शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार शेतकऱ्यांना ६.७१ कोटींची मदत

By admin | Updated: February 9, 2015 23:18 IST

खरीप हंगाम २०१४ मध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील १२० गावातील १६ हजार १०१ शेतकऱ्यांना ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयाची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे.

अरुण फाळके - कारंजा(घा.)खरीप हंगाम २०१४ मध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील १२० गावातील १६ हजार १०१ शेतकऱ्यांना ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयाची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. रकमेचे धनादेश संबंधित बँकांना पाठविण्यात आले आहे. मदतीची रक्कम ६७ टक्के असून, कारंजाचे तहसीलदार राजेंद्र बालपांडे व त्यांच्या चमुने ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्वरीत मिळावी याकरिता विशेष मोहीम राबविल्याची माहिती आहे. अतिवृष्टी, नापिकी आणि अत्यल्प भाव यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकरी यावर्षी हवालदील झाला होता. शेतीला लावलेला खर्चही निघालेला नाही. कापसाला भाव नाही. अत्यल्प भावात कापसाची विक्री करावी लागली. सोयाबीनचे भावही अत्यल्प आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकाकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. या सर्वांवर मार्ग निघून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी विधानसभेवर आर्वी ते नागपूर अशी पदयात्रा आढली. विदारक परिस्थितीची जाणीव सरकारला करून दिली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत शासनाने जाहीर केली आहे. कारंजा तालुक्यात १२० गावे आहेत. यातील ११ हजार ६०३ अल्पभूधारक तर ४ हजार ४९८ बहुभूधारक दुष्काळाचे बळी ठरले होते. अल्पभूधारकांची ८ हजार ३०१ हेक्टर तर बहूभूधारकांची ४ हजार ४९८ हेक्टर शेतजमीन बाधित झाली होती. शासनाने मदतीचा हात पुढे करून अल्पभूधारकांना ४ कोटी ३१ लाख १८, हजार ७७० रू. तर बहुभूधारकांना २, कोटी ४० लाख ५६ हजार २३० रुपये अशी एकूण ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. कोरडवाहूला प्रतिहेक्टर ४ हजार ५०० रू., बागायतीला ९ हजार रुपये तर संत्रा उत्पादकाला १२ हजार रू. प्रतिहेक्टर मतदीचा दर होता. सर्व लाभधारकांची रक्कम धनादेशाद्वारे संबंधित बँकाकडे पाठविली असून आता बँकांनी प्रत्येक लाभधारकांच्या खात्यात रक्कम वळती करावी, अशी मागणी आहे. परंतु काही बँका यासाठी टाळाटाळ करीत आहे.