शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वर्धा जिल्ह्यातील ७६२ पीडितांना ६.१३ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित

By महेश सायखेडे | Updated: September 5, 2022 18:39 IST

पोलीस तपासानंतर अधिनियमान्वये पात्र ठरलेल्या पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर केले जाते.

वर्धा : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमान्वये अनुसूचित जाती व जमातीच्या पीडित व्यक्तींना राज्य शासनाच्या वतीने अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात ७६२ पीडित व्यक्तींना तब्बल सहा कोटी तेरा लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी व या जाती-जमातीतील पीडित व्यक्तींना अर्थसाहाय्य मंजूर करण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीसमोर वेळोवेळी सादर झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रकरणनिहाय पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते. या कायद्यांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस तपासानंतर अधिनियमान्वये पात्र ठरलेल्या पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर केले जाते. अर्थसाहाय्य मंजूर होणाऱ्या प्रकरणांमध्ये शिवीगाळ, गंभीर दुखापत, विनयभंग, बलात्कार, हत्येचा प्रयत्न व हत्या झाल्यास संबंधित पीडित व्यक्तीस किंवा कुटुंबीयांस १ लाख ते ८ लाख २५ हजारांपर्यंत अर्थसाहाय्य मंजूर केले जाते. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर टप्याटप्याने मदतीची रक्कम वितरित करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत ७६२ पीडित व्यक्तींना ६ कोटी १३ लाखांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत पीडित व्यक्तींना वेळीच अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांनीच काम करावे. जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रांअभावी अर्थसाहाय्य प्रलंबित राहू नये. कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विशेष पाठपुरावा करून ही प्रकरणे निकाली काढण्यात यावीत. प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी पुढील बैठकीत सर्व उपविभागीय महसूल अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाचारण करण्यात येणार आहे.

- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Governmentसरकारwardha-acवर्धा