शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

बांधकाम साहित्याची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

By admin | Updated: July 23, 2014 00:09 IST

समुद्रपूर तालुक्यातील जांब येथील शांता पाटील यांच्या घरासमोरील नालीचे बांधकाम सहा महिन्यापासून रखडले होते. घराचे काम सुरू असतानाच ग्रा. पं. च्या वतीने नालीचे बांधकाम सुरू करून संबंधिताच्या

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील जांब येथील शांता पाटील यांच्या घरासमोरील नालीचे बांधकाम सहा महिन्यापासून रखडले होते. घराचे काम सुरू असतानाच ग्रा. पं. च्या वतीने नालीचे बांधकाम सुरू करून संबंधिताच्या घराच्या बांधकाम साहित्याची नासधूस करण्यात आली. यात त्यांचे बरेच नुकसान झाले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शांता पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनानुसार समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील रहिवासी शांता पाटील यांच्या घराजवळून दोन वर्षाअगोदर नालीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. पण ते काम अपूर्ण असल्यामुळे अर्धवट खोदकाम तसेच पडून आहे.काहीच दिवसांपूर्वी शांता पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू केले. त्यामुळे घरासमोर रेती, गिट्टी विटा आदी बांधकाम साहित्य ठेवले होते. त्यातच १५ जुलै रोजी जाम ग्रामपंचायतने कुठलीही पूर्वसूचना न देता तसेच दोन्ही बाजंूनी नाली न खोदता यांच्या घराजवळून जेसीपी लावून बांधकाम साहित्याची नासधूस केली. दुसऱ्या बाजुने नाली खोदण्यासाठी जागा असतानाही आपल्या वैयक्तिक आकसापोटी घराजवळून नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले व त्यासाठी त्यांच्या घरासमोर ठेवून असलेल्या बांधकाम साहित्याची नासधूस केल्याचा आरोप पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यात त्यांचे जवळपास ४०,००० हजारांचे नुकसान झाले. या नाली बांधकामामुळे पाटील यांच्या जिन्याला भेग पडली. तसेच आटोसुद्धा तुटला. तसेच सरपंच रिना जांगळेकर यांनी पाटील यांच्या मुलाशी येऊन भांडण केल्याची आटोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे जाम ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी शांता श्यामराव पाटील यांनी गटविकास अधिकारी पं.स. वर्धा आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.(शहर प्रतिनिधी)