शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

खादीच्या दोरखंडाने ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ शब्दबद्ध!

By महेश सायखेडे | Updated: February 4, 2023 10:51 IST

२४ तासांत झाले काम फत्ते : शंभर मीटर बारदानाचाही वापर

वर्धा : कधी आवर घालण्यासाठी, तर कधी एकत्र बांधण्यासाठी दोरखंडाचा वापर केला जातो. असे असले तरी वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शब्दबद्ध करण्यासाठी चक्क खादीच्या दोरखंडाचा वापर झाल्याचे वास्तव आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावरून शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य सोहळा पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. याच व्यासपीठावर ३० फूट बाय १२ फूट आकाराचा फलक लावण्यात आला आहे. हा फलक ८० मीटर बारदान्याचा वापर करून तयार करण्यात आला असून, त्यावर ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शब्दबद्ध करण्यासाठी १०० मीटर खादीच्या दोरखंडाचा वापर झाला आहे. विशेष म्हणजे हा मुख्य फलक अवघ्या २४ तासांत आशिष पोहाणे, सुभाष राठोड, प्रवीण राडे, संजय पुसाम, किशोर उकेकर, किशोर शेंद्रे, प्रमोद चौधरी, रवी मुटे, मनोज बाचले यांनी तयार केला.

जवळून बघिल्यावर उलगडते वास्तव

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर लावण्यात आलेला फलक जवळून बघितल्यावरच त्या फलकावरील ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा’ हे खादीच्या दोरखंडाचा वापर करून शब्दबद्ध झाल्याचे वास्तव दिसून येते; पण दुरून बघितल्यावर हा फलक जणू प्रिंटिंग मशीनचा वापर करून तयार केला असल्याचे भासते हे उल्लेखनीय.

कापसाच्या पेळूतून साकारले ग. त्र्यं. मांडखोलकर

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील ग. त्र्यं. मांडखोलकर प्रकाशन मंचातही बारदान्याचा वापर करून व्यासपीठावर मोठा फलक लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच फलकावर कापसाच्या पेळूचा वापर करून ग. त्र्यं. मांडखोलकर यांचे चित्र साकारण्यात आले आहे.

संमेलनस्थळी रांगोळीतून ‘गांधी-विनोबा’

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठासमोर आकर्षक अशी रांगोळी रेखाटण्यात आली आहे. २०० किलो रांगोळीचा वापर करून स्वयंसेविकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, तसेच बापूकुटी आणि चरखा रेखाटण्यात आला आहे. संमेलनात आलेल्या रसिक व साहित्यिकांना ही रांगोळी भुरळ घालत आहे.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धाKhadiखादी