शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

३.४७ लाख क्विंटल कपाशीची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:27 IST

पावसाचा अनियमितपणा आणि आता कपाशीवर आलेली बोंडअळी यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सात बाजार समितीत एकूण ४७ केंद्रावरून खरेदी सुरू

आॅनलाईन लोकमतवर्धा : पावसाचा अनियमितपणा आणि आता कपाशीवर आलेली बोंडअळी यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या सर्व परिस्थितीमुळे यंदा कापसाचे उत्पादन कमी होईल, हे चित्र कायम असल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्ह्यात सातही बाजार समितीतून ३ लाख ४७ हजार क्ंिवटल कपाशीची खरेदी झाली आहे.जिल्ह्यात असलेल्या सात बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सुरू झाली आहे. या सातही बाजार समितीतून कापसाची खरेदी सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात कपाशीला ४ हजार १५० ते ४ हजार ८५१ रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे. यंदा कपाशीच्या उत्पानाची हमी नसल्याने हा दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर जिल्ह्यात असलेल्या १० बाजार समितीतून आतापर्यंत १ लाख २१ हजार २३६ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. येथेही हाच दर मिळाल्याचे दिसून आले आहे.वर्धा जिल्ह्यातच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागात यंदा पावसाची अनियमितता कायम होती. यामुळे अनेकांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट आले होते. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होईल असे अनेकांना वाटत होते. यातच उत्पादन निघण्याच्या काळात बीटी कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. अळीच्या हल्ल्यामुळे होते नव्हते उत्पादन शेतकºयांच्या हातून जाण्याची वेळ आली. प्रत्येक बोंडात अळी आल्याने उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळाले. या अळीवर ताबा मिळविणे शक्य नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतात ट्रॅक्टर फिरविले. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा एका वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे.नागपूर विभागात ३.७९ क्विंटल कापसाची खरेदी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कपाशीचे उत्पादन कमी होईल, हे चित्र खरे होत असल्याचे दिसत आहे.नागपूर आणि वर्धा अशा नागपूर विभागात खासगी आणि शासकीय अशी एकूण ३ लाख ७९ हजार ३ क्ंिवटल कपाशीची खरेदी झाली आहे. वातावरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांत पहिल्याच वेच्यात कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येत्या दिवसात कपाशीची आवक आणखी कमी होईल असे संकेत सध्यातरी जिल्ह्यात दिसून येत आहे.गत हंगामात वर्धेत डिसेंबर अखेर पर्यंत साडेनऊ लाख क्ंिवटलची आवकगत हंगामात वर्धेत डिसेंबर अखेर पर्यंत एकूण ९ लाख ५६ हजार क्ंिवटल कपाशीची आवक झाल्याची नोंद झाली होती. यंदा नोव्हेंबर अखेर पर्यंत साडेतीन लाख क्ंिवटलची आवक झाली आहे. शिवाय जिल्ह्यात असलेल्या परिस्थितीमुळे हा आकडा पार होण्याची चिन्हे दिसत नाही. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घटीचे संकेत खरे ठरत असल्याचे दिसत आहे.गतवर्षी वर्धेत ३१.९२ लाख क्विंटल कापूसगत हंगामात वर्धा जिल्ह्यात कपाशीची झालेली खरेदी ३१ लाख ९२ क्ंिवटल होती. यंदा यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. यंदाच्या हंगामात २ लाख ८० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. यातून २६ लाख ५० हजार क्ंिवटलचे उत्पादन होईल अशी आशा होती. मात्र कपाशीवर असलेल्या संकटामुळे यंदा अपेक्षित उत्पादन होणेही शक्य नसल्याचे दिसून आले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे यंदाचे उत्पादन सरासरी २२ ते २३ लाख क्ंिवटलवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.पणन महासंघाच्या केंद्रावर मुहूर्त नाहीनागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यात कापूस पणन महासंघाची एकूण नऊ केंद्रे सुरू झाली आहेत. यात सहा केंद्र नागपूर आणि तीन केंद्र वर्धेत आहे. या नऊ पैकी एकाही केंद्रावर मुहूर्तालाही कापूस आला नाही.