शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

७०२ शेतकऱ्यांना नाकारला पीक विमा

By admin | Updated: June 22, 2017 00:28 IST

खरीप व रबी हंगामातील पिकांना विम्याचे कवच मिळावे म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला नोटीस : १४.७५ कोटी रुपये कंपनीच्या घशात लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : खरीप व रबी हंगामातील पिकांना विम्याचे कवच मिळावे म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे. यात जिल्ह्यातील ९६ हजार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला; पण जिल्ह्यातील केवळ २०९ प्रकरणांत विम्याचा लाभ देत ७०२ शेतकऱ्यांना विमा नाकारणत आला. ९ लाख ७५ हजार ८५ रुपये देत उर्वरित १४.७५ कोटी रुपये विमा कंपनीने हडप केले. यात जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला नोटीस दिला आहे. निसर्गाची अवकृपा झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पूर्वी हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात होती. मागील वर्षीपासून ही योजना पंतप्रधान पीक विमा योजना नावाने राबविण्यात येत आहे. २०१६-१७ या वर्षातील वर्धा जिल्ह्याचे पीक विम्याचे काम रिलायन्स विमा कंपनीकडे सोपविण्यात आले होते. जिल्ह्यातील ९६ हजार १७९ कर्जदार, गैरकर्जदार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता अदा केला. यापोटी विमा कंपनीला तब्बल १४ कोटी ८५ लाख रुपयांचा हप्ता पोहोचता झाला आहे. या शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास संबंधित कंपनीने विम्याचा लाभ देणे क्रमप्राप्त होते; पण सदर कंपनीने शेतकऱ्यांचे १४ कोटी ७५ लाख २४ हजार ९१५ रुपये हडप केल्याचेच दिसून येत आहे. पीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्ह्यातील ९११ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. कृषी विभागाच्या माध्यमातून याबाबत कंपनीकडे प्रस्तावही सादर करण्यात आले होते. याबाबत कंपनीचे प्रतिनिधी नसले तरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याची मुभा देण्यात आली होती; पण आता कंपनी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. ९११ शेतकऱ्यांच्या तक्रारी असताना जिल्ह्यातील केवळ २०९ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ देण्यात आलेला आहे. याप्रकरणी कंपनीकडून ९ लाख ७५ हजार ८५ रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे. उर्वरित ७०२ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवित विम्याचा लाभ नाकारण्यात आला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे १४.७५ कोटी रुपये विमा कंपनीच्या घशात गेले, हे वास्तव आहे. या प्रकरणी कृषी विभागाने पाठपुरावा चालविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रारी करण्यात आल्यात. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला नोटीस जारी करीत जाब विचारला आहे. सात गावांतील शेतकऱ्यांना लाभाची प्रतीक्षा हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा, हिरापूर, धर्मापूर, वेळा, गोजी, रायफुली व दत्तापूर या गावांमध्ये १० आॅक्टोबर २०१६ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा हप्ता भरला होता. यामुळे पंचनामा, पाहणीनंतर प्रस्ताव पाठविले. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत भरपाई मिळण्याबाबत ठरावही पारित केला; पण या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात आला नाही. माजी जि.प. सदस्य मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देत भरपाईची मागणी केली आहे. विमा कंपनीकडे ९११ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील केवळ २०९ प्रस्ताव कंपनीने मंजूर केले असून ९ लाख ७५ हजार ८५ रुपयांची भरपाई दिली आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांकरिता पाठपुरावा सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कंपनीला नोटीस पाठविला आहे. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा. २८ शेतकऱ्यांचेच कंपनीने केले सर्वेक्षण पंतप्रधान पीक विमा योजनेचे काम सोपविलेल्या रिलायन्स कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा केवळ हप्ता गोळा केला. यातील १४.८५ कोटी रुपये हडप करण्याचा मनसुबा असलेल्या कंपनीने प्रारंभी केवळ २८ शेतकऱ्यांच्या शेतात प्रतिनिधी पाठवून सर्वेक्षण केल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.