शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
3
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
4
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
5
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
6
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
7
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
8
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
9
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
10
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
11
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
12
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
13
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
14
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
15
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
16
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
17
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
18
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
19
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
20
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत

नदीला मुबलक पाणी, तरी ग्रामस्थ तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल्याने सरपंच निलीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन नावाडे, अमर जनबंधू व शब्बीर पठाण यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली.

ठळक मुद्देदेखभाल दुरुस्तीचा अभाव : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या भेटीत धक्कादायक वास्तव उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : लगतच्या नाचणगाव व गुंजखेडा या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता एकत्र पाणीपुरवठा योजना आहे. वर्धा नदीपात्रातून या गावांना पाणीपुरवठा होत आहे. दोन्ही गावांना पाणी टंचाईची झळ बसत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या योजनेची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. नदीपात्रात मुबलक पाणी असतानाही तेथे गाळ साचलेला आहेत तसेच पुलगावच्या नाल्याचेही पाणी त्यात शिरत असल्याचे निदर्शनास आले.वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल्याने सरपंच निलीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन नावाडे, अमर जनबंधू व शब्बीर पठाण यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. नदीत पंपहाऊसला ज्या ठिकाणावरून पाणी येते तेथे वाळू उपस्यामुळे मोठमोठे खड्डे तयार झाल्याने गाळ साचला आहे. तसेच पुलगाव येथील नाल्याचे पाणी या नदीत येत असल्याने जलशुद्धीकरण होण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी नदीला मुबलक पाणी असूनही गावरकऱ्यांच्या घश्याला कोरड पडलेली आहे. यासंदर्भात जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गोनाडे यांनी पाण्याच्या जलशुद्धीकरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले.२० वर्षांपासून रेती बदलविलीच नाहीजलशुद्धीकरण केंद्रात तुरटी, ब्लिचिंग यासोबत रेतीची आवश्यकता असते. ही रेती वापरायच्या अगोदर संबंधित विभागामार्फत प्रामाणिक केल्या जाते. परंतु, गुंजखेडा येथील या जलशुद्धीकरण केंद्राची रेती गेल्या वीस वर्षांपासून बदलविलेली नाही. खराब झालेली रेती बाहेर काढल्याने रेतीसाठी कमी झाला आहे. याचा परिणाम जलशुद्धीकरणावर होतो. तरी त्वरीत नवीन प्रमाणित रेती जलशुद्धीकरण केंद्रावर उपलब्ध करणे गरजेचे आहे.जलशुद्धीकरण केंद्रावर असणाऱ्या समस्यांसंदर्भात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ यांच्याशी चर्चा केली आहे. नागरिकांच्या पाण्याची समस्या त्वरीत निकाली लाढण्याची मागणी केली आहे.- प्रवीण साखरकर, जि.प.सदस्य, नाचनगाव

टॅग्स :Waterपाणीriverनदी