शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
7
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
8
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
9
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
10
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
11
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
12
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
13
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
14
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
15
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
16
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
17
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
18
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
19
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
20
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक

४.२५ लाख क्विंटल सोयाबीनची व्यापाऱ्यांनी केली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढली बऱ्यापैकी झाली.

ठळक मुद्देभरघोस भाववाढीची सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या मळणीच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. दिवाळीच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांनी मळणी करून सोयाबीनची थेट विक्रीही केली आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितींच्या यार्ड मध्ये शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी एकूण ४ लाख २५ हजार ६५९ क्विंटल सोयाबीनची खेरदी केल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढली बऱ्यापैकी झाली. परंतु, परतीच्या पावसाचा चांगलाच फटका अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीन पिकाला बसला आहे. शेतात कापून ढिग करून ठेवलेले सोयाबीन परतीच्या पावसादरम्यान ओले झाले. तर काही शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारात जाऊ नये म्हणून मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री केली. यंदा ३० ऑक्टोबरपर्यंत आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत २० हजार ३६८.३९ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी रेल्वेत ५९ हजार २६० क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे ३ लाख १६ हजार १११ क्विंटल, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ हजार २७ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव येथे १ हजार २७१.३९ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी येथे १२ हजार ९८४.७८ क्विंटल तर कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर येथे ६३६.८० क्विंटल सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली आहे. तशी नोंदही प्रशासनाने घेतली आहे. असे असले तरी भरघोस भाव वाढीची प्रतीक्षा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना आहे. सध्या मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत शेतकरी सोयाबीन विक्रीकरिता आणत आहेत.आद्रतेमुळे समाधानकारक भाव नाहीचपरतीच्या पावसामुळे अनेक शेतशिवारात शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले सोयाबीन ओले झाले. शिवाय ढगाळी वातावरण असल्याने पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीन वाळलेले नाही. जे सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी सध्या येत आहे त्यात आद्रता जास्त असल्याने व्यापारीही त्यावर बोट ठेवत पाहिजे तसा भाव देत नसल्याची ओरड सध्या सोयाबीन उत्पादकांकडून होत आहे.लेखी तक्रार केल्यास मिळणार नुकसान भरपाईपरतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे चांगलेच नुकसान केले आहे. जिल्ह्यात प्रत्यक्षात किती नुकसान झाले याची जुळवाजुळव सध्या शासकीय अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन परतीच्या पावसादरम्यान भिजले त्या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीबाबत लेखी स्वरूपात अर्ज आणि झालेल्या नुकसानीबाबतचे छायाचित्र तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिल्यास नुकसानग्रस्ताला नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे नुकसान केल्याचे वास्तव आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात झालेल्या नुकसानीची माहिती तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना द्यावी.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.सोयाबीन उत्पादकांनी त्यांचा शेतमाल बाजारपेठेत विक्रीकरिता आणताना वाळवून आणावा. जेणेकरून त्यांच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडूनही चांगला भाव मिळेल.- श्याम कार्लेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती