शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील आमदारांच्या मते विकासाची प्रक्रिया होणार गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:35 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्धा जिल्ह्यातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्धा जिल्ह्यातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.जनादेशाचा आदर केला - रामदास तडसविधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीला जनतेने जनादेश दिला होता. शिवसेनेकडून याचा अनादर झाला. मात्र जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार विराजमान झाले आहे. हे सरकार जनतेच्या सर्व आकांक्षा पूर्ण करतील व विकासाकडे वेगाने वाटचाल होईल. देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाल्याने राज्यातील विकासाची प्रक्रिया गतीमान होण्यास मदत होणार आहे व हीच जनतेचीही इच्छा होती. अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे.जनतेची इच्छा पूर्ण झाली - समीर कुणावारमहाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीला जनादेश दिला होता यात भारतीय जनता पक्ष १०५ जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष होता. राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे. अशी सर्व जनतेची इच्छा होती. मात्र शिवसेना पुवीर्पासूनच सरकारच्या सरकार स्थापनेत विरोधकाची भूमिका घेऊन होती. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. हे सरकार निश्चितपणे विश्वासमत पारित करेल व महाराष्ट्राची पुन्हा विकासाकडे वाटचाल सुरू होईल. अशी प्रतिक्रिया हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी दिली आहे.सत्तेचा दुरूपयोग करून सरकार स्थापन- अ‍ॅड.. चारूलता टोकसराज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट रातोरात हटवून राज भवनातून सत्ता स्थापनेचे काम भाजपने केले. हा सारा प्रकाश कळण्याच्या पलीकडला आहे. व तो योग्यही नाही. अजित पवार यांच्यावर कुठला दबाव होता. हे तेच सांगू शकतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची बोलणी सुरू असताना ही घटना घडली.अशी प्रतिक्रीया काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष  चारूलता टोकस यांनी दिली आहे.विकासाची प्रक्रिया वेगवान होईल. - डॉ. पंकज भोयर, आमदारजनतेला सरकार स्थापनेची बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षा होती. शनिवारी ब्रम्ह मुहूर्तावर ही प्रतिक्षा संपली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार राज्यात सत्तारूढ झाले. भाजपला १०५ जागा देवून जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. सरकार स्थापनेनंतर आता विकासाची घोडदौड अशीच सुरू राहील.

 

 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस