शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

८९,८४२ हेक्टरवरील पेरण्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:31 IST

जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमण झाल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला. मात्र गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या धोक्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सोमवारी काही भागात पाऊस आल्याने या पेरण्या साधल्याचे शेतकरी बोलत आहे.

ठळक मुद्दे६४ हजार ६७७ हेक्टरवर कपाशी तर १६ हजार २९२ क्षेत्रात सोयाबीनचा पेरा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमण झाल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला. मात्र गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या धोक्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सोमवारी काही भागात पाऊस आल्याने या पेरण्या साधल्याचे शेतकरी बोलत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण ८९ हजार ८४२ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असून सध्या तरी त्या धोक्यात असल्याचे चित्र आहे.गत आठ दिवसांपासून बेपत्ता झालेला पाऊस सोमवारी काही भागात बरसला. तर निम्मा जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यात अनेकांकडून पेरण्या आटोपल्याने त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे, पाऊस आज येईल उद्या येईल या आशेत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून आजच्या स्थितीत कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार २० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यातील बऱ्याच पेरण्या अंकुरल्या असून पावसाच्या गैरहजेरीमुळे त्या करपण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.यंदाच्या खरीपात जिल्ह्यात ४ लाख १५ हजार ७३८ हेक्टरवर पेरा होईल, असे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख २६ हजार ३६२ हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले. तर १ लाख १७ हजार ६७५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे नियोजन आहे. तर उर्वरीत क्षेत्रात तूर, ज्वारी, मुंग व उडिदाचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या नियोजनानुसार शेतकऱ्यांकडून पेरण्या सुरू झाल्या असून कपाशीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर सोयाबीन आणि तुरीचा पेरा सध्या माघारल्याचे दिसून आले आहे. सोयाबीनच्या पेरण्या करण्याकरिता शेतकºयांना आणखी पावसाची प्रतीक्षा असल्याचे बोलले जात आहे.कपाशीचा पेरा घटण्याचा अंदाज फोलचगत खरीपात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे यंदाच्या खरीपात कपाशीचा पेरा कमी होईल असे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र हे सारे अंदाज खोटे ठरत असल्याचे दिसून आले आहे. विशेषज्ञांच्या अंदाजाला बगल देत तब्बल ६४ हजार ६७७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यातील काही भागात पावसाअभावी मोड येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी कपाशीलाच पसंती दिल्याचे दिसून आले.सोयाबीनच्या पेरणीकरिता पावसाची प्रतीक्षाकापूस उत्पादक असलेल्या वर्धा जिल्ह्यातील बरेच शेतकरी सोयाबीन घेत आहे. ९० दिवसाचे पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीनच्या पेऱ्याला आणखी पावसाची गरज असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. असे असतानाही ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आजघडीला १६ हजार २९२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे.या दोन्ही वाणाच्या तुलनेत तूर मात्र मागे पडली आहे. जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस आला नसल्याने साडेआठ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असल्याचे दिसून आले आहे. तर केवळ १० हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. येत्या दिवसात पाऊस आल्यास या सर्वच वाणाचा नियोजनानुसार पेरा होईल असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी