शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदान

By admin | Updated: April 23, 2015 01:45 IST

जिल्ह्यात बुधवारी १४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले.

वर्धा : जिल्ह्यात बुधवारी १४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ११८ जागेसाठी एकूण ३४१ उमेदवार रिंगणात उभे होते. त्याचप्रमाणे पोटनिवडणुकांमध्ये १७ जागेसाठी एकूण ६२ उमेदवार रिगणात उभे होते. जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदान झाले. तळेगाव(श्या.) येथे एका कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. या घटनेव्यतिक्ति मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तसेच रखरखत्या उन्हातही नागरिकांनी उत्साहाने मतदान केले. गुरुवारी मतमोजणी होणार असून याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजंती, वणी, सिरूड, मोझरी(शे.) आणि कापसी, समुद्रपूर येथील गिरड, कांढळी, लाहोरी, दसोडा, उसेगाव, आष्टी(श.) तालुक्यातील तळेगाव(श्या.पंत) आणि थार, तर कारंजा तालुक्यातील मेटहिरजी, धानोली या १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. वर्धा तालुक्यातील सेलसुरा, सालोड (हि.), चितोडा, सावंगी (मेघे), सेलू तालुक्यात दहेगाव, देऊळगाव, हमदापूर, जुनोना तर आर्वी तालुक्यात सालफळ व हिंगणघाट तालुक्यात सावंगी (हेटी), कारंजा तालुक्यात खैरवाडा, सिंदी (विहिरी), तरोडा, सेलगाव (उमाटे) या ग्रामपंचायतीत पोट निवडणूक पार पडली. मतमोजणी गुरूवारी होणार आहे. या अनुषंगाने मतदान होताच कार्यकर्ते आणि उमेदवार मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त झाले.(लोकमत न्यूज नेटवर्क) जिल्ह्यात सर्वात कमी मतदान वर्धा तालुक्यात नोंदविण्यात आले. तालुक्यातील सालोड, सेलसूरा, सावंगी (मेघे), आणि चितोडा या ग्रामपंचायतीत प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यात सालोड येथे ७२.९८, सेलसूरा ३८.१, चितोडा ३४.५५ तर सावंगी (मेघे) येथे केवळ ८.७६ टक्के एवढेच मतदान नोंदविण्यात आले. हिंगणघाट तालुक्यात ६९ टक्के मतदानतालुक्यात पाच ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर एका ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यात आजंती येथे ११ जागांसाठी, लहान वणी - ९, मोझरी (शे.)-९, कापशी- ४ आणि शिरूड येथे ९ जागांसाठी सार्वत्रिक तर सावंगी (हेटी) येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली. समुद्रपूर तालुक्यात ८८.३ टक्के मतदान तालुक्यात पाच ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. उसेगाव, दसोडा, गिरड, लाहोरा आणि कांढळी येथे सार्वत्रिक निवडणुकीत ४७ जागांकरिता मतदान घेण्यात आले. तालुक्यात एकूण ८८.३ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे, उसेगाव येथे पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.