शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पवनार येथे ६५ मेंढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:54 IST

येथील मेंढपाळाच्या अचानक ६५ मेंढ्या दगावल्याने त्याच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. करण रामा रब्बारी या मेंढपाळाच्या यात २ लाख ६० हजाराचे नुकसान झाले. ही घटना पवनार शिवारात सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देविषबाधेचा संशय : मेंढपाळाचे २.६० लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येथील मेंढपाळाच्या अचानक ६५ मेंढ्या दगावल्याने त्याच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. करण रामा रब्बारी या मेंढपाळाच्या यात २ लाख ६० हजाराचे नुकसान झाले. ही घटना पवनार शिवारात सकाळी उघडकीस आली.खरीप हंगामात खाली झालेल्या कपाशीच्या शेतात मेंढपाळ आपला मुक्काम करतात. आज या शेतात तर उद्या त्या शेतात असा त्यांचा प्रवास असतो. घटनेच्या दिवशी मेंढपाळाने आपला बेढा बाबाराव सोनटक्के यांच्या शेतात टाकला. एक दिवस कपाशीचे दोन चराई करून दुसरे दिवशी दुपारी नदीवर पाणी पाजून आणल्यानंतर मेंढ्यांना जागी बांधून ठेवण्यात आले. करणकडे एकूण ६०० मेंढ्या आहेत यापैकी ५२ मेंढ्या सोमवारच्या रात्री अचानक मृतावस्थेत दिसून आल्या.सध्या कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप आहे. या प्रकोपातून बचावाकरिता शेतकºयांनी विविध घातक विषारी औषधांची फवारणी केली आहे. यामुळे मेंढ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असून कपाशी खाल्याने झाली नाही, हे स्पष्ट होते. मेंढीधारकाला विम्याबाबत विचारणा केली असता विमा नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला विम्याचीही भरपाई मिळणार नाही. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनवीज यांना याबाबत माहिती दिली असून शवविच्छेदनकरिता चमूला पाचारण करणार असल्याचे सांगितले. कृषी सहाय्यक प्रशांत भोयर यांनाही या प्रकाराची सूचना करण्यात आली आहे. त्यांनी सुध्दा घटनास्थळाला भेट देवून वरिष्ठांना माहिती देत असल्याचे सांगितले.वेळीच सावधानता बाळगणे गरजेचेपवनार येथे करण रब्बारी नामक मेंढपाळाच्या मेंढ्या दगावल्या. यात त्याने मोठे नुकसान झाले. त्याचे हे नुकसान भरून निघणे कठीण आहे. त्याच्या मेंढ्या विषबाधाने दगावल्या असे बोलले जात आहे. असे असेल तर ठीक. मात्र जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या बोंडअळीच्या प्रकोपाणे जर या मेंढ्या दगावल्या असतील तर शेतकºयांकरिता ही धोक्याची घंटा आहे. कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त बोंड बैलांना वा जनावरांना खायला दिल्यास यात विषबाधा होवून जनावरांचा मृत्यू उद्भवण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकºयांनी वेळीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.