शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील आमदारांच्या मते विकासाची प्रक्रिया होणार गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:35 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्धा जिल्ह्यातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्धा जिल्ह्यातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.जनादेशाचा आदर केला - रामदास तडसविधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीला जनतेने जनादेश दिला होता. शिवसेनेकडून याचा अनादर झाला. मात्र जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार विराजमान झाले आहे. हे सरकार जनतेच्या सर्व आकांक्षा पूर्ण करतील व विकासाकडे वेगाने वाटचाल होईल. देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाल्याने राज्यातील विकासाची प्रक्रिया गतीमान होण्यास मदत होणार आहे व हीच जनतेचीही इच्छा होती. अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे.जनतेची इच्छा पूर्ण झाली - समीर कुणावारमहाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीला जनादेश दिला होता यात भारतीय जनता पक्ष १०५ जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष होता. राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे. अशी सर्व जनतेची इच्छा होती. मात्र शिवसेना पुवीर्पासूनच सरकारच्या सरकार स्थापनेत विरोधकाची भूमिका घेऊन होती. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. हे सरकार निश्चितपणे विश्वासमत पारित करेल व महाराष्ट्राची पुन्हा विकासाकडे वाटचाल सुरू होईल. अशी प्रतिक्रिया हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी दिली आहे.सत्तेचा दुरूपयोग करून सरकार स्थापन- अ‍ॅड.. चारूलता टोकसराज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट रातोरात हटवून राज भवनातून सत्ता स्थापनेचे काम भाजपने केले. हा सारा प्रकाश कळण्याच्या पलीकडला आहे. व तो योग्यही नाही. अजित पवार यांच्यावर कुठला दबाव होता. हे तेच सांगू शकतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची बोलणी सुरू असताना ही घटना घडली.अशी प्रतिक्रीया काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष  चारूलता टोकस यांनी दिली आहे.विकासाची प्रक्रिया वेगवान होईल. - डॉ. पंकज भोयर, आमदारजनतेला सरकार स्थापनेची बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षा होती. शनिवारी ब्रम्ह मुहूर्तावर ही प्रतिक्षा संपली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार राज्यात सत्तारूढ झाले. भाजपला १०५ जागा देवून जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. सरकार स्थापनेनंतर आता विकासाची घोडदौड अशीच सुरू राहील.

 

 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस