शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

वर्धेतील ८६ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:54 IST

पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपालिकेने बजावली नोटीस : एका घरमालकाकडून इमारत पाडण्याची कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या इमारती राहण्यायोग्य नसल्याने त्यांना पाडण्याची कार्यवाही घरमालकाने करावी, अशा आशयाची नोटीस मालकांना पालिकेच्यावतीने बजावण्यात आली आहे.वर्धा शहरात अशा शिकस्त इमारतींच्या संख्येत यंदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात अशा एकूण ७५ इमारती होत्या. यात आता वाढ झाली असून हा आकडा ८६ वर पोहोचला आहे. या इमारत मालकांना पालिकेच्यावतीने नोटीसी बजावण्यात येत असल्या तरी मालकांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याचे या वाढत्या आकड्यांवरून दिसत आहे. गत वर्षी पालिका प्रशासनाकडून या इमारतींच्या मालकांनाही नोटीसी बजावण्यात आल्या होत्या. त्याच नोटीसी पुन्हा यंदाच्या सत्रात बजावण्यात आल्या आहेत. या इमारतींचा सर्व्हे सुरूच आहे.या नोटीसींवर अशा इमारत मालकांनी कार्यवाही करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. वर्धेत मुख्य बाजारासह, महादेवपुरा, रामनगर, तुकाराम वॉर्ड, गोंड प्लॉट या भागातील अनेक इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्या इमारती पाडण्याची कार्यवाही मालकांनी करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे घरमालकांनी वेळीच याचा विचार करण्याची गरज वर्तविली जात आहे.एका घरमालकाने नोटीसवर केली अंमलबजावणीनगर परिषदेकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर महादेवपुरा येथील एका घरमालकाने कार्यवाही केल्याचे दिसून आले. येथे एका इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूची इमारत शिकस्त झाली होती. ती इमारत पाडण्याची कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस बंदोबस्तात करण्यात आली; मात्र भाडेकरूकडून बराच वेळ गोंधळ घालण्यात आला होता.म्हाडाची इमारतही शिकस्तशहरातील लहानुजीनगर परिसरात असलेली म्हाडाची इमारतही शिकस्त झाली आहे. असे असताना या इमारतीत अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.