शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलासोबत लग्न कर म्हणत अल्पवयीन मुलीचे अपहरण, तब्बल दहा दिवस ठेवले डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 15:27 IST

आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देआर्वी येथील घटना : मानवी तस्करीची शक्यता ?

वर्धा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून मुलीला तब्बल १० दिवस एका घरात डांबून ठेवले. यादरम्यान पीडितेशी असभ्य वर्तनही करण्यात आले. अखेर पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका करून आर्वी पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रहिवासी १५ वर्षीय पीडिता सध्या आर्वी येथे वास्तव्य करीत आहे. आर्वी शहरातील गुरुनानक धर्मशाळा परिसरातील रहिवासी संगीता नामक महिलेने पीडितेला तिचा मुलगा नीलेश याचा फोटो दाखवून माझ्या मुलासोबत लग्न कर, असे आमिष देत तिचे अपहरण केले. पीडितेचे अपहरण करण्यासाठी बाल्या नामक युवक आणि एका अज्ञात व्यक्तीने संगीता नामक महिलेची मदत केली. संगीता हिच्या काकूने पीडितेला काही दिवस वर्धमनेरी येथील स्वत:च्या घरी ठेवले. त्यानंतर काही दिवस जळगाव येथे अशोक ठाकरे याच्या घरी ठेवले. पीडितेच्या बयाणानुसार अशोक ठाकरे याच्या घरी राहत असताना तेथे एका युवकाने पीडितेसोबत असभ्य वर्तनही केल्याचे तिने सांगितले. यानंतर संगीता पीडितेला घेऊन नागपूर जिल्ह्यातील मगरढोकला येथील रहिवासी वसंत डोंगरे याच्या घरी गेली. तेथेही पीडितेला काही दिवस एका खोलीत ठेवण्यात आले.

पीडितेने कशीबशी केली स्वत:ची सुटका

संगीता नामक महिलेने पीडितेला मुलाशी लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून नेले. तब्बल दहा दिवस विविध ठिकाणी तिला डांबून ठेवले. अखेर पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका करून थेट आर्वी पोलिसांत धाव घेत सर्व आपबिती कथन केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तत्काळ दाखल घेत पोलीस पथक रवाना करून दोघांना अटक केली.

आंतरराज्यीय टोळी असण्याचा संशय

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पीडितेला तब्बल १० दिवस विविध ठिकाणी डांबून ठेवणे ही बाब गंभीर आहे. मानवी तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करून यासंदर्भात माहिती गोळा करून उर्वरित आरोपींना देखील तत्काळ अटक करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणarvi-acआर्वीwardha-acवर्धा