शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

पर्यटन विकासाचे ५.३२ कोटी अखर्चित

By admin | Updated: August 24, 2015 01:59 IST

जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासाकरिता एकूण ६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

केवळ १.६४ कोटींचे वितरण : संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीवर्धा : जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासाकरिता एकूण ६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पैकी १ कोटी ६४ लाख रुपये वितरित झाले असून ५ कोटी ३२ लाख रुपये अद्यापही खर्चित आहे. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाना खीळ बसली आहे. गिरड, केळझर व कापसी येथील तिर्थस्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. या स्थळांचा विकास करण्याकरिता शासनाच्यावतीने सन २०१३-१४ मध्ये हा निधी दिला. मात्र जिल्हा प्रशासनाकडून हा निधी अद्याप अखर्चित असल्याने जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला खिळ बसल्याचा आरोप वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे. हा निधी खर्च न करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी एका पत्रकाद्वारे बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे एका पत्राद्वारे केल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०११-१२ मध्ये अंतर्गत बोरधरण येथील विकास कामांकरिता १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तो निधी खर्च करण्याकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत २० मार्च २०१३ रोजी प्रशासकीय मान्यतेसह निधी वितरणाचे आदेश देण्यात आले होते. असे असताना हा निधी अद्यापही अखर्चित आहे. तो अखर्चित असल्याने या भागाच्या विकासकामांना खीळ बसली आहे. या निधीत बोरधरण भागात विविध खेळणींसह चिमुकल्यांना पिण्याकरिता पाणी, येणाऱ्या नागरिकांना बसण्याकरिता बाकांची व्यवस्था करावयाची होती. शासनाच्यावतीने रक्कम आली असताना या प्रकारातील कुठल्याही कामावर तिचा खर्च झाला नसल्याचे दिसून आले आहे.सन २०१३-१४ मध्ये समुद्रपूर तालुक्यतील गिरड येथील पर्यटन विकासाकरिता २ कोटी ६१ लाख, केळझर येथील विकासाकरिता ३ कोटी ८५ लाख रुपये तर हिंगणघाट तालुक्यातील कापसी येथे विकासकामाकरिता ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या कामांना ६ आॅगस्ट २०१४ रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता देत निधी वितरणाचे आदेश निर्गत केले. असे असताना या कामाकरिता आलेला संपूर्ण निधी अद्याप अखर्चित आहे. यामुळे या पर्यटन स्थळांचा विकास रखडला आहे. विकासाकरिता आलेला निधी विकास कामांवर खर्च न करता तो अखर्चित कशासाठी ठेवण्यात आला, हे न उलगडणारे कोडे आहे. अधिकाऱ्यांच्या या कामचुकारपणांमुळे मात्र जिल्ह्याच्या विकासकामांना खीळ बसली आहे. यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अखर्चित निधीची चौकशी करून तिचा या स्थळांचा विकास करण्याकरिता उपयोग करावा अशी मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे.केळझरच्या विकासकामांना बगल केळझर येथील मंदिर परिसराच्या सौदर्यीकरणासह स्वयंपाकघर, सभामंडप, मंदिर परिसरात सिमेंट रस्त्यासह, संरक्षक भिंत, पायऱ्यांचे बांधकाम यात करावयाचे होते. शिवाय मंदिर परिसरात व टेकडीवर रोषणाई, पिरबाबा टेकडीवर पाण्याचा पुरवठा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसराचे सौदर्यीकरण करण्याचे काम या निधीत करावयाचे होते. मात्र बांधकाम विभागाकडून कुठलेही काम करण्यात आले नाही. यामुळे या पर्यटन स्थळांना अद्यापही सौदर्य प्राप्त झाले नसल्याचा आरोप आ. भोयर यांनी केला आहे. लोकार्पणापुर्वीच गळली नवरगावची नवी आश्रमशाळा सेलू तालुक्यातीन नवरगाव येथील शासकीय आश्रमशाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले. इमारत पूर्ण झाली असताना आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीचा ताबा घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात विचारणा केली असता सदर इमारत लोकार्पण करण्यापूर्वीच आलेल्या पावसामुळे गळल्याचे येथील शिक्षकांनी सांगितल्याचेही आमदार म्हणाले.