शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रेल्वेच्या वर्धा स्थानकावर आठ महिन्यांत 36 हजार फुकटे प्रवासी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 22:39 IST

एकट्या वर्धा रेल्वे स्थानकावरून सुमारे ५० च्या वर रेल्वे गाड्यांची धडधड सुरू असते. वर्धा ते पुणे तसेच मुंबई आणि तिकडे हावडा पुरी या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक महिन्याला कारवाईचा आढावा घेतला जातो. तिकीट तपासणीची माेहीम राबविली जाते. मात्र, तरीदेखील फुकट्या प्रवाशांनी चांगलीच डोकेदुखी वाढविली आहे, हे मात्र तितकेच खरे. 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आणि पकडल्या जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वर्धा विभागाने केलेल्या वर्धा स्थानकावरील कारवाईत जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३६ हजार फुकटे प्रवासी पकडले गेले असून, त्यांच्याकडून १ कोटी ७८ लाख ९९ हजार २२० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वर्धा रेल्वे स्थानकावरून सध्या प्रवासी आणि गाड्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. एकट्या वर्धा रेल्वे स्थानकावरून सुमारे ५० च्या वर रेल्वे गाड्यांची धडधड सुरू असते. वर्धा ते पुणे तसेच मुंबई आणि तिकडे हावडा पुरी या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक महिन्याला कारवाईचा आढावा घेतला जातो. तिकीट तपासणीची माेहीम राबविली जाते. मात्र, तरीदेखील फुकट्या प्रवाशांनी चांगलीच डोकेदुखी वाढविली आहे, हे मात्र तितकेच खरे. 

योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा -  सध्या तिकीट कन्फर्म झालेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. -  तिकीट तपासणी यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन वर्धा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

तर तुरुंगवासाचीही तरतूद....विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या ३६ हजारांवर जाऊन पोहोचली असून, त्यांच्याकडून दंडही आकारण्यात आला आहे. अशा सर्व फुकट्या प्रवाशांना रेल्वेच्या नियमांनुसार दंड भरावाच लागणार आहे. दंड न भरल्यास संबंधित प्रवाशाला रेल्वेच्या कायद्यानुसार तुरुंगवासाची शिक्षाही केली जाईल, असा इशाराही रेल्वेने दिला आहे. 

दंडाच्या रकमेत वाढ केल्यास बसेल चाप रेल्वेत दररोज हजारो प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. या प्रवाशांकडून रेल्वेने १ कोटी ७८ लाखांचा दंड वसूल केला. अशा प्रवाशांना पकडण्यासाठी वेळोवेळी रेल्वेकडून मोहीम राबविली जाते. मात्र, तरीही फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होत नाही. रेल्वेच्या मते,  दंडाच्या रकमेत वाढ केल्यास नक्कीच विनातिकिट प्रवास  करणाऱ्या प्रवाशांना चाप बसेल, हे खरे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासी