शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

"सध्या घोषित नव्हे, अघोषित आणीबाणीचा काळ!" विद्रोही साहित्य संमेलनातून ‘झाडाझडती’

By आनंद इंगोले | Updated: February 5, 2023 13:55 IST

मराठी साहित्य संमेलनात आधी ५० लाख, नंतर २ कोटी रुपये असे खोक्यावर खोके प्राप्त झाले.

कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य नगरी (वर्धा) : सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद नाही. वातावरण विषात्मक बनवून परस्पर अविश्वास व जाती-जातीत, धर्मा-धर्मांत भयाचे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. सरकारी पातळीवरूनच हा प्रयत्न केला जात असल्याने सध्या घोषित नाही, तर अघोषित आणीबाणीचा काळ निश्चितच आहे, असा घणाघात विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबा साहित्य नगरीतील फुले-शाहू-आंबेडकर विचारपीठावरून केला. 

मराठी साहित्य संमेलनात आधी ५० लाख, नंतर २ कोटी रुपये असे खोक्यावर खोके प्राप्त झाले. त्यामुळे मराठी साहित्य संमेलन म्हणजे खोक्यावर खोके संमेलन आहे, असे मत वानखेडे यांनी सकाळी विचार यात्रेदरम्यान व्यक्त केले. संमेलनात तासाभराच्या भाषणातून त्यांनी ‘संघ, उर्फी जावेद, लव्ह जिहादसह हिंदुत्व’ आदींबाबत चांगलीच झाडाझडती घेतली.

१७ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखिका व सिनेअभिनेत्री रसिका आगासे-अय्युब यांच्या हस्ते झाले. विचारपीठावर संमेलनाध्यक्षांसह मावळते अध्यक्ष गणेश विसपुते, स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे, मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे, राज्याध्यक्ष प्रतिमा परदेशी, ज्ञानेश वाकुडकर आदींची उपस्थिती होते. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनliteratureसाहित्य