शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

९६,६०१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:24 IST

डिसेंबर महिन्यात मुदत संपणार असलेल्या ८६ ग्रामपंचायतीकरिता सोमवारी मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे८६ ग्रामपंचायतींकरिता मतदान : जिल्हाभरात एकूण २७८ मतदान केंद्र सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डिसेंबर महिन्यात मुदत संपणार असलेल्या ८६ ग्रामपंचायतीकरिता सोमवारी मतदान होणार आहे. याकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीत एकूण ९६ हजार ६०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात ४४ हजार २०८ महिला आणि ५० हजार ३८९ पुरूष मतदारांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त चार अन्य मतदारांचा समावेश आहे.मतदानाच्या कार्यक्रमाला सकाळी ७ वाजता प्रारंभ होणार आहे. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीत एकूण २७६ केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रांवर प्रत्येकी चार म्हणजेच एकूण १ हजार ११२ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून होणाºया प्रत्येक घडामोडीवर लक्ष राहणार आहे. मतदानाच्या काळात कुठलीही गडबड होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता जिल्हाधिकाºयांनी थेट कलम ३६ जारी केली आहे. शिवाय पोलीस विभागाच्यावतीनेही बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस आणि एक गृहरक्षक देण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. शिवाय पोलिसांचे एक विशेष पथक फिरत राहणार असून दंगल नियंत्रण पथकासही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.जिल्ह्यात यापूर्वी ११२ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार होती. मात्र सेलू तालुक्यात काही उमेदवारांना पतंग चिन्ह देण्यात आल्याने गडबड झाली. यामुळे तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीकरिता नवा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार येथे २३ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने उमेदवार चिंतेत सापडले आहेत.सरपंचपदाकरिता एकूण ३०२ उमेदवारहोत असलेल्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायती अविरोध ठरल्या तरी सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता चांगलीच चुरस असल्याचे दिसून आले आहे. एकूण ३०२ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी कितींच्या गळ्यात विजयाची माळ पडते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.पाच ग्रामपंचायती ठरल्या अविरोधजिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीने सरपंच पदासह सदस्याचीही बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला आहे. वर्धा तालुक्यातील पांढरकवडा (गणेशपूर) या ग्रामपंचायतीतील सरपंचासह सातही सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जऊळगाव व झाडगाव येथील प्रत्येकी एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. आष्टी तालुक्यातील १ सरपंच व १३ सदस्य, कारंजा तालुक्यातील २ सरपंच व ४८ सदस्य तर आर्वी तालुक्यातील १ सरपंच व ३५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकंदरीत पाच ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या ५ व १९२ उमेदवारांची निवड बिनविरोध निवड झाली आहे.२७८ बॅलेट कंट्रोल, ५५६ बॅलेट युनिट८६ गावांत होत असलेल्या या निवडणुकीत प्रशासनाची व्यवस्था पूर्ण झाली आहे. मतदानाकरिता २७८ कंट्रोल युनिट आणि ५५६ बॅलेट युनिट सज्ज करण्यात आले आहे. या माध्यमातून ही निवडणूक पार पडणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात देण्यात आली आहे.