शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

४.२८ लाख हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:30 IST

जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये.

ठळक मुद्दे१०० मि.मी. पावसानंतरच पेरणी करा : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये. अल्प पावसानंतर पेरणी झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.यंदा खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस या पिकाची लागवड होणार आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे. शिवाय ज्या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे अशाच शेतकऱ्यांकडून सध्या धूळ पेरणीला गती दिली जात आहे. तळेगाव (टा.), सेलू परिसरात सध्या धूळ पेरणी केल्या जात असल्याचे दिसून येते. मात्र, पावसाने दगा दिल्यास याही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर खत आणि बियाण्यांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्ष राहूनच व्यवहार करावा, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.बियाण्यांसाठी पैशाची जुळवाजुळवमागील दोन वर्ष निसर्गाने दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या उसनवारी आणि घरच्या लक्ष्मीचे सोन्याचे दागिणे गहाण ठेऊन बियाणे खरेदी करण्याच्या कामाला काही शेतकरी प्राधान्य देत आहे. अशातच दुबार पेरणीचा फटका अनेकांना न सहन करणाराच ठरणार असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.पीक कर्ज प्रस्ताव धूळ खातवेळीच पीक कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खतांची खरेदी सहज करता येणार आहे. परंतु, काही बँकांमध्ये अनेक पीक कर्जचे प्रस्ताव धूळ खात असल्याचे दिसून येते. तर २४ जुलैपर्यंत पीक विमासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापूस गाठींचे होणार उत्पन्न२ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापूस या पिकाची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतकेच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती न येता शेतकऱ्यांवर निसर्ग मेहरबान राहिल्यास एकूण ६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापसाचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.८.९६ लाख क्विंटल उत्पादन होण्याची शक्यतायंदाच्या वर्षी खरीप हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. निसर्गाने साथ दिल्यास यंदा हंगामाच्या शेवटी एकूण ८ लाख ९६ हजार ९७८ क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.येत्या काही दिवसात दमदार पाऊस आल्यावर शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी शेती करतानाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दक्षच राहिले पाहिजे. शिवाय दुबार पेरणीला सामोरे जावे लागू नये म्हणून कमीत कमी १०० मिमी पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती