शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

जि.प.च्या ९१ टक्के शाळा झाल्या डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:50 IST

जिल्ह्यात एकूण १ हजार ५१९ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या ९२५ पैकी तब्बल ८३९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामुळे आता खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील विद्यार्थीही जि.प. च्या शाळांकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमागील वर्षात ६६५ विद्यार्थी कॉन्व्हेंट सोडून जिल्हा परिषद शाळेत प्रवेशित

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात एकूण १ हजार ५१९ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या ९२५ पैकी तब्बल ८३९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामुळे आता खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील विद्यार्थीही जि.प. च्या शाळांकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.जि.प. प्राथमिक, माध्यमिक, नगर परिषद, शासकीय शाळा व खासगी शाळा अशा १ हजार ५१९ शाळा जिल्ह्यात आहे. यात जि.प. प्राथमिक ९२५ तर माध्यमिक दोन शाळा आहे. नगर परिषदेच्या ४६ प्राथमिक व सात माध्यमिक, शासकीय शाळा प्राथमिक ४ व माध्यमिक ५ तर खासगी प्राथमिक १९८ व माध्यमिक ३३२ शाळा आहेत. प्राथमिकच्या एकूण १ हजार १७३ तर माध्यमिकच्या ३४६ शाळा आहेत. यात जि.प.च्या ९२५ पैकी ८३९ म्हणजे ९१ टक्के शाळा डिजीटल झाल्या असून तेथे अद्यावत संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. जि.प. शाळेतील १०० टक्के शिक्षकांचे तंत्रस्नेही प्रशिक्षण पूर्ण झालेले मागील वर्षात ६६५ विद्यार्थी इंग्रजी कॉन्व्हेंटमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशित झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या शाळासिद्धी मूल्यमापन तंत्राद्वारे स्वयंमूल्यमापन करून घेतल्यानुसार जिल्ह्यातील जि.प. च्या ३६ टक्के शाळा अ श्रेणीत असल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. शासनाच्या विविध सर्वेक्षणातून प्रत्येक विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चित करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात भागाकार करता येणारे ८६ टक्के, वाचन क्षमता प्राप्त करणारे ९० टक्के विद्यार्थी असल्याचेही सांगण्यात आले आहे.जि.प. शाळांत मोफत गणवेश वाटप, शालेय पोषण आहार, अपंग समावेशित योजना, शाळा अनुदान, देखभाल व दुरूस्ती अनुदान, शैक्षणिक साहित्य अनुदान, शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, स्काऊट गाईड योजना, खेळ क्रीडा व सांस्कृतिक कार्यकम तथा विविध योजना राबविल्या जात असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिचय व विविध स्पर्धा परीक्षेलाही मुलांना बसविण्यात येते. विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्येत वाढ होत असल्याचेच दिसून येत आहे.नवोपक्रमामुळे पटसंख्येत सुधारमागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विविध नवोपक्रम राबविले जात आहे. तंत्रस्रेही शिक्षकांमुळे ९१ टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये एलईडी, एलसीडी, संगणक, टॅब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शिवाय अध्यापनाच्या नवनवीन पद्धतीही विकसित केल्या जात आहेत. यामुळे खासगी शाळांतील विद्यार्थी जि.प. शाळांकडे आकर्षित होत असून पटसंख्येत सुधारणा झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Schoolशाळाdigitalडिजिटल