शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

१३,४५६ वाहन चालकांना ४१.३१ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:15 IST

सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहेल्मेट न वापरणाऱ्या ९४३ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केली असून त्यांच्याकडून सध्या हेल्मेटसक्तीकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत.जून महिन्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आल्याने १८ वाहनचालकांवर कलम ६६(२), १९२ अन्वये कारवाई करून त्यांच्याकडून २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर विना नंबर प्लेट वाहन आढळून आल्याने २३ वाहनचालकांकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ७१२ वाहनचालकांनी त्यांची वाहने नो-पार्किंग परिसरात उभी केल्याने त्यांना १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावून त्याची वसुली करण्यात आली आहे.ट्रिपल सिट प्रवास करताना आढळून आल्याने ६० वाहनचालकांकडून १ लाख ५५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांना पाठ दाखवित राँग साईडने वाहन नेणाऱ्या २१ जणांकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दुचाकी प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर न करताना आढळल्याने ९४३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना बगल देणाऱ्या १३ हजार ४५६ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४१ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.२५ वाहनचालकांना मोबाईवर बोलणे भोवलेगत सहा महिन्यांच्या कालावधीत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी वाहनचालविताना मोबाईलवर बोलणाºयांवर ठिकठिकाणी कारवाई करून त्यांच्याकडून ३५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहनचालविताना मोबाईलवर बोलणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणाराच प्रकार असला तरी अनेक वाहनचालक याकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येते.वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ७७ जणांना दंडमागील सहा महिन्यात वाहतूक पोलिसांनी ७७ जणांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे कारण पुढे करीत त्यांच्याकडून १३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस