शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

८९,८४२ हेक्टरवरील पेरण्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:31 IST

जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमण झाल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला. मात्र गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या धोक्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सोमवारी काही भागात पाऊस आल्याने या पेरण्या साधल्याचे शेतकरी बोलत आहे.

ठळक मुद्दे६४ हजार ६७७ हेक्टरवर कपाशी तर १६ हजार २९२ क्षेत्रात सोयाबीनचा पेरा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमण झाल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला. मात्र गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या धोक्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सोमवारी काही भागात पाऊस आल्याने या पेरण्या साधल्याचे शेतकरी बोलत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण ८९ हजार ८४२ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असून सध्या तरी त्या धोक्यात असल्याचे चित्र आहे.गत आठ दिवसांपासून बेपत्ता झालेला पाऊस सोमवारी काही भागात बरसला. तर निम्मा जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यात अनेकांकडून पेरण्या आटोपल्याने त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे, पाऊस आज येईल उद्या येईल या आशेत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून आजच्या स्थितीत कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार २० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यातील बऱ्याच पेरण्या अंकुरल्या असून पावसाच्या गैरहजेरीमुळे त्या करपण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.यंदाच्या खरीपात जिल्ह्यात ४ लाख १५ हजार ७३८ हेक्टरवर पेरा होईल, असे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख २६ हजार ३६२ हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले. तर १ लाख १७ हजार ६७५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे नियोजन आहे. तर उर्वरीत क्षेत्रात तूर, ज्वारी, मुंग व उडिदाचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या नियोजनानुसार शेतकऱ्यांकडून पेरण्या सुरू झाल्या असून कपाशीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर सोयाबीन आणि तुरीचा पेरा सध्या माघारल्याचे दिसून आले आहे. सोयाबीनच्या पेरण्या करण्याकरिता शेतकºयांना आणखी पावसाची प्रतीक्षा असल्याचे बोलले जात आहे.कपाशीचा पेरा घटण्याचा अंदाज फोलचगत खरीपात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे यंदाच्या खरीपात कपाशीचा पेरा कमी होईल असे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र हे सारे अंदाज खोटे ठरत असल्याचे दिसून आले आहे. विशेषज्ञांच्या अंदाजाला बगल देत तब्बल ६४ हजार ६७७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यातील काही भागात पावसाअभावी मोड येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी कपाशीलाच पसंती दिल्याचे दिसून आले.सोयाबीनच्या पेरणीकरिता पावसाची प्रतीक्षाकापूस उत्पादक असलेल्या वर्धा जिल्ह्यातील बरेच शेतकरी सोयाबीन घेत आहे. ९० दिवसाचे पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीनच्या पेऱ्याला आणखी पावसाची गरज असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. असे असतानाही ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आजघडीला १६ हजार २९२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे.या दोन्ही वाणाच्या तुलनेत तूर मात्र मागे पडली आहे. जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस आला नसल्याने साडेआठ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असल्याचे दिसून आले आहे. तर केवळ १० हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. येत्या दिवसात पाऊस आल्यास या सर्वच वाणाचा नियोजनानुसार पेरा होईल असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी