शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

माझ्या मुलासोबत लग्न कर म्हणत अल्पवयीन मुलीचे अपहरण, तब्बल दहा दिवस ठेवले डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 15:27 IST

आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देआर्वी येथील घटना : मानवी तस्करीची शक्यता ?

वर्धा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून मुलीला तब्बल १० दिवस एका घरात डांबून ठेवले. यादरम्यान पीडितेशी असभ्य वर्तनही करण्यात आले. अखेर पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका करून आर्वी पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रहिवासी १५ वर्षीय पीडिता सध्या आर्वी येथे वास्तव्य करीत आहे. आर्वी शहरातील गुरुनानक धर्मशाळा परिसरातील रहिवासी संगीता नामक महिलेने पीडितेला तिचा मुलगा नीलेश याचा फोटो दाखवून माझ्या मुलासोबत लग्न कर, असे आमिष देत तिचे अपहरण केले. पीडितेचे अपहरण करण्यासाठी बाल्या नामक युवक आणि एका अज्ञात व्यक्तीने संगीता नामक महिलेची मदत केली. संगीता हिच्या काकूने पीडितेला काही दिवस वर्धमनेरी येथील स्वत:च्या घरी ठेवले. त्यानंतर काही दिवस जळगाव येथे अशोक ठाकरे याच्या घरी ठेवले. पीडितेच्या बयाणानुसार अशोक ठाकरे याच्या घरी राहत असताना तेथे एका युवकाने पीडितेसोबत असभ्य वर्तनही केल्याचे तिने सांगितले. यानंतर संगीता पीडितेला घेऊन नागपूर जिल्ह्यातील मगरढोकला येथील रहिवासी वसंत डोंगरे याच्या घरी गेली. तेथेही पीडितेला काही दिवस एका खोलीत ठेवण्यात आले.

पीडितेने कशीबशी केली स्वत:ची सुटका

संगीता नामक महिलेने पीडितेला मुलाशी लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून नेले. तब्बल दहा दिवस विविध ठिकाणी तिला डांबून ठेवले. अखेर पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका करून थेट आर्वी पोलिसांत धाव घेत सर्व आपबिती कथन केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तत्काळ दाखल घेत पोलीस पथक रवाना करून दोघांना अटक केली.

आंतरराज्यीय टोळी असण्याचा संशय

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पीडितेला तब्बल १० दिवस विविध ठिकाणी डांबून ठेवणे ही बाब गंभीर आहे. मानवी तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करून यासंदर्भात माहिती गोळा करून उर्वरित आरोपींना देखील तत्काळ अटक करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणarvi-acआर्वीwardha-acवर्धा