शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

३५ वर्षांपासून ते देतात दवंडी

By admin | Updated: May 10, 2014 00:25 IST

सर्व गावकरी लोकांना कळविण्यात येते की.... तरी सर्वांनी याची नोंद घावी हो... अशी आरोळी ठोकत घंटीचा टन टन आवाज करीत तो एका वॉर्डातून दुसरीकडे जातो.

 हर्षल तोटे - पवनार

सर्व गावकरी लोकांना कळविण्यात येते की.... तरी सर्वांनी याची नोंद घावी हो... अशी आरोळी ठोकत घंटीचा टन टन आवाज करीत तो एका वॉर्डातून दुसरीकडे जातो. पुन्हा दवंडी सुरू. लहान मुले मागे मागे हो म्हणत धावतात. हा प्रकार नित्याचा म्हणता म्हणता पवनारातील दौलतराव हिवरे यांच्यासाठी आता ३५ वर्षांचा झाला. सार्वजनिक स्वरूपातील माहिती गावात या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे ‘दवंडी’. गावात ठरलेल्या चौकामध्ये घंटीचे ठोके मारून नागरिकांना गोळा करणे व ऐका हो ऐका अशी सुरुवात करून सर्व माहिती सांगणे ही दवंडीकराची जबाबदारी. प्रत्येक गावामध्ये दवंडी देणाराही ठरलेला. पवनारमध्ये दौलतराव हिवरे (७६ वर्षे) हे गत ३५ वर्षांपासून दवंडी देण्याचे काम करीत आहेत. ३५ वर्षे दवंडी देण्याचा हा बहुदा एक विक्रमच असावा़ सुरुवातीच्या काळात गावात चैतू मुंगले, रंजन वानखेडे, दौलत वडे यांनी दवंडीचा भार सांभाळला; परंतु त्यांची दवंडी देण्याची कारकिर्द फार अल्पशी होती़ दौलत वडे आजारी पडल्यानंतर १९७८ साली दौलत हिवरे यांनी दवंडीचे काम हाती घेतले ते आजतागायत सुरूच आहे. त्यावेळेस त्यांनी २० रुपये दवंडी विकत घेतली होती व ती देण्याकरिता त्यांना फक्त ७ रुपये मिळायचे़ कमीत कमी ५० ठिकाणी दवंडी देण्याकरिता त्यांना दोन तास लागायचे़ आता त्यांना दवंडीपोटी २०० रुपये मिळत असून गावात १०४ ठिकाणी दवंडी द्यावी लागते़ याकरिता कमीत कमी चार तास लागतात़ दरवर्षी ग्रा़ पं़ च्या ५० व इतर ५० अशा जवळपास १०० दवंडी तरी त्यांना द्यावा लागतात़ याच व्यवसायातून त्यांनी तीन मुलांचे, दोन मुलींचे लग्न, घराचे बांधकाम व दैनंदिन गरजा पूर्ण केल्याचे ते अभिमानाने सांगतात़ वयाची ७६ वर्ष त्यांनी पूर्ण केली असून दवंडीच्या कामाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. खणखणीत आवाजात ५० लोक ऐकतील अशी दवंडी ते देतात. अजून किमान दोन वर्ष तरी हे काम आपण करणार असेही ते अभिमानाने सांगतात. असे असले त्यांचा हा दंवडी देण्याचा वारसा कोण पुढे नेणार असा प्रश्न समोर येत आहे.