शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तब्बल ३६ ‘ब्लॅकस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:51 IST

अपघातांची वाढती संख्या चिंतनीय असल्याने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने घेतला.

ठळक मुद्देपहिल्यांदाच सर्वेक्षण : अपघातप्रवण स्थळांचा शोध

रूपेश खैरी।आॅनलाईन लोकमतवर्धा : अपघातांची वाढती संख्या चिंतनीय असल्याने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने घेतला. या निर्णयानुसार वर्धा जिल्ह्यातील तीन वर्षातील अपघातांचा सर्व्हे करून अपघात प्रवणस्थळ निवडण्यात आले. वर्धा जिल्ह्यात थोडीथोडकी नाही तर तब्बल ३६ ब्लॅकस्पॉट असल्याचा अहवाल मंत्रालयाकडे पाठविण्यात आला.वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ब्लॅकस्पॉट वर्धा तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. दुसºया क्रमांकावर हिंगणघाट तालुका आहे. या तालुक्यातून दोन महामार्ग गेल्याने अपघात प्रवणस्थळांची संख्या अधिक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली. तर तिसºया क्रमांकावर देवळी तालुका असून येथे दोन ठिकाण ब्लॅकस्पॉट म्हणून नोंद करण्यात आली.केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने महामार्गावरील अपघात स्थळांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश परिवहन विभाग (आरटीओ) आणि बांधकाम विभागाला दिले आहे. या सर्वेक्षणानुसार अधिकाधिक अपघात होणाºया ठिकाणी कुठल्या दुरूस्तीमुळे अपघाताची तीव्रता कमी करण्यात येईल, याबाबतचा अहवाल सार्वजिनक बांधकाम विभागाला मागितला. ब्लॅकस्पॉट निवड करण्यात किमान तीन वर्षातील अपघाती मृत्यूची नोंद घेण्याचे सूचविले होते. अपघाती मृत्यूचा सरासरी विचार करून त्याच स्थळांना ब्लॅकस्पॉट घोषित करायचे की नाही हे ठरविण्यात आले. या निकषानुसारच पोलीस ठाण्यात अपघातांचा स्थळाबाबत असलेल्या नोंदी आणि त्याठिकाणी झालेली जीवितहानी याचा अभ्यास करून विशेष स्थळे निवडण्यात आले. ही स्थळे निवडल्यानंतर अपघाताची संख्या कमी करण्यासाठी काही दुरूस्त्या सुचविण्यात आले आहे. हा अहवाल उपप्रादेशिक परिवहन आयुक्तांकडे पाठविला. तसेच तो केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे.तीन वर्षांच्या अपघातांवरून अपघातप्रवण स्थळांची निवडजिल्ह्यात बऱ्याच वेळा एकाच ठिकाणी अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने अपघात प्रवणस्थळ असे फलक लावण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करताना तीन वर्षातील अपघाताचा विचार करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे अशी ठिकाणे नकाशावर नोंद करण्याच्या उद्देशाने हा सर्व्हे करण्यात आला असावा, असा अंदाज अधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.गुगल मॅपवर दर्शविणार ब्लॅकस्पॉटप्रवासादरम्यान बहुतांश चालकांकडून गुगल मॅपचा वापर केला जातो. वाहनामध्ये जिपीआरएस सिस्टीम असल्याने हा मॅप वापरला जातो. आता ब्लॅकस्पॉट रस्त्यावर असल्याची सूचना चालकांना ५०० मिटरपूर्वीच मिळणार आहे. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित करून होणारा अपघात टाळणे शक्य आहे. यासाठी ब्लॅकस्पॉट गुगल मॅपला टॅग केले जाणार आहे.अपघात कमी करण्यासाठी उपाययोजनाअपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर काही उपाययोजना सूचविल्या आहे. त्या उपाययोजना बांधकाम विभागाला पूर्ण करावयाचे आहे. यात सिग्नल बोर्ड, स्पीड ब्रे्रकर, रस्ता दुभाजक, फुटलेले रस्ता दुभाजक पूर्ण करणे यासारख्या उपाययोजना सुचविल्या आहे.महत्त्वाचे १२ ब्लॅकस्पॉट व तीन वर्षात झालेले मोठे अपघातजाम चौरस्ता, समुद्रपूर- १०नंदोरी फाटा, हिंगणघाट - १०आजंती शिवार, हिंगणघाट - १०नांदगाव चौक, हिंगणघाट - १४महाबळा शिवार, सेलू - ०८बरबडी बसस्थानक, सिंदी (रे.)- ०८देवळी नाका, वर्धा - ०४शिवाजी चौक वर्धा - ०६बजाज चौक, वर्धा - ०७जुनापाणी चौक, वर्धा - ०७इसापूर शिवार, देवळी - ०७खर्डा शिवार, देवळी - ०७