शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

सहा न.प.चा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:17 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या (नागरी) धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देखासदारांची माहिती : नगर विकास विभागाचे आदेश जारी

आॅनलाईन लोकमतवर्धा : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या (नागरी) धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील देवळी, पुलगाव, हिंगणघाट, वर्धा, सिंदी (रेल्वे) आणि आर्वी या सहा नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला नगर विकास विभागाने मंजुरी प्रदान केली आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत वर्धा नगर पालिकेला ४ कोटी ४० लाख रुपये, आर्वीला २ कोटी २८ लाख रुपये, सिंदी (रेल्वे) नगर परिषदेला १ कोटी ३५ लाख रुपये, पुलगाव पालिकेला २ कोटी ५० लाख रुपये, हिंगणघाट ४ कोटी ६३ लाख तर देवळी नगर परिषदेकरिता १ कोटी ४६ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या रकमेतून घनकचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पाच्या सविस्तर अहवालाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिली असून त्यानंतर भारतातील नामवंत निरी या संस्थेने प्रकल्पाचे मुल्यांकन केले आहे. त्यानुसार मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने सर्व प्रकल्पांना अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या उदात्त हेतूने केंद्र आणि राज्य शासन सतत प्रयत्नशील आहे. त्याचा परिणाम म्हणून केंद्र व राज्य शासनाने एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केले आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने शहरातील कचºयाची विल्हेवाट लावताना येणाºया अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे. शिवाय शासनाकडून निधी उपलब्ध होणार असल्याने पालिका प्रशासनालाही कचºयाचा विषय गांभीर्याने घेऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सहकार्य मिळेल.नियोजनाअभावी पूर्वीच्या प्रकल्पांचा बोजवाराराज्यात यापूर्वीही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत चर्चा झाल्या. अनेक ठिकाणी हे प्रकल्प हाती घेण्यात आले; पण यात कुठलेही नियोजन नव्हते. परिणामी, त्या प्रकल्पांची वासलात लागल्याचेच दिसून येते. हे चित्र फार दूर नव्हे तर जिल्ह्यातच सर्वत्र दिसून येते. वर्धा, पुलगाव, हिंगणघाट आदी नगर परिषदांद्वारे डम्पिंग ग्राऊंड ही संकल्पना राबविण्यात आली. यातून खत निर्मितीच्या बाता करण्यात आल्या; पण कुठेही यावर अंमल झाल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदांना पूरेसा निधीही पुरविला गेला नाही. यामुळे नगर परिषदांना शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता केंद्र व राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरीसह निधीही उपलब्ध करून दिल्याने चर्चेतील बाबी सत्यात उतरणार आहेत. यामुळे शहरेही स्वच्छ होतील.