शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

औषध खरेदीसाठी ५० लाखांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:04 IST

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने औषधी खरेदीकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमिनी मंत्रालयाच्या स्थायी समिती बैठकीत सर्वानुमते निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने औषधी खरेदीकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयास सवार्नुमते मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात गुरुवारी, २७ डिसेंबरला स्थायी समितीची सभा पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी होती. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, सभापती मुकेश भिसे, सोनाली कलोडे यांची उपस्थिती होती. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेदरम्यान आरोग्य विभागांतर्गत औषधींच्या तुटवड्याचा मुद्दा पुढे आला.जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८१ उपकेंद्र, २१ अ‍ॅलोपॅथीक दवाखाने, ११ आयुर्वेदिक दवाखाने आहेत. या दवाखान्यांना औषधीसाठा वितरण आरोग्य विभाग औषधी भांडाराअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून झालेली मागणी तसेच उपलब्ध औषधीसाठ्याच्या संख्येनुसार केले जाते. पण, औषधी पुरवठ्याचे कंत्राट असलेल्या कंपनीमार्फत वेळेवर औषधीसाठा उपलब्ध केला जात नसल्याने औषधींचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत असल्याने औषधीच्या तुटवड्यावर तोडगा काढण्याची मागणी होऊ लागली. हा मुद्दा सभागृहात चर्चेला आला. त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीमध्ये तरतूद असलेल्या ५० लाख रुपयांतून औषध खरेदीच्या ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सरकारी दवाखान्यांतील औषधींचा तुटवडा दूर होण्यास आता मदत होणार आहे.सोलर आॅटोमायजेशनसाठी शासनाकडे निधीची मागणीग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना विजेवर आधारित आहे. ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने विद्युत देयक भरताना आर्थिक अडचणी निर्माण होतात. बरेचदा आर्थिक अडचणीमुळे देयक न भरल्यास वीजपुरवठा खंडित केल्याने पाणीपुरवठा योजना बंद होतात. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजना सोलर आॅटोमायजेशन करण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला. सोलरवर पाणीपुरवठा योजना परिवर्तीत केल्यास खर्चात बचत होण्यास हातभार लागेल. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजना सोलर आॅटोमायजेशन करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करणाऱ्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :medicineऔषधंhospitalहॉस्पिटल