शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

३.४७ लाख क्विंटल कपाशीची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:27 IST

पावसाचा अनियमितपणा आणि आता कपाशीवर आलेली बोंडअळी यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सात बाजार समितीत एकूण ४७ केंद्रावरून खरेदी सुरू

आॅनलाईन लोकमतवर्धा : पावसाचा अनियमितपणा आणि आता कपाशीवर आलेली बोंडअळी यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या सर्व परिस्थितीमुळे यंदा कापसाचे उत्पादन कमी होईल, हे चित्र कायम असल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्ह्यात सातही बाजार समितीतून ३ लाख ४७ हजार क्ंिवटल कपाशीची खरेदी झाली आहे.जिल्ह्यात असलेल्या सात बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सुरू झाली आहे. या सातही बाजार समितीतून कापसाची खरेदी सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात कपाशीला ४ हजार १५० ते ४ हजार ८५१ रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे. यंदा कपाशीच्या उत्पानाची हमी नसल्याने हा दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर जिल्ह्यात असलेल्या १० बाजार समितीतून आतापर्यंत १ लाख २१ हजार २३६ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. येथेही हाच दर मिळाल्याचे दिसून आले आहे.वर्धा जिल्ह्यातच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागात यंदा पावसाची अनियमितता कायम होती. यामुळे अनेकांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट आले होते. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होईल असे अनेकांना वाटत होते. यातच उत्पादन निघण्याच्या काळात बीटी कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. अळीच्या हल्ल्यामुळे होते नव्हते उत्पादन शेतकºयांच्या हातून जाण्याची वेळ आली. प्रत्येक बोंडात अळी आल्याने उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळाले. या अळीवर ताबा मिळविणे शक्य नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतात ट्रॅक्टर फिरविले. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा एका वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे.नागपूर विभागात ३.७९ क्विंटल कापसाची खरेदी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कपाशीचे उत्पादन कमी होईल, हे चित्र खरे होत असल्याचे दिसत आहे.नागपूर आणि वर्धा अशा नागपूर विभागात खासगी आणि शासकीय अशी एकूण ३ लाख ७९ हजार ३ क्ंिवटल कपाशीची खरेदी झाली आहे. वातावरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांत पहिल्याच वेच्यात कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येत्या दिवसात कपाशीची आवक आणखी कमी होईल असे संकेत सध्यातरी जिल्ह्यात दिसून येत आहे.गत हंगामात वर्धेत डिसेंबर अखेर पर्यंत साडेनऊ लाख क्ंिवटलची आवकगत हंगामात वर्धेत डिसेंबर अखेर पर्यंत एकूण ९ लाख ५६ हजार क्ंिवटल कपाशीची आवक झाल्याची नोंद झाली होती. यंदा नोव्हेंबर अखेर पर्यंत साडेतीन लाख क्ंिवटलची आवक झाली आहे. शिवाय जिल्ह्यात असलेल्या परिस्थितीमुळे हा आकडा पार होण्याची चिन्हे दिसत नाही. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घटीचे संकेत खरे ठरत असल्याचे दिसत आहे.गतवर्षी वर्धेत ३१.९२ लाख क्विंटल कापूसगत हंगामात वर्धा जिल्ह्यात कपाशीची झालेली खरेदी ३१ लाख ९२ क्ंिवटल होती. यंदा यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. यंदाच्या हंगामात २ लाख ८० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. यातून २६ लाख ५० हजार क्ंिवटलचे उत्पादन होईल अशी आशा होती. मात्र कपाशीवर असलेल्या संकटामुळे यंदा अपेक्षित उत्पादन होणेही शक्य नसल्याचे दिसून आले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे यंदाचे उत्पादन सरासरी २२ ते २३ लाख क्ंिवटलवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.पणन महासंघाच्या केंद्रावर मुहूर्त नाहीनागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यात कापूस पणन महासंघाची एकूण नऊ केंद्रे सुरू झाली आहेत. यात सहा केंद्र नागपूर आणि तीन केंद्र वर्धेत आहे. या नऊ पैकी एकाही केंद्रावर मुहूर्तालाही कापूस आला नाही.