शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

६३ गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:14 IST

तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला.

ठळक मुद्देतीन गावे टंचाईग्रस्त : पंचायत समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना कृती आराखडा सादर

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. टंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे, विहिरीचे अधिग्रहण व खोलीकरण तसेच नवीन हातपंप बसविणे आदी कामांचा समावेश करण्यात आला.पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत तालुक्यातील लक्ष्मीनारायणपूर, शेकापूर, तळणी (भागवत) आदी गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले आहे. या गावांमध्ये विहीर अधिग्रहण व खोलीकरण आणि टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतेक गावात पाणीपुरवठा योजनेव्दारे विहिरीवरुन नळाने पाणीपुरवठा केल्या जातो.परंतु या विहिरींनीही तळ गाठल्यामुळे गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्यातच देवळी शहर व ग्रामीण भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीबाणी उद्भवली आहे.मे महिन्यात ही पाणीबाणी आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.उपाययोजनांकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर मदारतालुक्यात पाणीटंचाई असतानाही टंचाई निवारणार्थ पंचायत समिती स्तरावर कोणताही फंड उपलब्ध नाही. आणीबाणीच्या काळात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर अवलंबून रहावे लागत आहे.देवळी शहराची ३५ कोटीची पाणीपुरवठा योजना गेल्या सहा वर्षांपासून पूर्णत्वास गेली नाही. जीवन प्राधिकरण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाणी पुरवठ्याची अनेक कामे खोळंबली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ सहाकार्य करण्याची मागणी होत आहे.नळ योजनेने सार्वजनिक विहिरी निकामीतालुक्यात ५३६ सार्वजनिक विहिरी, ६१२ हातपंप व ११ हातपंपावर विद्युत पंप कार्यरत आहे.परंतु गावातील बहुतेक विहिरी नळ योजनेमुळे निकामी पडल्या आहे. अशा विहिरीतील पाण्याचा उपसा नसल्याने अनेक विहिरीत गाळ साचून दुर्लक्षित आहे. प्रशासनाने लक्ष घालून या विहिरीचे खोलीकरण व गाळ उपसण्याची कामे हाती घेणे गरजेचे झाले आहे. तसेच ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून बंदावस्थेत असलेले हातपंपाच्या दुरुस्तीकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई