शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जि.प.च्या ९१ टक्के शाळा झाल्या डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:50 IST

जिल्ह्यात एकूण १ हजार ५१९ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या ९२५ पैकी तब्बल ८३९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामुळे आता खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील विद्यार्थीही जि.प. च्या शाळांकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमागील वर्षात ६६५ विद्यार्थी कॉन्व्हेंट सोडून जिल्हा परिषद शाळेत प्रवेशित

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात एकूण १ हजार ५१९ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या ९२५ पैकी तब्बल ८३९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामुळे आता खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील विद्यार्थीही जि.प. च्या शाळांकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.जि.प. प्राथमिक, माध्यमिक, नगर परिषद, शासकीय शाळा व खासगी शाळा अशा १ हजार ५१९ शाळा जिल्ह्यात आहे. यात जि.प. प्राथमिक ९२५ तर माध्यमिक दोन शाळा आहे. नगर परिषदेच्या ४६ प्राथमिक व सात माध्यमिक, शासकीय शाळा प्राथमिक ४ व माध्यमिक ५ तर खासगी प्राथमिक १९८ व माध्यमिक ३३२ शाळा आहेत. प्राथमिकच्या एकूण १ हजार १७३ तर माध्यमिकच्या ३४६ शाळा आहेत. यात जि.प.च्या ९२५ पैकी ८३९ म्हणजे ९१ टक्के शाळा डिजीटल झाल्या असून तेथे अद्यावत संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. जि.प. शाळेतील १०० टक्के शिक्षकांचे तंत्रस्नेही प्रशिक्षण पूर्ण झालेले मागील वर्षात ६६५ विद्यार्थी इंग्रजी कॉन्व्हेंटमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशित झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या शाळासिद्धी मूल्यमापन तंत्राद्वारे स्वयंमूल्यमापन करून घेतल्यानुसार जिल्ह्यातील जि.प. च्या ३६ टक्के शाळा अ श्रेणीत असल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. शासनाच्या विविध सर्वेक्षणातून प्रत्येक विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चित करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात भागाकार करता येणारे ८६ टक्के, वाचन क्षमता प्राप्त करणारे ९० टक्के विद्यार्थी असल्याचेही सांगण्यात आले आहे.जि.प. शाळांत मोफत गणवेश वाटप, शालेय पोषण आहार, अपंग समावेशित योजना, शाळा अनुदान, देखभाल व दुरूस्ती अनुदान, शैक्षणिक साहित्य अनुदान, शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, स्काऊट गाईड योजना, खेळ क्रीडा व सांस्कृतिक कार्यकम तथा विविध योजना राबविल्या जात असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिचय व विविध स्पर्धा परीक्षेलाही मुलांना बसविण्यात येते. विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्येत वाढ होत असल्याचेच दिसून येत आहे.नवोपक्रमामुळे पटसंख्येत सुधारमागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विविध नवोपक्रम राबविले जात आहे. तंत्रस्रेही शिक्षकांमुळे ९१ टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये एलईडी, एलसीडी, संगणक, टॅब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शिवाय अध्यापनाच्या नवनवीन पद्धतीही विकसित केल्या जात आहेत. यामुळे खासगी शाळांतील विद्यार्थी जि.प. शाळांकडे आकर्षित होत असून पटसंख्येत सुधारणा झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Schoolशाळाdigitalडिजिटल