शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारीची ९२ प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: October 11, 2014 23:11 IST

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख तोंडावर आली आहे. या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता पोलीस प्रशासनाच्यावतीने ‘हिस्ट्रीशिटर’ व शांतता भंग करण्याचे कारण

विधानसभा निवडणूक : प्रतिबंधात्मक कारवाईत १७ पोलीस ठाण्यांतर्गत होणार ६० जणांना अटक रूपेश खैरी - वर्धाविधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख तोंडावर आली आहे. या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी याकरिता पोलीस प्रशासनाच्यावतीने ‘हिस्ट्रीशिटर’ व शांतता भंग करण्याचे कारण ठरणाऱ्यांवर जिल्हा बंदीची कारवाई करण्याचा नियम आहे. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात तिघांवर जिल्हाबंदीची कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रस्ताव सादर केले आहेत. यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत एकूण ९२ प्रकरणे सादर केली असून त्यांना अद्याप मान्यता देण्यात आली नाही. या संदर्भात शनिवारी सायंकाळी बैठक होणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात असलेल्या १७ पोलीस ठाण्यांतर्गत एक हजार ३०६ मतदान केंद्रावरून मतदान करण्यात येणार आहे. एवढ्या मतदान केंद्रांतर्गत काही मतदान केंद्र संवेदनशिल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या भागात पोलिसांची अधिक गस्त राहणार आहे. जिल्ह्यात ही शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने विविध कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. ९२ जणांना जिल्हाबंदी करण्याचा प्रस्ताव आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. यावर निर्णय होण्याची अपेक्षा असताना मतदानाची तारीख आली तरी त्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याने पोलीस प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत जर यावर निर्णय झाला नाही तर पोलिसांना उद्भवणारी परिस्थिती सांभाळण्याकरिता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. अशात प्रस्ताव मान्यतेचे कागद तयार झाले असले तरी त्यावर अद्याप स्वाक्षरी करण्यात आली नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील काही कुख्यात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. यात भादंविच्या कलम १०७, ११० व १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या कलमांतर्गत कारवाई करण्याकरिता जिल्ह्यात ६२३ जणांची यादी करण्यात आली होती. असे असले तरी वास्तविकतेत यापेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय ६० जणांना अटक करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अटक करण्याची कारवाई रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. या कामाकरिता पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले असून त्या पथकाला जिल्ह्यातील विविध ठाण्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात दारूबंदीच्या २४२ कारवाई निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रामणात दारू येत असल्याचे समोर आले. या काळात येणारी दारू पकडण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष पथाकच्या कारवाईनुसार आचारसंहिता जाहीर झाली त्या काळापासून दारूबंदीच्या कायद्यांतर्गत २४२ कारवाया करण्यात आल्या. दारूबंदीच्या कारवाई अद्यापही सुरूच आहे. यादीपेक्षा आरोपी अधिक शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता प्रतिबंधात्मक कारवाईकरिता भादंविच्या कलम १०७ अन्वये २९१ जणांवर कारवाई करण्यात येणार होती. प्रत्यक्षात मात्र ६२६ जणांवर कारवाई झाली. कलम ११० नुसार २०६ जणांवर कारवाई करावयाची होती; मात्र यात २११ जणांवर कारवाई करण्यात आली. तर कलम १४४ अन्वये ६६ जणांवर कारवाई करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र ८२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.