शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अपघात वाढले; जिल्ह्यात हेल्मेटसक्ती तीव्र करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यात २०१८ या वर्षात एकूण ५२९ अपघात झालेत. त्यामध्ये १९८ अपघातात २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : २०१८ मध्ये ५२९ अपघातात २१३ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या ५२९ रस्ते अपघातात २१३ लोकांचा मृत्यू झाला. मुख्यत: डोक्याला इजा झाल्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे.  रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करा, हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार  यांनी दिलेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यात २०१८ या वर्षात एकूण ५२९ अपघात झालेत. त्यामध्ये १९८ अपघातात २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.  १०५ अपघातात २५१ लोकांना गंभीर दुखापत झाली असून १८६ मध्यम अपघातात २७५ लोकांना दुखापत झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ मध्ये एकूण ३८२ अपघात झाले असून १४९ लोकांचा मृत्यू झाला. ३७३ गंभीर जखमी झाले आहेत. बैठकीमध्ये दरवर्षी होणाºया रस्ते अपघातामधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली.  दुचाकीस्वारांना  हेल्मेट वापरणे बंधनकारक करावे, गाडी चालविताना  मोबाईल वापरणे, दारू पिऊन गाडी चालविणे, अति वेगाने वाहन चालविणे आणि सीट बेल्टचा वापर न करणाºया वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी. यासाठी परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. याशिवाय जिल्ह्यात संभाव्य अपघातस्थळे ठरवण्यासाठी पाहणी करावी.  जिल्ह्यातील ३९ अपघात स्थळांवर काय उपाययोजना केल्यात, यासंदर्भातील अहवाल  सादर करण्याचा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्यात. परिवहन विभागामार्फत वाहन चालविताना मोबाईल वापरणे - ५०० रुपये दंड व परवाना रद्द,  दारू पिऊन गाडी चालविणे- २ हजार रुपये दंड व परवाना रद्द, हेल्मेट न वापरणे - ५०० रुपये दंड आकारण्यात येतो, असे सांगितले.या वर्षात ४९३ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २३८ दोषी आढळून आले असून ८७ केसेसमध्ये  १ लाख ३३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली. बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (यवतमाळ) कार्यकारी अभियंता, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सी.आर. हसबनीस, डी. आर. चांदोरे, सहाय्यक अभियंता एस.डब्ल्यू. टाके, सुरेश हजारे, अनिल नांदे, भरत कºहाडे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, पोलिस निरीक्षक अशोक चौधरी, विजय तिराणकर उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस