शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

६३ गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:14 IST

तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला.

ठळक मुद्देतीन गावे टंचाईग्रस्त : पंचायत समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना कृती आराखडा सादर

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. टंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे, विहिरीचे अधिग्रहण व खोलीकरण तसेच नवीन हातपंप बसविणे आदी कामांचा समावेश करण्यात आला.पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत तालुक्यातील लक्ष्मीनारायणपूर, शेकापूर, तळणी (भागवत) आदी गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले आहे. या गावांमध्ये विहीर अधिग्रहण व खोलीकरण आणि टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतेक गावात पाणीपुरवठा योजनेव्दारे विहिरीवरुन नळाने पाणीपुरवठा केल्या जातो.परंतु या विहिरींनीही तळ गाठल्यामुळे गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्यातच देवळी शहर व ग्रामीण भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीबाणी उद्भवली आहे.मे महिन्यात ही पाणीबाणी आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.उपाययोजनांकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर मदारतालुक्यात पाणीटंचाई असतानाही टंचाई निवारणार्थ पंचायत समिती स्तरावर कोणताही फंड उपलब्ध नाही. आणीबाणीच्या काळात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर अवलंबून रहावे लागत आहे.देवळी शहराची ३५ कोटीची पाणीपुरवठा योजना गेल्या सहा वर्षांपासून पूर्णत्वास गेली नाही. जीवन प्राधिकरण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाणी पुरवठ्याची अनेक कामे खोळंबली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ सहाकार्य करण्याची मागणी होत आहे.नळ योजनेने सार्वजनिक विहिरी निकामीतालुक्यात ५३६ सार्वजनिक विहिरी, ६१२ हातपंप व ११ हातपंपावर विद्युत पंप कार्यरत आहे.परंतु गावातील बहुतेक विहिरी नळ योजनेमुळे निकामी पडल्या आहे. अशा विहिरीतील पाण्याचा उपसा नसल्याने अनेक विहिरीत गाळ साचून दुर्लक्षित आहे. प्रशासनाने लक्ष घालून या विहिरीचे खोलीकरण व गाळ उपसण्याची कामे हाती घेणे गरजेचे झाले आहे. तसेच ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून बंदावस्थेत असलेले हातपंपाच्या दुरुस्तीकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई