शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

७,१८६ लाभार्थ्यांना मिळणार ‘सौभाग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:49 IST

अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे. वर्धेत या योजनेचा लाभ एकूण ७ हजार १६८ लाभार्थ्यांना होणार आहे. यात ४,७६८ एपीएल आणि २ हजार ३८८ लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीज जोडणी देण्याकरिता पंतप्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत दारिद्रय रेषेखाली असलेल्या घराला मोफत जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे अंधारात राहणाऱ्या या घरात आता उजेड दिसण्याची शक्यता आहे.दारिद्र्य रेषेखाली असलेल्या घरांना दीड पॉइंटची वीज फिटींग आणि एक बल्ब मोफत देण्यात येणार आहे. यात त्यांच्याकडून कुठलेही शुल्क आकरण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर एपीएल यादीत असलेल्या लाभार्थ्यांना ५०० रुपये भरावे लागणार आहे. ही रक्कम त्यांना एकमुस्त नाही तर प्रत्येक देयकात लागून येणार असल्याने त्यांना विशेष ताण बसणार नसल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे.योजनेचा लाभ घेण्याकरिता संबधितांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. शिवाय या योजनेचा लाभ नागरिकांना व्हावा याकरिता महावितरणच्यावतीने शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेत अंधाऱ्या घरात उजेड करण्याचे आवाहन आहे.केरोसीन बचतीवर भरग्रामीण भागात घरात दिवा जाळण्याकरिता केरोसीन आवश्यक आहे. यामुळे केरोसीनचा काळाबाजार होत असल्याने त्यावर आळा घालणेही यातून शक्य होणार आहे. यामुळे शासनाने ही योजना राबविण्याकडे विशेष लक्ष पुरविले असल्याचे दिसत आहे.२८ गावांत लागणार कॅम्पडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून सुरू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ सर्व गरजवंतांना मिळावा याकरिता जिल्ह्यात तब्बल २८ गावांत कॅम्प लागणार आहे. या कॅम्पात सहभागी होवून नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आहे. ही योजना ५ मे २०१८ पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.एपीएल धारकांना देयकात ५० रुपये अतिरिक्तयोजनेचा लाभ दारिद्रय रेषेखाली असलेल्या नागरिकांना मोफत आहे तर एपीएल धारकांना ५०० रुपये भरावे लागणार आहे. ही रक्कम त्यांना एकवेळ नाही तर टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा आहे. वीज जोडणी झाल्यानंतर येणाºया प्रत्येक देयकात या रकमेपोटी ५० रुपये वाढीव येणार असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीज