शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

वर्धा जिल्ह्यातील ७६२ पीडितांना ६.१३ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित

By महेश सायखेडे | Updated: September 5, 2022 18:39 IST

पोलीस तपासानंतर अधिनियमान्वये पात्र ठरलेल्या पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर केले जाते.

वर्धा : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमान्वये अनुसूचित जाती व जमातीच्या पीडित व्यक्तींना राज्य शासनाच्या वतीने अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात ७६२ पीडित व्यक्तींना तब्बल सहा कोटी तेरा लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी व या जाती-जमातीतील पीडित व्यक्तींना अर्थसाहाय्य मंजूर करण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीसमोर वेळोवेळी सादर झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रकरणनिहाय पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते. या कायद्यांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस तपासानंतर अधिनियमान्वये पात्र ठरलेल्या पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर केले जाते. अर्थसाहाय्य मंजूर होणाऱ्या प्रकरणांमध्ये शिवीगाळ, गंभीर दुखापत, विनयभंग, बलात्कार, हत्येचा प्रयत्न व हत्या झाल्यास संबंधित पीडित व्यक्तीस किंवा कुटुंबीयांस १ लाख ते ८ लाख २५ हजारांपर्यंत अर्थसाहाय्य मंजूर केले जाते. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर टप्याटप्याने मदतीची रक्कम वितरित करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत ७६२ पीडित व्यक्तींना ६ कोटी १३ लाखांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत पीडित व्यक्तींना वेळीच अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांनीच काम करावे. जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रांअभावी अर्थसाहाय्य प्रलंबित राहू नये. कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विशेष पाठपुरावा करून ही प्रकरणे निकाली काढण्यात यावीत. प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी पुढील बैठकीत सर्व उपविभागीय महसूल अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाचारण करण्यात येणार आहे.

- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Governmentसरकारwardha-acवर्धा