शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

खादीच्या दोरखंडाने ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ शब्दबद्ध!

By महेश सायखेडे | Updated: February 4, 2023 10:51 IST

२४ तासांत झाले काम फत्ते : शंभर मीटर बारदानाचाही वापर

वर्धा : कधी आवर घालण्यासाठी, तर कधी एकत्र बांधण्यासाठी दोरखंडाचा वापर केला जातो. असे असले तरी वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शब्दबद्ध करण्यासाठी चक्क खादीच्या दोरखंडाचा वापर झाल्याचे वास्तव आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावरून शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य सोहळा पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. याच व्यासपीठावर ३० फूट बाय १२ फूट आकाराचा फलक लावण्यात आला आहे. हा फलक ८० मीटर बारदान्याचा वापर करून तयार करण्यात आला असून, त्यावर ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शब्दबद्ध करण्यासाठी १०० मीटर खादीच्या दोरखंडाचा वापर झाला आहे. विशेष म्हणजे हा मुख्य फलक अवघ्या २४ तासांत आशिष पोहाणे, सुभाष राठोड, प्रवीण राडे, संजय पुसाम, किशोर उकेकर, किशोर शेंद्रे, प्रमोद चौधरी, रवी मुटे, मनोज बाचले यांनी तयार केला.

जवळून बघिल्यावर उलगडते वास्तव

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर लावण्यात आलेला फलक जवळून बघितल्यावरच त्या फलकावरील ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा’ हे खादीच्या दोरखंडाचा वापर करून शब्दबद्ध झाल्याचे वास्तव दिसून येते; पण दुरून बघितल्यावर हा फलक जणू प्रिंटिंग मशीनचा वापर करून तयार केला असल्याचे भासते हे उल्लेखनीय.

कापसाच्या पेळूतून साकारले ग. त्र्यं. मांडखोलकर

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील ग. त्र्यं. मांडखोलकर प्रकाशन मंचातही बारदान्याचा वापर करून व्यासपीठावर मोठा फलक लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच फलकावर कापसाच्या पेळूचा वापर करून ग. त्र्यं. मांडखोलकर यांचे चित्र साकारण्यात आले आहे.

संमेलनस्थळी रांगोळीतून ‘गांधी-विनोबा’

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठासमोर आकर्षक अशी रांगोळी रेखाटण्यात आली आहे. २०० किलो रांगोळीचा वापर करून स्वयंसेविकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, तसेच बापूकुटी आणि चरखा रेखाटण्यात आला आहे. संमेलनात आलेल्या रसिक व साहित्यिकांना ही रांगोळी भुरळ घालत आहे.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धाKhadiखादी