शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतील ८६ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:54 IST

पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपालिकेने बजावली नोटीस : एका घरमालकाकडून इमारत पाडण्याची कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या इमारती राहण्यायोग्य नसल्याने त्यांना पाडण्याची कार्यवाही घरमालकाने करावी, अशा आशयाची नोटीस मालकांना पालिकेच्यावतीने बजावण्यात आली आहे.वर्धा शहरात अशा शिकस्त इमारतींच्या संख्येत यंदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात अशा एकूण ७५ इमारती होत्या. यात आता वाढ झाली असून हा आकडा ८६ वर पोहोचला आहे. या इमारत मालकांना पालिकेच्यावतीने नोटीसी बजावण्यात येत असल्या तरी मालकांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याचे या वाढत्या आकड्यांवरून दिसत आहे. गत वर्षी पालिका प्रशासनाकडून या इमारतींच्या मालकांनाही नोटीसी बजावण्यात आल्या होत्या. त्याच नोटीसी पुन्हा यंदाच्या सत्रात बजावण्यात आल्या आहेत. या इमारतींचा सर्व्हे सुरूच आहे.या नोटीसींवर अशा इमारत मालकांनी कार्यवाही करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. वर्धेत मुख्य बाजारासह, महादेवपुरा, रामनगर, तुकाराम वॉर्ड, गोंड प्लॉट या भागातील अनेक इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्या इमारती पाडण्याची कार्यवाही मालकांनी करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे घरमालकांनी वेळीच याचा विचार करण्याची गरज वर्तविली जात आहे.एका घरमालकाने नोटीसवर केली अंमलबजावणीनगर परिषदेकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर महादेवपुरा येथील एका घरमालकाने कार्यवाही केल्याचे दिसून आले. येथे एका इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूची इमारत शिकस्त झाली होती. ती इमारत पाडण्याची कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस बंदोबस्तात करण्यात आली; मात्र भाडेकरूकडून बराच वेळ गोंधळ घालण्यात आला होता.म्हाडाची इमारतही शिकस्तशहरातील लहानुजीनगर परिसरात असलेली म्हाडाची इमारतही शिकस्त झाली आहे. असे असताना या इमारतीत अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.