शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

४.२५ लाख क्विंटल सोयाबीनची व्यापाऱ्यांनी केली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढली बऱ्यापैकी झाली.

ठळक मुद्देभरघोस भाववाढीची सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या मळणीच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. दिवाळीच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांनी मळणी करून सोयाबीनची थेट विक्रीही केली आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितींच्या यार्ड मध्ये शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी एकूण ४ लाख २५ हजार ६५९ क्विंटल सोयाबीनची खेरदी केल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढली बऱ्यापैकी झाली. परंतु, परतीच्या पावसाचा चांगलाच फटका अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीन पिकाला बसला आहे. शेतात कापून ढिग करून ठेवलेले सोयाबीन परतीच्या पावसादरम्यान ओले झाले. तर काही शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारात जाऊ नये म्हणून मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री केली. यंदा ३० ऑक्टोबरपर्यंत आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत २० हजार ३६८.३९ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी रेल्वेत ५९ हजार २६० क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे ३ लाख १६ हजार १११ क्विंटल, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ हजार २७ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव येथे १ हजार २७१.३९ क्विंटल, कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी येथे १२ हजार ९८४.७८ क्विंटल तर कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर येथे ६३६.८० क्विंटल सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली आहे. तशी नोंदही प्रशासनाने घेतली आहे. असे असले तरी भरघोस भाव वाढीची प्रतीक्षा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना आहे. सध्या मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत शेतकरी सोयाबीन विक्रीकरिता आणत आहेत.आद्रतेमुळे समाधानकारक भाव नाहीचपरतीच्या पावसामुळे अनेक शेतशिवारात शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले सोयाबीन ओले झाले. शिवाय ढगाळी वातावरण असल्याने पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीन वाळलेले नाही. जे सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी सध्या येत आहे त्यात आद्रता जास्त असल्याने व्यापारीही त्यावर बोट ठेवत पाहिजे तसा भाव देत नसल्याची ओरड सध्या सोयाबीन उत्पादकांकडून होत आहे.लेखी तक्रार केल्यास मिळणार नुकसान भरपाईपरतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे चांगलेच नुकसान केले आहे. जिल्ह्यात प्रत्यक्षात किती नुकसान झाले याची जुळवाजुळव सध्या शासकीय अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन परतीच्या पावसादरम्यान भिजले त्या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीबाबत लेखी स्वरूपात अर्ज आणि झालेल्या नुकसानीबाबतचे छायाचित्र तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिल्यास नुकसानग्रस्ताला नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे नुकसान केल्याचे वास्तव आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात झालेल्या नुकसानीची माहिती तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना द्यावी.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.सोयाबीन उत्पादकांनी त्यांचा शेतमाल बाजारपेठेत विक्रीकरिता आणताना वाळवून आणावा. जेणेकरून त्यांच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडूनही चांगला भाव मिळेल.- श्याम कार्लेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती