २४ एप्रिलपासून हा आदर्श भाजीबाजार वर्धेकरांसाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत खुला राहणार आहे.भाजीबाजारातील गर्दी टाळण्याकरिता केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आदर्श भाजी बाजाराची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता रोटरी क्लबचे सहकार्य मिळाले आहे. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व उपाययोजना येथे केल्या असून या सारखेच आणखी तीन ठिकाणी भाजीबाजार तयार केले जाईल.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.असे आहे या बाजाराचे वैशिष्टया ठिकाणी तब्बल ४२ दुकांनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानांमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवण्यात आले असून येथे सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकारपणे पालन व्हावे म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. दुकानापासून काही अंतराव हिरवी नेट टाकली असून त्या ठिकाणी सामाजिक अंंतर ठेऊन ग्राहकांना बसण्याकरिता चार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर बाहेरही रकाने तयार करुन ग्राहकांना तेथे उभे ठेवण्यात येणार आहे.दुकानदारांसाठी सकाळी ७ ते दुपारी १ वाजताचा वेळ देण्यात आला आहे. महादेवपुऱ्यातील भाजीपाल्याची सर्व दुकाने या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. इंदिरा चौकाकडून असलेल्या केसरीमल शाळेच्या मोठ्या गेटमधून भाजीपाल्याची वाहने आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ७ ते ९ वाजातपर्यंत दुकाने लावायची असून ९ वाजतापासून विक्री सुरु होईल.या मैदानाला समोर दोन गेट असून या दोन्ही गेटमधून ग्राहकांना येता येणार आहे. झिकझॅक गेट तयार करण्यात आले असून तेथेच हॅण्डवॉश व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दुकानदारांना सुरक्षा किट देण्यात आली आहे. तेथील स्टेजवरुन सर्वांना वेळोवळी सूचना दिल्या जाणार आहे. या ठिकाणी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी तसेच रोटरीचे स्वयंसेवक पूर्णवेळ उपस्थित राहतील.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार