शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

१६ हजार शेतकऱ्यांना ६.७१ कोटींची मदत

By admin | Updated: February 9, 2015 23:18 IST

खरीप हंगाम २०१४ मध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील १२० गावातील १६ हजार १०१ शेतकऱ्यांना ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयाची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे.

अरुण फाळके - कारंजा(घा.)खरीप हंगाम २०१४ मध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील १२० गावातील १६ हजार १०१ शेतकऱ्यांना ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयाची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. रकमेचे धनादेश संबंधित बँकांना पाठविण्यात आले आहे. मदतीची रक्कम ६७ टक्के असून, कारंजाचे तहसीलदार राजेंद्र बालपांडे व त्यांच्या चमुने ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्वरीत मिळावी याकरिता विशेष मोहीम राबविल्याची माहिती आहे. अतिवृष्टी, नापिकी आणि अत्यल्प भाव यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकरी यावर्षी हवालदील झाला होता. शेतीला लावलेला खर्चही निघालेला नाही. कापसाला भाव नाही. अत्यल्प भावात कापसाची विक्री करावी लागली. सोयाबीनचे भावही अत्यल्प आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकाकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. या सर्वांवर मार्ग निघून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी विधानसभेवर आर्वी ते नागपूर अशी पदयात्रा आढली. विदारक परिस्थितीची जाणीव सरकारला करून दिली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत शासनाने जाहीर केली आहे. कारंजा तालुक्यात १२० गावे आहेत. यातील ११ हजार ६०३ अल्पभूधारक तर ४ हजार ४९८ बहुभूधारक दुष्काळाचे बळी ठरले होते. अल्पभूधारकांची ८ हजार ३०१ हेक्टर तर बहूभूधारकांची ४ हजार ४९८ हेक्टर शेतजमीन बाधित झाली होती. शासनाने मदतीचा हात पुढे करून अल्पभूधारकांना ४ कोटी ३१ लाख १८, हजार ७७० रू. तर बहुभूधारकांना २, कोटी ४० लाख ५६ हजार २३० रुपये अशी एकूण ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. कोरडवाहूला प्रतिहेक्टर ४ हजार ५०० रू., बागायतीला ९ हजार रुपये तर संत्रा उत्पादकाला १२ हजार रू. प्रतिहेक्टर मतदीचा दर होता. सर्व लाभधारकांची रक्कम धनादेशाद्वारे संबंधित बँकाकडे पाठविली असून आता बँकांनी प्रत्येक लाभधारकांच्या खात्यात रक्कम वळती करावी, अशी मागणी आहे. परंतु काही बँका यासाठी टाळाटाळ करीत आहे.