शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

जि.प.च्या शाळांत पदवीधर शिक्षकांची ४५१ नवीन पदे

By admin | Updated: May 23, 2014 00:06 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषदांच्या शाळांकरिता शिक्षक निर्धारणाचे कार्य अल्पावधीतच पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना जोडल्या गेलेल्या इयत्ता सहावी ते

वर्धा : शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषदांच्या शाळांकरिता शिक्षक निर्धारणाचे कार्य अल्पावधीतच पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना जोडल्या गेलेल्या इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पदवीधर शिक्षकांची ४५१ नवीन पदे कार्यरत पात्र सहायक शिक्षकांमधून भरली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांनी दिली. शिक्षण हक्क कायद्यानुसार होवू घातलेल्या शिक्षक निर्धारण, शिक्षकांचे समायोजन, पुढील शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन आणि शालार्थ वेतन प्रणाली संबंधाने प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या पदावर १४ शिक्षकांची पदोन्नती करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी तेलंग यांनी या बैठकीत सांगितले. सध्या जिल्ह्यात २६२ उच्च श्रेणी मुख्याध्यापक कार्यरत असून शिक्षण हक्क कायद्याच्या संच मान्यतेनुसार ५९ पदे कायम राहणार आहेत. उर्वरित अतिरिक्त ठरणार्‍या २०३ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांना वेतन संरक्षण देवून सामावून घेण्याची मागणी यावेळी समितीने केली. शालार्थ वेतन प्रणालीप्रमाणे होणारे वेतनास विलंब होत असल्याबाबत शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांनी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. नवीन अभ्यासक्रमाची प्रशिक्षणे व पुढील वर्षी करायच्या वार्षिक नियोजनाकरिता शिक्षक पदांचे निर्धारण, नियुक्ती आणि समायोजन कार्यवाहीची मागणी समितीने केली.(प्रतिनिधी)