शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

१३,४५६ वाहन चालकांना ४१.३१ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:15 IST

सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहेल्मेट न वापरणाऱ्या ९४३ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केली असून त्यांच्याकडून सध्या हेल्मेटसक्तीकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत.जून महिन्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आल्याने १८ वाहनचालकांवर कलम ६६(२), १९२ अन्वये कारवाई करून त्यांच्याकडून २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर विना नंबर प्लेट वाहन आढळून आल्याने २३ वाहनचालकांकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ७१२ वाहनचालकांनी त्यांची वाहने नो-पार्किंग परिसरात उभी केल्याने त्यांना १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावून त्याची वसुली करण्यात आली आहे.ट्रिपल सिट प्रवास करताना आढळून आल्याने ६० वाहनचालकांकडून १ लाख ५५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांना पाठ दाखवित राँग साईडने वाहन नेणाऱ्या २१ जणांकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दुचाकी प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर न करताना आढळल्याने ९४३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना बगल देणाऱ्या १३ हजार ४५६ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४१ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.२५ वाहनचालकांना मोबाईवर बोलणे भोवलेगत सहा महिन्यांच्या कालावधीत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी वाहनचालविताना मोबाईलवर बोलणाºयांवर ठिकठिकाणी कारवाई करून त्यांच्याकडून ३५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहनचालविताना मोबाईलवर बोलणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणाराच प्रकार असला तरी अनेक वाहनचालक याकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येते.वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ७७ जणांना दंडमागील सहा महिन्यात वाहतूक पोलिसांनी ७७ जणांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे कारण पुढे करीत त्यांच्याकडून १३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस