शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३६० गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून बोअरवेल, नळयोजना दुरुस्ती, बोअर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकर-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, नव्याने विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात साधारणत: मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागते.

ठळक मुद्दे६०४.८८ लाखांची तरतूद : आराखड्यांतर्गत विविध उपाययोजना

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील ३६० गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याबाबतचे सर्वेक्षण केले असून जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ आराखडा निश्चित केला आहे. याकरिता ६०४.८८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून बोअरवेल, नळयोजना दुरुस्ती, बोअर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकर-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, नव्याने विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात साधारणत: मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागते.गतवर्षी समाधानकारक पावसाअभावी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. जानेवारी-फेब्रुवारीतच जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्याची ओरड सुरू झाली. यानंतर शहरातही टंचाई निर्माण होऊ लागली. शहराच्या मध्यवस्तीतील कूपनलिका, विहिरींना कोरड पडली. यामुळे शहरासह लगतच्या ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. पाण्याची साठवणूक करण्याकरिता कधी नव्हे, एवढी विक्रमी पाणी टाकीची विक्री झाली.जिल्हा प्रशासनाच्या पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यांतर्गत ९३ गावांत ११३ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, तर १६५ गावांतील १६८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. आठ गावांत टॅकरद्वारे पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. १३९ गावांत नळपाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर ६५ गावांत ७४ विंधन विहिरी घेण्यात येणार असून याकरिता अपेक्षित खर्च ६२.९० लाख इतका रुपये आहे. वेळीच दुरुस्तीची कामे पूर्णत्वास गेल्यास नागरिकांना दिलासाच मिळणार आहे.६५ गावांत नवीन ७४ विंधन विहिरीगतवर्षी जिल्ह्यात जलसंकट गडद झाले होते. वर्धा शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या येळाकेळी व पवनार येथील धाम नदीनेही तळ गाठला होता. सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने शहराने गतवर्षी प्रथमच जलसंकट अनुभवले. यावेळी जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ६५ गावांत ७४ विंधन विहिरी घेण्यात येतील. एप्रिल ते जून या कालावधीत या विंधन विहिरींद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जाणार आहे.मागीलवर्षी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भीषण जलसंकट होते. त्यामुळे अनेकांनी शोषखड्डे आणि पाणी पुनर्भरण प्रकल्प उभारले. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पाणी पुनर्भरणाची व्यवस्था नाही. वारेमाप उपस्यामुळे भूगर्भातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असून पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याची नितांत गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी परिसरात जिरविल्यास गावातील जलस्रोत वाढविण्यासाठी मदत हाईल. याकरिता प्रशासनानेच नव्हे, तर नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीकपात