शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

४.२८ लाख हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:30 IST

जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये.

ठळक मुद्दे१०० मि.मी. पावसानंतरच पेरणी करा : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये. अल्प पावसानंतर पेरणी झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.यंदा खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस या पिकाची लागवड होणार आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे. शिवाय ज्या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे अशाच शेतकऱ्यांकडून सध्या धूळ पेरणीला गती दिली जात आहे. तळेगाव (टा.), सेलू परिसरात सध्या धूळ पेरणी केल्या जात असल्याचे दिसून येते. मात्र, पावसाने दगा दिल्यास याही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर खत आणि बियाण्यांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्ष राहूनच व्यवहार करावा, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.बियाण्यांसाठी पैशाची जुळवाजुळवमागील दोन वर्ष निसर्गाने दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या उसनवारी आणि घरच्या लक्ष्मीचे सोन्याचे दागिणे गहाण ठेऊन बियाणे खरेदी करण्याच्या कामाला काही शेतकरी प्राधान्य देत आहे. अशातच दुबार पेरणीचा फटका अनेकांना न सहन करणाराच ठरणार असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.पीक कर्ज प्रस्ताव धूळ खातवेळीच पीक कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खतांची खरेदी सहज करता येणार आहे. परंतु, काही बँकांमध्ये अनेक पीक कर्जचे प्रस्ताव धूळ खात असल्याचे दिसून येते. तर २४ जुलैपर्यंत पीक विमासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापूस गाठींचे होणार उत्पन्न२ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापूस या पिकाची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतकेच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती न येता शेतकऱ्यांवर निसर्ग मेहरबान राहिल्यास एकूण ६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापसाचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.८.९६ लाख क्विंटल उत्पादन होण्याची शक्यतायंदाच्या वर्षी खरीप हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. निसर्गाने साथ दिल्यास यंदा हंगामाच्या शेवटी एकूण ८ लाख ९६ हजार ९७८ क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.येत्या काही दिवसात दमदार पाऊस आल्यावर शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी शेती करतानाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दक्षच राहिले पाहिजे. शिवाय दुबार पेरणीला सामोरे जावे लागू नये म्हणून कमीत कमी १०० मिमी पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती