शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

७,१८६ लाभार्थ्यांना मिळणार ‘सौभाग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:49 IST

अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे. वर्धेत या योजनेचा लाभ एकूण ७ हजार १६८ लाभार्थ्यांना होणार आहे. यात ४,७६८ एपीएल आणि २ हजार ३८८ लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीज जोडणी देण्याकरिता पंतप्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत दारिद्रय रेषेखाली असलेल्या घराला मोफत जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे अंधारात राहणाऱ्या या घरात आता उजेड दिसण्याची शक्यता आहे.दारिद्र्य रेषेखाली असलेल्या घरांना दीड पॉइंटची वीज फिटींग आणि एक बल्ब मोफत देण्यात येणार आहे. यात त्यांच्याकडून कुठलेही शुल्क आकरण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर एपीएल यादीत असलेल्या लाभार्थ्यांना ५०० रुपये भरावे लागणार आहे. ही रक्कम त्यांना एकमुस्त नाही तर प्रत्येक देयकात लागून येणार असल्याने त्यांना विशेष ताण बसणार नसल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे.योजनेचा लाभ घेण्याकरिता संबधितांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. शिवाय या योजनेचा लाभ नागरिकांना व्हावा याकरिता महावितरणच्यावतीने शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेत अंधाऱ्या घरात उजेड करण्याचे आवाहन आहे.केरोसीन बचतीवर भरग्रामीण भागात घरात दिवा जाळण्याकरिता केरोसीन आवश्यक आहे. यामुळे केरोसीनचा काळाबाजार होत असल्याने त्यावर आळा घालणेही यातून शक्य होणार आहे. यामुळे शासनाने ही योजना राबविण्याकडे विशेष लक्ष पुरविले असल्याचे दिसत आहे.२८ गावांत लागणार कॅम्पडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून सुरू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ सर्व गरजवंतांना मिळावा याकरिता जिल्ह्यात तब्बल २८ गावांत कॅम्प लागणार आहे. या कॅम्पात सहभागी होवून नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आहे. ही योजना ५ मे २०१८ पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.एपीएल धारकांना देयकात ५० रुपये अतिरिक्तयोजनेचा लाभ दारिद्रय रेषेखाली असलेल्या नागरिकांना मोफत आहे तर एपीएल धारकांना ५०० रुपये भरावे लागणार आहे. ही रक्कम त्यांना एकवेळ नाही तर टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा आहे. वीज जोडणी झाल्यानंतर येणाºया प्रत्येक देयकात या रकमेपोटी ५० रुपये वाढीव येणार असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीज