शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

६३ गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:14 IST

तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला.

ठळक मुद्देतीन गावे टंचाईग्रस्त : पंचायत समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना कृती आराखडा सादर

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. टंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे, विहिरीचे अधिग्रहण व खोलीकरण तसेच नवीन हातपंप बसविणे आदी कामांचा समावेश करण्यात आला.पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत तालुक्यातील लक्ष्मीनारायणपूर, शेकापूर, तळणी (भागवत) आदी गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले आहे. या गावांमध्ये विहीर अधिग्रहण व खोलीकरण आणि टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतेक गावात पाणीपुरवठा योजनेव्दारे विहिरीवरुन नळाने पाणीपुरवठा केल्या जातो.परंतु या विहिरींनीही तळ गाठल्यामुळे गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्यातच देवळी शहर व ग्रामीण भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीबाणी उद्भवली आहे.मे महिन्यात ही पाणीबाणी आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.उपाययोजनांकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर मदारतालुक्यात पाणीटंचाई असतानाही टंचाई निवारणार्थ पंचायत समिती स्तरावर कोणताही फंड उपलब्ध नाही. आणीबाणीच्या काळात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर अवलंबून रहावे लागत आहे.देवळी शहराची ३५ कोटीची पाणीपुरवठा योजना गेल्या सहा वर्षांपासून पूर्णत्वास गेली नाही. जीवन प्राधिकरण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाणी पुरवठ्याची अनेक कामे खोळंबली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ सहाकार्य करण्याची मागणी होत आहे.नळ योजनेने सार्वजनिक विहिरी निकामीतालुक्यात ५३६ सार्वजनिक विहिरी, ६१२ हातपंप व ११ हातपंपावर विद्युत पंप कार्यरत आहे.परंतु गावातील बहुतेक विहिरी नळ योजनेमुळे निकामी पडल्या आहे. अशा विहिरीतील पाण्याचा उपसा नसल्याने अनेक विहिरीत गाळ साचून दुर्लक्षित आहे. प्रशासनाने लक्ष घालून या विहिरीचे खोलीकरण व गाळ उपसण्याची कामे हाती घेणे गरजेचे झाले आहे. तसेच ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून बंदावस्थेत असलेले हातपंपाच्या दुरुस्तीकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई