शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

जिल्ह्यातील ३६० गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून बोअरवेल, नळयोजना दुरुस्ती, बोअर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकर-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, नव्याने विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात साधारणत: मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागते.

ठळक मुद्दे६०४.८८ लाखांची तरतूद : आराखड्यांतर्गत विविध उपाययोजना

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील ३६० गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याबाबतचे सर्वेक्षण केले असून जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ आराखडा निश्चित केला आहे. याकरिता ६०४.८८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून बोअरवेल, नळयोजना दुरुस्ती, बोअर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकर-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, नव्याने विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात साधारणत: मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागते.गतवर्षी समाधानकारक पावसाअभावी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. जानेवारी-फेब्रुवारीतच जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्याची ओरड सुरू झाली. यानंतर शहरातही टंचाई निर्माण होऊ लागली. शहराच्या मध्यवस्तीतील कूपनलिका, विहिरींना कोरड पडली. यामुळे शहरासह लगतच्या ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. पाण्याची साठवणूक करण्याकरिता कधी नव्हे, एवढी विक्रमी पाणी टाकीची विक्री झाली.जिल्हा प्रशासनाच्या पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यांतर्गत ९३ गावांत ११३ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, तर १६५ गावांतील १६८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. आठ गावांत टॅकरद्वारे पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. १३९ गावांत नळपाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर ६५ गावांत ७४ विंधन विहिरी घेण्यात येणार असून याकरिता अपेक्षित खर्च ६२.९० लाख इतका रुपये आहे. वेळीच दुरुस्तीची कामे पूर्णत्वास गेल्यास नागरिकांना दिलासाच मिळणार आहे.६५ गावांत नवीन ७४ विंधन विहिरीगतवर्षी जिल्ह्यात जलसंकट गडद झाले होते. वर्धा शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या येळाकेळी व पवनार येथील धाम नदीनेही तळ गाठला होता. सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने शहराने गतवर्षी प्रथमच जलसंकट अनुभवले. यावेळी जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ६५ गावांत ७४ विंधन विहिरी घेण्यात येतील. एप्रिल ते जून या कालावधीत या विंधन विहिरींद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जाणार आहे.मागीलवर्षी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भीषण जलसंकट होते. त्यामुळे अनेकांनी शोषखड्डे आणि पाणी पुनर्भरण प्रकल्प उभारले. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पाणी पुनर्भरणाची व्यवस्था नाही. वारेमाप उपस्यामुळे भूगर्भातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असून पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याची नितांत गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी परिसरात जिरविल्यास गावातील जलस्रोत वाढविण्यासाठी मदत हाईल. याकरिता प्रशासनानेच नव्हे, तर नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीकपात