शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

480 गोवंशांना लम्पीची लागण; 22 जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 21:03 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील ४८० जनावरांना लम्पीने आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दाढेत नेऊ पाहिले. त्यापैकी तब्बल २२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी संकटकाळात पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पण, अनेक अधिकारी या सूचनेकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील पशुपालकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लम्पी चर्मरोगाला वेळीच ब्रेक लावण्यासाठी जिल्ह्यातील गोवंशांना रोगप्रतिबंधात्मक लस दिली जात असली, तरी लम्पीचा प्रादुर्भाव हळूहळू का होईना, वाढतच आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४८० जनावरांना लम्पीने आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दाढेत नेऊ पाहिले. त्यापैकी तब्बल २२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी संकटकाळात पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पण, अनेक अधिकारी या सूचनेकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील पशुपालकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. 

१०२ गावे बाधित- जिल्ह्यात आतापर्यंत ४८० जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. लम्पीची लागण झालेली ही जनावरे एकूण १०२ गावांत सापडली असून, याच १०२ गावांना लम्पीबाधित गावे म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

२७५ जनावरे लम्पीमुक्त- सूत्रीचा अवलंब करून पशुसंवर्धन विभाग लम्पी निर्मूलनासाठी प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात लम्पीबाधित तब्बल ४८० जनावरे सापडली असून, त्यापैकी २७५ जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत.

१८३ जनावरांवर होत आहेत उपचार- २२ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला असून २७५ जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. तर सद्य:स्थितीत १८३ ॲक्टिव्ह लम्पीबाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. प्रत्येक लम्पीबाधित जनावराला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

२.७३ लाख जनावरांना दिली प्रतिबंधात्मक लस- लम्पी निर्मूलनासाठी गोट पॉक्स ही लस प्रभावी आहे. वर्धा जिल्ह्याला लम्पी निर्मूलनासाठी आतापर्यंत गोट पॉक्स या लसीचे २ लाख ७५ हजार डोस प्राप्त झाले आहेत. याच लस साठ्याच्या जोरावर आतापर्यंत २ लाख ७३ हजार १६० गोवंशांना लम्पीची प्रतिबंधात्मक लस देऊन सुरक्षित करण्यात आले आहे.

लम्पी चर्मरोगाची लक्षणे- लम्पी चर्मरोग हा विषाणूजन्य आजार आहे. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. शिवाय प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. - सुरुवातीला जनावरास दोन-तीन दिवस ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. - या गाठी ४ ते ५ दिवसांत फुटतात आणि त्यातून पस बाहेर येतो.  या गाठी सर्वसाधारणपणे पोट, पाठ पाय व जननेंद्रियाच्या भागात येतात. - जनावरांच्या डोळ्यांतून, नाकातून पाणी येते. - तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाता येत नाही. - पायावरील गाठीमुळे जनावरे चालणे कठीण होते. - डोळ्यांमध्ये व्रण पडतात व कालांतराने दृष्टी बाधित होण्याची शक्यता असते. - न्यूमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. - अशक्तपणामुळे जनावरांचा या आजारातून बरे होण्यास बऱ्याच दिवसांचा कालावधी लागतो.- हा आजार बरा होण्यासाठी किमान  दोन तीन आठवड्यांचा कालावधी लागतो.

 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग