शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अपघात वाढले; जिल्ह्यात हेल्मेटसक्ती तीव्र करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यात २०१८ या वर्षात एकूण ५२९ अपघात झालेत. त्यामध्ये १९८ अपघातात २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : २०१८ मध्ये ५२९ अपघातात २१३ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या ५२९ रस्ते अपघातात २१३ लोकांचा मृत्यू झाला. मुख्यत: डोक्याला इजा झाल्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे.  रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करा, हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार  यांनी दिलेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यात २०१८ या वर्षात एकूण ५२९ अपघात झालेत. त्यामध्ये १९८ अपघातात २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.  १०५ अपघातात २५१ लोकांना गंभीर दुखापत झाली असून १८६ मध्यम अपघातात २७५ लोकांना दुखापत झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ मध्ये एकूण ३८२ अपघात झाले असून १४९ लोकांचा मृत्यू झाला. ३७३ गंभीर जखमी झाले आहेत. बैठकीमध्ये दरवर्षी होणाºया रस्ते अपघातामधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली.  दुचाकीस्वारांना  हेल्मेट वापरणे बंधनकारक करावे, गाडी चालविताना  मोबाईल वापरणे, दारू पिऊन गाडी चालविणे, अति वेगाने वाहन चालविणे आणि सीट बेल्टचा वापर न करणाºया वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी. यासाठी परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. याशिवाय जिल्ह्यात संभाव्य अपघातस्थळे ठरवण्यासाठी पाहणी करावी.  जिल्ह्यातील ३९ अपघात स्थळांवर काय उपाययोजना केल्यात, यासंदर्भातील अहवाल  सादर करण्याचा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्यात. परिवहन विभागामार्फत वाहन चालविताना मोबाईल वापरणे - ५०० रुपये दंड व परवाना रद्द,  दारू पिऊन गाडी चालविणे- २ हजार रुपये दंड व परवाना रद्द, हेल्मेट न वापरणे - ५०० रुपये दंड आकारण्यात येतो, असे सांगितले.या वर्षात ४९३ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २३८ दोषी आढळून आले असून ८७ केसेसमध्ये  १ लाख ३३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली. बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (यवतमाळ) कार्यकारी अभियंता, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सी.आर. हसबनीस, डी. आर. चांदोरे, सहाय्यक अभियंता एस.डब्ल्यू. टाके, सुरेश हजारे, अनिल नांदे, भरत कºहाडे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, पोलिस निरीक्षक अशोक चौधरी, विजय तिराणकर उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस