शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

माझ्या मुलासोबत लग्न कर म्हणत अल्पवयीन मुलीचे अपहरण, तब्बल दहा दिवस ठेवले डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 15:27 IST

आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देआर्वी येथील घटना : मानवी तस्करीची शक्यता ?

वर्धा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून मुलीला तब्बल १० दिवस एका घरात डांबून ठेवले. यादरम्यान पीडितेशी असभ्य वर्तनही करण्यात आले. अखेर पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका करून आर्वी पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रहिवासी १५ वर्षीय पीडिता सध्या आर्वी येथे वास्तव्य करीत आहे. आर्वी शहरातील गुरुनानक धर्मशाळा परिसरातील रहिवासी संगीता नामक महिलेने पीडितेला तिचा मुलगा नीलेश याचा फोटो दाखवून माझ्या मुलासोबत लग्न कर, असे आमिष देत तिचे अपहरण केले. पीडितेचे अपहरण करण्यासाठी बाल्या नामक युवक आणि एका अज्ञात व्यक्तीने संगीता नामक महिलेची मदत केली. संगीता हिच्या काकूने पीडितेला काही दिवस वर्धमनेरी येथील स्वत:च्या घरी ठेवले. त्यानंतर काही दिवस जळगाव येथे अशोक ठाकरे याच्या घरी ठेवले. पीडितेच्या बयाणानुसार अशोक ठाकरे याच्या घरी राहत असताना तेथे एका युवकाने पीडितेसोबत असभ्य वर्तनही केल्याचे तिने सांगितले. यानंतर संगीता पीडितेला घेऊन नागपूर जिल्ह्यातील मगरढोकला येथील रहिवासी वसंत डोंगरे याच्या घरी गेली. तेथेही पीडितेला काही दिवस एका खोलीत ठेवण्यात आले.

पीडितेने कशीबशी केली स्वत:ची सुटका

संगीता नामक महिलेने पीडितेला मुलाशी लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून नेले. तब्बल दहा दिवस विविध ठिकाणी तिला डांबून ठेवले. अखेर पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका करून थेट आर्वी पोलिसांत धाव घेत सर्व आपबिती कथन केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तत्काळ दाखल घेत पोलीस पथक रवाना करून दोघांना अटक केली.

आंतरराज्यीय टोळी असण्याचा संशय

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पीडितेला तब्बल १० दिवस विविध ठिकाणी डांबून ठेवणे ही बाब गंभीर आहे. मानवी तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करून यासंदर्भात माहिती गोळा करून उर्वरित आरोपींना देखील तत्काळ अटक करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणarvi-acआर्वीwardha-acवर्धा