शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
2
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
3
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
4
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
5
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
6
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
7
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
8
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
11
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
12
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
13
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
14
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
15
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
16
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
17
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
18
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
19
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
20
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
Daily Top 2Weekly Top 5

६३ गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:14 IST

तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला.

ठळक मुद्देतीन गावे टंचाईग्रस्त : पंचायत समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना कृती आराखडा सादर

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. टंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करणे, विहिरीचे अधिग्रहण व खोलीकरण तसेच नवीन हातपंप बसविणे आदी कामांचा समावेश करण्यात आला.पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत तालुक्यातील लक्ष्मीनारायणपूर, शेकापूर, तळणी (भागवत) आदी गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले आहे. या गावांमध्ये विहीर अधिग्रहण व खोलीकरण आणि टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतेक गावात पाणीपुरवठा योजनेव्दारे विहिरीवरुन नळाने पाणीपुरवठा केल्या जातो.परंतु या विहिरींनीही तळ गाठल्यामुळे गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्यातच देवळी शहर व ग्रामीण भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीबाणी उद्भवली आहे.मे महिन्यात ही पाणीबाणी आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.उपाययोजनांकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर मदारतालुक्यात पाणीटंचाई असतानाही टंचाई निवारणार्थ पंचायत समिती स्तरावर कोणताही फंड उपलब्ध नाही. आणीबाणीच्या काळात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागावर अवलंबून रहावे लागत आहे.देवळी शहराची ३५ कोटीची पाणीपुरवठा योजना गेल्या सहा वर्षांपासून पूर्णत्वास गेली नाही. जीवन प्राधिकरण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाणी पुरवठ्याची अनेक कामे खोळंबली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ सहाकार्य करण्याची मागणी होत आहे.नळ योजनेने सार्वजनिक विहिरी निकामीतालुक्यात ५३६ सार्वजनिक विहिरी, ६१२ हातपंप व ११ हातपंपावर विद्युत पंप कार्यरत आहे.परंतु गावातील बहुतेक विहिरी नळ योजनेमुळे निकामी पडल्या आहे. अशा विहिरीतील पाण्याचा उपसा नसल्याने अनेक विहिरीत गाळ साचून दुर्लक्षित आहे. प्रशासनाने लक्ष घालून या विहिरीचे खोलीकरण व गाळ उपसण्याची कामे हाती घेणे गरजेचे झाले आहे. तसेच ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून बंदावस्थेत असलेले हातपंपाच्या दुरुस्तीकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई