शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जिल्ह्यातील 76 हजार 549 शिष्यवृत्ती प्रकरणे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

२०२१-२२मध्ये प्राप्त तरतुदीनुसार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (ओबीसी/एससी), मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना (ओबीसी) आदी शिष्यवृत्तींची ८ हजार १७४ प्रकरणे निकाली निघाली असून, विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बॅंकेकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र, २०१९-२०, २०२०-२१ तसेच २०२१-२२ या सत्रातील प्राप्त परंतु तरतुदीअभावी प्रलंबित असलेल्या  ७६ हजार  ५४९ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी निधीचा  पाठपुरावा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सुरू आहे.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा (आर्वी) : शासनाकडून विविध शिष्यवृत्ती ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी व इतरही पात्र विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र,  मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वर्धा जिल्ह्यातील ७६ हजार ५४९  विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून निधीसाठी पाठपुरावा केला जात आहे. २०२१-२२मध्ये प्राप्त तरतुदीनुसार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (ओबीसी/एससी), मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना (ओबीसी) आदी शिष्यवृत्तींची ८ हजार १७४ प्रकरणे निकाली निघाली असून, विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बॅंकेकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र, २०१९-२०, २०२०-२१ तसेच २०२१-२२ या सत्रातील प्राप्त परंतु तरतुदीअभावी प्रलंबित असलेल्या  ७६ हजार  ५४९ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी निधीचा  पाठपुरावा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सुरू आहे.अनुदानाअभावी रखडलेल्या  ओबीसींच्या शिष्यवृत्तीत  ५६ हजार ३३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०२०-२१ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पाचवी ते सातवीतील ओबीसी प्रवर्गाच्या १,३३० विद्यार्थ्यांचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. २०२०-२१चे ४७७ आणि २०२१-२२चे २,१७३ असे एकूण २,६५० प्रस्ताव प्रलंबित आहेत. तर २०१९-२० सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे  आठवी ते दहावी प्रवर्गाच्या उपलब्ध तरतुदीनुसार २,५६५ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले. २०१९-२०चे २७०, २०२०-२१चे ३०४२ आणि २०२१-२२चे २८०२ असे एकूण ६,११४ प्रस्ताव प्रलंबित आहेत.  २०१९-२०मध्ये पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या (डीएनटी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत उपलब्ध तरतुदीनुसार ३ हजार ७११ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले असून, २०१९-२०चे ७१५, २०२०-२१चे ५,३५१ आणि २०२१-२२चे ५ हजार १८५ असे एकूण  ११ हजार २५१ प्रस्ताव प्रलंबित आहेत.२०१९-२० मध्ये  पहिली ते दहावीत शिकणाऱ्या ओबीसी इतर मागास व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत उपलब्ध तरतुदीनुसार ७६८ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव निकाली निघाले असून, २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२चे एकूण ५६ हजार ३३४ प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी भर पडली आहे.

सर्व शाळा, महाविद्यालयांना सूचना  -    २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या सत्रातील प्रस्ताव सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर तपासून घ्यावे. त्रुटी असल्यास त्या योजनेचे प्रस्ताव दुरुस्त करून नव्याने सादर करावे. विद्यार्थ्यांचे खाते क्रमांकात दुरुस्ती असल्यास सुधारित खाते क्रमांक कार्यालयाला सादर करावे. विद्यार्थ्यांना सूचना देऊन शिष्यवृत्ती जमा झाली  की नाही, याबाबत बँक खाते पुस्तकावर नोंद घेण्यास सूचित करावे. कार्यालयाच्या लेखापरीक्षणावेळी आवश्यकतेनुसार प्रस्ताव उपलब्ध करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी सर्व शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत. 

ओबीसी प्रवर्ग मोठा असल्याने मागील तीन  वर्षांचे मिळून त्यांची प्रलंबित संख्याही जास्त आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र झाल्यानंतर या योजना अस्तित्वात आल्या असून, सध्या जिल्हास्तरावर समाजकल्याण विभागाकडून अंमलबजावणी केली जाते. जिल्हा कार्यालयाद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अनुदानाची मागणी केली जाते. प्राप्त अनुदानानुसार शिष्यवृत्ती प्रस्ताव निकाली काढण्यात येतात.- गोपाल अनासने, अधीक्षक, समाजकल्याण विभाग, जि. प.

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती