शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

तडीपारीची ९२ प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: October 11, 2014 23:11 IST

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख तोंडावर आली आहे. या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता पोलीस प्रशासनाच्यावतीने ‘हिस्ट्रीशिटर’ व शांतता भंग करण्याचे कारण

विधानसभा निवडणूक : प्रतिबंधात्मक कारवाईत १७ पोलीस ठाण्यांतर्गत होणार ६० जणांना अटक रूपेश खैरी - वर्धाविधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख तोंडावर आली आहे. या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता पोलीस प्रशासनाच्यावतीने ‘हिस्ट्रीशिटर’ व शांतता भंग करण्याचे कारण ठरणाऱ्यांवर जिल्हा बंदीची कारवाई करण्याचा नियम आहे. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात तिघांवर जिल्हाबंदीची कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रस्ताव सादर केले आहेत. यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत एकूण ९२ प्रकरणे सादर केली असून त्यांना अद्याप मान्यता देण्यात आली नाही. या संदर्भात शनिवारी सायंकाळी बैठक होणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात असलेल्या १७ पोलीस ठाण्यांतर्गत एक हजार ३०६ मतदान केंद्रावरून मतदान करण्यात येणार आहे. एवढ्या मतदान केंद्रांतर्गत काही मतदान केंद्र संवेदनशिल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या भागात पोलिसांची अधिक गस्त राहणार आहे. जिल्ह्यात ही शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने विविध कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. ९२ जणांना जिल्हाबंदी करण्याचा प्रस्ताव आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. यावर निर्णय होण्याची अपेक्षा असताना मतदानाची तारीख आली तरी त्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याने पोलीस प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत जर यावर निर्णय झाला नाही तर पोलिसांना उद्भवणारी परिस्थिती सांभाळण्याकरिता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. अशात प्रस्ताव मान्यतेचे कागद तयार झाले असले तरी त्यावर अद्याप स्वाक्षरी करण्यात आली नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील काही कुख्यात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. यात भादंविच्या कलम १०७, ११० व १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या कलमांतर्गत कारवाई करण्याकरिता जिल्ह्यात ६२३ जणांची यादी करण्यात आली होती. असे असले तरी वास्तविकतेत यापेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय ६० जणांना अटक करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अटक करण्याची कारवाई रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. या कामाकरिता पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले असून त्या पथकाला जिल्ह्यातील विविध ठाण्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात दारूबंदीच्या २४२ कारवाई निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रामणात दारू येत असल्याचे समोर आले. या काळात येणारी दारू पकडण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष पथाकच्या कारवाईनुसार आचारसंहिता जाहीर झाली त्या काळापासून दारूबंदीच्या कायद्यांतर्गत २४२ कारवाया करण्यात आल्या. दारूबंदीच्या कारवाई अद्यापही सुरूच आहे. यादीपेक्षा आरोपी अधिक शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता प्रतिबंधात्मक कारवाईकरिता भादंविच्या कलम १०७ अन्वये २९१ जणांवर कारवाई करण्यात येणार होती. प्रत्यक्षात मात्र ६२६ जणांवर कारवाई झाली. कलम ११० नुसार २०६ जणांवर कारवाई करावयाची होती; मात्र यात २११ जणांवर कारवाई करण्यात आली. तर कलम १४४ अन्वये ६६ जणांवर कारवाई करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र ८२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.