शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांकडे 45 तर डीएलसीकडे सात तक्रारी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यावर या योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी विविध बँकांकडून मागविण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील ५९ हजार ३० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. त्यापैकी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करून ५२ हजार ९४३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले, तर काही शेतकऱ्यांनी अजूनही आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

ठळक मुद्दे५१,३१४ शेतकऱ्यांना मिळाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्तीचा लाभ

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील भाजप सरकारनंतर महाविकास आघाडी सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती योजना जाहीर करीत त्याची अंमलबजावणी केली. भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या तुलनेत महाविकास आघाडीची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही अधिक पारदर्शी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असले तरी तहसीलदारांकडे ४५, तर जिल्हास्तरीय समिती (डीएलसी) कडे सात तक्रारी अजूनही प्रलंबित असल्याचे वास्तव आहे.प्राप्त माहितीनुसार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यावर या योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी विविध बँकांकडून मागविण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील ५९ हजार ३० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. त्यापैकी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करून ५२ हजार ९४३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले, तर काही शेतकऱ्यांनी अजूनही आधार प्रमाणीकरण केलेले नाही. आधार प्रमाणीकरण केलेल्यापैकी ५१ हजार ३१४ शेतकऱ्यांची कर्ज खाती योजनेच्या लाभास पात्र ठरवून या कर्जखात्यांत आतापर्यंत एकूण ४५४.३५ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. असे असले तरी सध्या तहसीलदारांकडे ४५, तर जिल्हास्तरीय समितीकडे कर्जमुक्ती योजनेबाबतच्या सात तक्रारी प्रलंबित आहेत. या तक्रारी वेळीच निकाली काढण्याची गरज आहे.

१,४८५ शेतकऱ्यांनी केले नाही आधार प्रमाणीकरणमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या जिल्ह्यातील ५२ हजार ९४३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असले तरी तब्बल १ हजार ४८५ शेतकऱ्यांनी अद्यापही आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्हा उपनिबंधक विभागाच्या अडचणीत भर पडली आहे.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी