शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य विनोबा भावे हे असामान्य प्रतिभेचे धनी होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 15:46 IST

दिनविशेष : आज १२९ वी जयंती, महिलांना आध्यात्मिक क्षेत्रात दिली नवी दिशा

दिलीप चव्हाण लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : आचार्य विनोबा भावे असामान्य प्रतिभेचे धनी होते. आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा दुवा असून, महिलांना या क्षेत्रात नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील पहिले सत्याग्रही म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी त्यांची निवड केली होती. आईला संस्कृतमधील गीता समजत नव्हती, म्हणून मराठीत गीताई लिहून आईला समर्पित केली. अशा महान विचारवंत आणि भूदान चळवळीच्या कार्यातून सामान्य गोर गरीबांच्या प्रश्नांमध्ये हात घातला. आचार्य विनोबा भावे यांची ११ सप्टेंबर रोजी १२९ वी जयंती असून, त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे. नव्या पिढीला त्यांची ओळख होणे काळाची गरज आहे. आचार्य विनोबा भावे यांना अनेक भाषा अवगत होत्या. गीता समजून घेण्यासाठी ते संस्कृत भाषा शिकले. अध्यात्माचे जेवढे अध्ययन केले, तेवढेच सामाजिक शास्त्रांचे सुद्धा. त्यांचे चिंतन केवळ शाब्दिक नव्हते, तर खऱ्या अर्थाने ते कर्मयोगाच्या कठिण साधनेतून तावून सुलाखून निघाल्याने आजही त्यांचे विचार, कार्य आणि साहित्य मानव जातीसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारे आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी म्हण प्रचलित आहे. संत विनोबा यात बरोबर बसतात. सामान्य कुटुंबातील पण संस्कारमय वातावरणात ते घडले. ते बालपणापासून हुशार होते. आई आध्यात्मिक, तर वडिलांची विज्ञानवादी विचारसरणी असली, तरी विनोबा मात्र सदैव आईचाच पक्ष घेत असे. बालवयातच ब्रम्हचारी राहण्याचा त्यांनी संकल्प केला होता. तारुण्यात शिक्षणासाठी पायपीट केली. संघर्ष करावा लागला. देशातील स्वातंत्र्य चळवळ, राष्ट्रसेवा आणि अध्यात्माची ओढ मात्र कायमच राहिली. 

महाराष्ट्र धर्म' पत्रिकेमुळे त्यांची नवीन ओळख लोकांना झाली. वयाच्या १३ व्या वर्षी ज्ञानेश्वरीचे भाषांतर वाचले. विद्यालयात शिकताना ज्ञानेश्वरी वाचून काढली, पण ती साहित्य दृष्टीने. विनोबा म्हणतात 'गांधीजींच्या सत्संगात मला गीतेचा अर्थ कळला' गीता हिंदू धर्माचा ग्रंथ असला, तरी तो सांप्रदायिक नाही, असे विनोबांना वाटत होते. विज्ञानातून विकास हा विनाशकारी ठरत आहे. आत्मज्ञानाचा अंकुश आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज जगात जी युद्ध परिस्थिती निर्माण झाली त्यावरून याची प्रचिती येते. विनोबांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती पोचमपल्ली येथील घटनेतून आणि जमिनीची पुढे भूदान ही संकल्पना अस्तित्वात आली. यासाठी तब्बल १३ वर्षे हा यज्ञ अखंड ठेवला. यात ४८ लाख एकर जमीन मिळाली. जवळपास ७० हजार किमीची पदयात्रा यासाठी करावी लागली. पवनार येथे त्यांचा परंधाम आश्रम धाम नदिच्या तिरावर आहे. आश्रमात खोदकाम करीत असतानाच श्रीरामाची मूर्ती मिळाली, तसेच अन्य काही भग्नावस्थेत मूर्ती आढळून आल्याने त्यांची पण प्राणप्रतिष्ठा केली. आश्रमात देशातील विविध भागांतून आलेल्या भगिनी असून, आध्यात्मिक स्तरावर साधनेचा प्रयोग करावा, अशी त्यांची इच्छा होती. विनोबांच्या प्रेरणेने गीताई मिशनची स्थापना केली. आश्रमाला भेट देणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यांचे विचार विज्ञान व तंत्रज्ञान युगातही दिशा देण्याचे काम करीत असल्याने आजही मोठ्या संख्येने पर्यटक आणि अभ्यासक आश्रमाला भेट देत असतात.

टॅग्स :wardha-acवर्धा