शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

५४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित?

By admin | Updated: January 23, 2017 00:37 IST

दहावीनंतर विविध शाखेचे पूढील शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती,

वर्धा : दहावीनंतर विविध शाखेचे पूढील शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाद्वारे स्कॉलरशीप व फ्रिशीप दिली जाते. यंदा जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील एकूण ३६ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केले आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ ४ हजार ३०७ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. यावर्षासह गत सहा सत्रांची माहिती घेतली असता एकूण ५४ हजार ५२६ अर्ज विविध कारणांनी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर विद्यार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित तर राहणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात शिष्यवृत्ती योजना राबविताना मोठा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. समाज कल्याण उपायुक्त कार्यालयाच्यावतीने झालेल्या गैरप्रकाराबाबत संबंधितांना नोटीसही पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणात अनेक शिक्षण सम्राट व संस्थाचालक अडकले असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी चौकशी व संबंधित विभागाच्या कार्यवाहीनंतरच कोण दोषी, हे समोर येणार आहे. शिष्यवृत्ती योजनेचा गरजुंना लाभ मिळावा व सदर कार्य पारदर्शी व्हावे, यासाठी शासनाने या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्यांचे अर्ज आॅनलाईन स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. सन २०११-१२ या शैक्षणिक सत्रात विविध प्रवर्गातील एकूण ४८ हजार ८९५ अर्ज प्राप्त झाले होते. २०१२-१३ मध्ये ४९ हजार ५०४, २०१३-१४ मध्ये ४८ हजार ३६८, २०१४-१५ मध्ये ४७ हजार ३५३, २०१५-१६ मध्ये ४८ हजार १९८ आणि २०१६-१७ मध्ये आतापर्यंत ३६ हजार ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी २०११-१२ मध्ये ४५ हजार ६८६, २०१२-१३ मध्ये ४५ हजार ७०८, २०१३-१४ मध्ये ४४ हजार १४३, २०१४-१५ मध्ये ४४ हजार ५५८, २०१५-१६ मध्ये ३९ हजार ७३१ तर २०१६-१७ मध्ये आतापर्यंत केवळ ४ हजार ३०७ अर्ज निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावर्षीसह गत सहा शैक्षणिक सत्रांत आतापर्यंत एकूण २ लाख ७८ हजार ६५९ आवेदन प्राप्त झाले आहेत. यापैकी एकूण २ लाख २४ हजार १३३ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. स्कॉलरशीप व फ्रिशीपचे आजही ५४ हजार ५२६ अर्ज प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे संबंधित महाविद्यालयांनी पाठपुरावा न केल्याने, त्यात त्रूट्या असल्याने आणि अन्य काही कारणांनी प्रलंबित असल्याचेही सामाजिक न्याय विभागाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप व फ्रिशीप योजनेच्या माध्यमातून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी योग्य कार्यवाही करणे तथा महाविद्यालयांनी पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी) यंदा इतर मागासवर्गीयांची सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित स्कॉलरशीप व फ्रिशीपसाठी शैक्षणिक सत्र २०१६-१७ या वर्षाकरिता आतापर्यंत इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांचे २१ हजार ८९८, अनु. जातीचे ९ हजार ३६९, विमाप्रचे १ हजार ३५६ तर विजाभज प्रवर्गातील ३ हजार ७१८ अर्ज समाज कल्याण उपायुक्त कार्यालयात प्राप्त झाले आहेत. यापैकी इमावचे २ हजार १९०, अनु. जातीचे १ हजार ४२४, विमाप्रचे २७४ तर विजाभज प्रवर्गातील ४१९ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. इतर मागासवर्गातील १९ हजार ७०८, अजा ७ हजार ९४५, विमाप्र १ हजार ८२ तर विमुक्त जाती भटक्या जमातीची ३ हजार २९९ प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. अर्जासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे २०१६-१७ मधील नवीन अर्ज नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज स्वीकारणे सुरू आहे. योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्यांनी अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादर करणे क्रमप्राप्त आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी देण्यात आली आहे. विहित मुदतीच्या आत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण निरीक्षक प्रकाश जाधव यांनी केले आहे.