शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

१३,४५६ वाहन चालकांना ४१.३१ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:15 IST

सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहेल्मेट न वापरणाऱ्या ९४३ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केली असून त्यांच्याकडून सध्या हेल्मेटसक्तीकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत.जून महिन्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आल्याने १८ वाहनचालकांवर कलम ६६(२), १९२ अन्वये कारवाई करून त्यांच्याकडून २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर विना नंबर प्लेट वाहन आढळून आल्याने २३ वाहनचालकांकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ७१२ वाहनचालकांनी त्यांची वाहने नो-पार्किंग परिसरात उभी केल्याने त्यांना १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावून त्याची वसुली करण्यात आली आहे.ट्रिपल सिट प्रवास करताना आढळून आल्याने ६० वाहनचालकांकडून १ लाख ५५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांना पाठ दाखवित राँग साईडने वाहन नेणाऱ्या २१ जणांकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दुचाकी प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर न करताना आढळल्याने ९४३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना बगल देणाऱ्या १३ हजार ४५६ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४१ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.२५ वाहनचालकांना मोबाईवर बोलणे भोवलेगत सहा महिन्यांच्या कालावधीत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी वाहनचालविताना मोबाईलवर बोलणाºयांवर ठिकठिकाणी कारवाई करून त्यांच्याकडून ३५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहनचालविताना मोबाईलवर बोलणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणाराच प्रकार असला तरी अनेक वाहनचालक याकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येते.वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ७७ जणांना दंडमागील सहा महिन्यात वाहतूक पोलिसांनी ७७ जणांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे कारण पुढे करीत त्यांच्याकडून १३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस