शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

वर्ध्यातील मराठी साहित्य संमेलनाकरिता ४१ समित्यांची बांधली मोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2023 20:16 IST

Wardha News वर्ध्याच्या भूमीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. हे संमेलन ऐतिहासिक ठरावे, याकरिता आयोजकांकडून विविध संघटना व विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून ४१ समित्यांच्या माध्यमातून नियोजनाची तयारी चालविली आहे.

ठळक मुद्देसंमेलन ऐतिहासिक करण्याकरिता धडपडसाहित्यनगरी होताहेत सज्ज

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वर्ध्याच्या भूमीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. हे संमेलन ऐतिहासिक ठरावे, याकरिता आयोजकांकडून विविध संघटना व विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून ४१ समित्यांच्या माध्यमातून नियोजनाची तयारी चालविली आहे. या समित्या नियमित बैठका घेऊन उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत आहे.

वर्ध्यातील स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात तब्बल ५३ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने ३, ४ आणि ५ फेब्रुवारीला साहित्यिकांचा महाकुंभ मेळा भरणार आहे. त्यासाठी साहित्यनगरी सज्ज होत असून संमेलनाचा मंडप आणि विविध दालने तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. संमेलनासाठी मंडप उभारणीपासून, येणाऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था, प्रसिद्धी आणि समारोपीय कार्यक्रमापर्यंत प्रत्येक जबाबदारी विविध समित्यांकडे सोपविण्यात आली आहे.

संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता ४१ समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यामध्ये निधी संकलन समिती, ग्रंथ दिंडी समिती, चित्र-शिल्प-रांगोळी समिती, मंडप-विचारपीठ-प्रवेशद्वार-विविध दालन निर्मिती समिती, सभामंडप, रंगमंच सजावट व आसन व्यवस्था समिती, ध्वनी नियंत्रण व प्रकाश योजना समिती, उद्घाटन व समारोप समारोह समिती, शहर सुशोभीकरण समिती, भोजन व अल्पोपाहार समिती, स्वच्छता-पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था समिती, परिवहन व वाहनतळ समिती, प्रतिनिधी नोंदणी समिती, मदत कक्ष व मार्गदर्शन समिती, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व अतिथी समिती, स्वागत व साहित्य महामंडळ समन्वय समिती, कार्यालयीन कामकाज व शासकीय परवानगी समिती, लेखा व लेखा परीक्षण समिती, विधी व शिस्तपालन, चौकशी व तक्रार निवारण समिती, सत्कार समिती, विविध नियोजन कार्यक्रम समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, लोककला व खुला मंच कार्यक्रम समिती, कविकट्टा समिती व गझल कट्टा समिती, बालकुमार दालन समिती, वर्धेकर दालन समिती, ग्रंथ प्रदर्शनी समिती यासह तब्बल ४१ समित्या गठित करण्यात आल्या असून प्रत्येक समितीमध्ये वर्धेकरांचा सक्रिय सहभाग आहे. समित्यांच्या वारंवार बैठका घेऊन नवनवीन कल्पना सुचवित असून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे वर्ध्यातील हे साहित्य संमेलन नक्कीच युनिक ठरणार, यात शंका नाही.

 

टॅग्स :literatureसाहित्य