शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३६ ‘ब्लॅकस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:51 IST

अपघातांची वाढती संख्या चिंतनीय असल्याने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने घेतला.

ठळक मुद्देपहिल्यांदाच सर्वेक्षण : अपघातप्रवण स्थळांचा शोध

रूपेश खैरी।आॅनलाईन लोकमतवर्धा : अपघातांची वाढती संख्या चिंतनीय असल्याने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने घेतला. या निर्णयानुसार वर्धा जिल्ह्यातील तीन वर्षातील अपघातांचा सर्व्हे करून अपघात प्रवणस्थळ निवडण्यात आले. वर्धा जिल्ह्यात थोडीथोडकी नाही तर तब्बल ३६ ब्लॅकस्पॉट असल्याचा अहवाल मंत्रालयाकडे पाठविण्यात आला.वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ब्लॅकस्पॉट वर्धा तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. दुसºया क्रमांकावर हिंगणघाट तालुका आहे. या तालुक्यातून दोन महामार्ग गेल्याने अपघात प्रवणस्थळांची संख्या अधिक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली. तर तिसºया क्रमांकावर देवळी तालुका असून येथे दोन ठिकाण ब्लॅकस्पॉट म्हणून नोंद करण्यात आली.केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने महामार्गावरील अपघात स्थळांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश परिवहन विभाग (आरटीओ) आणि बांधकाम विभागाला दिले आहे. या सर्वेक्षणानुसार अधिकाधिक अपघात होणाºया ठिकाणी कुठल्या दुरूस्तीमुळे अपघाताची तीव्रता कमी करण्यात येईल, याबाबतचा अहवाल सार्वजिनक बांधकाम विभागाला मागितला. ब्लॅकस्पॉट निवड करण्यात किमान तीन वर्षातील अपघाती मृत्यूची नोंद घेण्याचे सूचविले होते. अपघाती मृत्यूचा सरासरी विचार करून त्याच स्थळांना ब्लॅकस्पॉट घोषित करायचे की नाही हे ठरविण्यात आले. या निकषानुसारच पोलीस ठाण्यात अपघातांचा स्थळाबाबत असलेल्या नोंदी आणि त्याठिकाणी झालेली जीवितहानी याचा अभ्यास करून विशेष स्थळे निवडण्यात आले. ही स्थळे निवडल्यानंतर अपघाताची संख्या कमी करण्यासाठी काही दुरूस्त्या सुचविण्यात आले आहे. हा अहवाल उपप्रादेशिक परिवहन आयुक्तांकडे पाठविला. तसेच तो केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे.तीन वर्षांच्या अपघातांवरून अपघातप्रवण स्थळांची निवडजिल्ह्यात बऱ्याच वेळा एकाच ठिकाणी अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने अपघात प्रवणस्थळ असे फलक लावण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करताना तीन वर्षातील अपघाताचा विचार करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे अशी ठिकाणे नकाशावर नोंद करण्याच्या उद्देशाने हा सर्व्हे करण्यात आला असावा, असा अंदाज अधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.गुगल मॅपवर दर्शविणार ब्लॅकस्पॉटप्रवासादरम्यान बहुतांश चालकांकडून गुगल मॅपचा वापर केला जातो. वाहनामध्ये जिपीआरएस सिस्टीम असल्याने हा मॅप वापरला जातो. आता ब्लॅकस्पॉट रस्त्यावर असल्याची सूचना चालकांना ५०० मिटरपूर्वीच मिळणार आहे. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित करून होणारा अपघात टाळणे शक्य आहे. यासाठी ब्लॅकस्पॉट गुगल मॅपला टॅग केले जाणार आहे.अपघात कमी करण्यासाठी उपाययोजनाअपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर काही उपाययोजना सूचविल्या आहे. त्या उपाययोजना बांधकाम विभागाला पूर्ण करावयाचे आहे. यात सिग्नल बोर्ड, स्पीड ब्रे्रकर, रस्ता दुभाजक, फुटलेले रस्ता दुभाजक पूर्ण करणे यासारख्या उपाययोजना सुचविल्या आहे.महत्त्वाचे १२ ब्लॅकस्पॉट व तीन वर्षात झालेले मोठे अपघातजाम चौरस्ता, समुद्रपूर- १०नंदोरी फाटा, हिंगणघाट - १०आजंती शिवार, हिंगणघाट - १०नांदगाव चौक, हिंगणघाट - १४महाबळा शिवार, सेलू - ०८बरबडी बसस्थानक, सिंदी (रे.)- ०८देवळी नाका, वर्धा - ०४शिवाजी चौक वर्धा - ०६बजाज चौक, वर्धा - ०७जुनापाणी चौक, वर्धा - ०७इसापूर शिवार, देवळी - ०७खर्डा शिवार, देवळी - ०७