शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

3,82,868 ग्रामीणांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकडे पाठच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवातझाली असून, प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट या उद्देशाने सध्या जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोविड लसीकरण मोहिमेला गती देत आहे. जिल्ह्यात एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या ६ लाख ९१ हजार ८८१ लाभार्थ्यांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या काेविड संकटात कोविड मृत्यू रोखण्यासाठी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस हाच खबरदारीचा एकमेव प्रभावी उपाय आहे. परंतु, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल ३ लाख ८२ हजार ७६८ व्यक्तींनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवातझाली असून, प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट या उद्देशाने सध्या जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोविड लसीकरण मोहिमेला गती देत आहे. जिल्ह्यात एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या ६ लाख ९१ हजार ८८१ लाभार्थ्यांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट आहे. २९ ऑगस्ट २०२१ पर्यंत उद्दिष्टापैकी ३ लाख ९ हजार ११३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८८,१८९ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. ४४.६८ टक्के ग्रामीण नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असला तरी अजूनही ३ लाख ८२ हजार ७६८ लाभार्थ्यांनी कोविडची लस घेतलेली नाही. त्यामुळे कोविडची तिसरी लाट  ओढवण्यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीबाबत प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे.

१०० टक्के व्हॅक्सिनेट गावाला मिळणार पुरस्कार- गावपातळीवर लसीकरणाला गती मिळत प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट व्हावे, या उद्देशाने जिल्ह्यातील १०० टक्के लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतीला जिल्हा प्रशासनाकडून पाच लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर १०० टक्के लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतीला आता बक्षीसही मिळणार आहे. बक्षीसाची रक्कम गाव विकासावर खर्च करता येणार आहे.

सर्वाधिक लाभार्थी वर्धा तालुक्यात- जिल्ह्यात आठ तालुके असून, एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. हिंगणघाट तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमधील ८३ हजार ६७८ लाभार्थी, वर्धा तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमधील १ लाख ८३ हजार २७२ लाभार्थी, कारंजा (घा.) तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीमधील ६८ हजार ९०७ लाभार्थी, आष्टी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीमधील ४९ हजार ६८८ लाभार्थी, देवळी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीमधील ८० हजार २३० लाभार्थी, आर्वी तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीमधील ७३ हजार ४४५ लाभार्थी, सेलू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमधील ७० हजार ७९७ लाभार्थी तसेच समुद्रपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीमधील ८१ हजार ४०९ लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या