शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

नदीला मुबलक पाणी, तरी ग्रामस्थ तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल्याने सरपंच निलीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन नावाडे, अमर जनबंधू व शब्बीर पठाण यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली.

ठळक मुद्देदेखभाल दुरुस्तीचा अभाव : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या भेटीत धक्कादायक वास्तव उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : लगतच्या नाचणगाव व गुंजखेडा या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता एकत्र पाणीपुरवठा योजना आहे. वर्धा नदीपात्रातून या गावांना पाणीपुरवठा होत आहे. दोन्ही गावांना पाणी टंचाईची झळ बसत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या योजनेची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. नदीपात्रात मुबलक पाणी असतानाही तेथे गाळ साचलेला आहेत तसेच पुलगावच्या नाल्याचेही पाणी त्यात शिरत असल्याचे निदर्शनास आले.वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल्याने सरपंच निलीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन नावाडे, अमर जनबंधू व शब्बीर पठाण यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. नदीत पंपहाऊसला ज्या ठिकाणावरून पाणी येते तेथे वाळू उपस्यामुळे मोठमोठे खड्डे तयार झाल्याने गाळ साचला आहे. तसेच पुलगाव येथील नाल्याचे पाणी या नदीत येत असल्याने जलशुद्धीकरण होण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी नदीला मुबलक पाणी असूनही गावरकऱ्यांच्या घश्याला कोरड पडलेली आहे. यासंदर्भात जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गोनाडे यांनी पाण्याच्या जलशुद्धीकरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले.२० वर्षांपासून रेती बदलविलीच नाहीजलशुद्धीकरण केंद्रात तुरटी, ब्लिचिंग यासोबत रेतीची आवश्यकता असते. ही रेती वापरायच्या अगोदर संबंधित विभागामार्फत प्रामाणिक केल्या जाते. परंतु, गुंजखेडा येथील या जलशुद्धीकरण केंद्राची रेती गेल्या वीस वर्षांपासून बदलविलेली नाही. खराब झालेली रेती बाहेर काढल्याने रेतीसाठी कमी झाला आहे. याचा परिणाम जलशुद्धीकरणावर होतो. तरी त्वरीत नवीन प्रमाणित रेती जलशुद्धीकरण केंद्रावर उपलब्ध करणे गरजेचे आहे.जलशुद्धीकरण केंद्रावर असणाऱ्या समस्यांसंदर्भात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ यांच्याशी चर्चा केली आहे. नागरिकांच्या पाण्याची समस्या त्वरीत निकाली लाढण्याची मागणी केली आहे.- प्रवीण साखरकर, जि.प.सदस्य, नाचनगाव

टॅग्स :Waterपाणीriverनदी