शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

वर्धेतील ८६ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:54 IST

पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपालिकेने बजावली नोटीस : एका घरमालकाकडून इमारत पाडण्याची कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या इमारती राहण्यायोग्य नसल्याने त्यांना पाडण्याची कार्यवाही घरमालकाने करावी, अशा आशयाची नोटीस मालकांना पालिकेच्यावतीने बजावण्यात आली आहे.वर्धा शहरात अशा शिकस्त इमारतींच्या संख्येत यंदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात अशा एकूण ७५ इमारती होत्या. यात आता वाढ झाली असून हा आकडा ८६ वर पोहोचला आहे. या इमारत मालकांना पालिकेच्यावतीने नोटीसी बजावण्यात येत असल्या तरी मालकांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याचे या वाढत्या आकड्यांवरून दिसत आहे. गत वर्षी पालिका प्रशासनाकडून या इमारतींच्या मालकांनाही नोटीसी बजावण्यात आल्या होत्या. त्याच नोटीसी पुन्हा यंदाच्या सत्रात बजावण्यात आल्या आहेत. या इमारतींचा सर्व्हे सुरूच आहे.या नोटीसींवर अशा इमारत मालकांनी कार्यवाही करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. वर्धेत मुख्य बाजारासह, महादेवपुरा, रामनगर, तुकाराम वॉर्ड, गोंड प्लॉट या भागातील अनेक इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्या इमारती पाडण्याची कार्यवाही मालकांनी करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे घरमालकांनी वेळीच याचा विचार करण्याची गरज वर्तविली जात आहे.एका घरमालकाने नोटीसवर केली अंमलबजावणीनगर परिषदेकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर महादेवपुरा येथील एका घरमालकाने कार्यवाही केल्याचे दिसून आले. येथे एका इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूची इमारत शिकस्त झाली होती. ती इमारत पाडण्याची कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस बंदोबस्तात करण्यात आली; मात्र भाडेकरूकडून बराच वेळ गोंधळ घालण्यात आला होता.म्हाडाची इमारतही शिकस्तशहरातील लहानुजीनगर परिसरात असलेली म्हाडाची इमारतही शिकस्त झाली आहे. असे असताना या इमारतीत अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.