शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

अपघात वाढले; जिल्ह्यात हेल्मेटसक्ती तीव्र करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यात २०१८ या वर्षात एकूण ५२९ अपघात झालेत. त्यामध्ये १९८ अपघातात २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : २०१८ मध्ये ५२९ अपघातात २१३ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या ५२९ रस्ते अपघातात २१३ लोकांचा मृत्यू झाला. मुख्यत: डोक्याला इजा झाल्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे.  रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करा, हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार  यांनी दिलेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यात २०१८ या वर्षात एकूण ५२९ अपघात झालेत. त्यामध्ये १९८ अपघातात २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.  १०५ अपघातात २५१ लोकांना गंभीर दुखापत झाली असून १८६ मध्यम अपघातात २७५ लोकांना दुखापत झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ मध्ये एकूण ३८२ अपघात झाले असून १४९ लोकांचा मृत्यू झाला. ३७३ गंभीर जखमी झाले आहेत. बैठकीमध्ये दरवर्षी होणाºया रस्ते अपघातामधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली.  दुचाकीस्वारांना  हेल्मेट वापरणे बंधनकारक करावे, गाडी चालविताना  मोबाईल वापरणे, दारू पिऊन गाडी चालविणे, अति वेगाने वाहन चालविणे आणि सीट बेल्टचा वापर न करणाºया वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी. यासाठी परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. याशिवाय जिल्ह्यात संभाव्य अपघातस्थळे ठरवण्यासाठी पाहणी करावी.  जिल्ह्यातील ३९ अपघात स्थळांवर काय उपाययोजना केल्यात, यासंदर्भातील अहवाल  सादर करण्याचा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्यात. परिवहन विभागामार्फत वाहन चालविताना मोबाईल वापरणे - ५०० रुपये दंड व परवाना रद्द,  दारू पिऊन गाडी चालविणे- २ हजार रुपये दंड व परवाना रद्द, हेल्मेट न वापरणे - ५०० रुपये दंड आकारण्यात येतो, असे सांगितले.या वर्षात ४९३ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २३८ दोषी आढळून आले असून ८७ केसेसमध्ये  १ लाख ३३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली. बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (यवतमाळ) कार्यकारी अभियंता, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सी.आर. हसबनीस, डी. आर. चांदोरे, सहाय्यक अभियंता एस.डब्ल्यू. टाके, सुरेश हजारे, अनिल नांदे, भरत कºहाडे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, पोलिस निरीक्षक अशोक चौधरी, विजय तिराणकर उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस