शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

३.४७ लाख क्विंटल कपाशीची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:27 IST

पावसाचा अनियमितपणा आणि आता कपाशीवर आलेली बोंडअळी यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सात बाजार समितीत एकूण ४७ केंद्रावरून खरेदी सुरू

आॅनलाईन लोकमतवर्धा : पावसाचा अनियमितपणा आणि आता कपाशीवर आलेली बोंडअळी यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या सर्व परिस्थितीमुळे यंदा कापसाचे उत्पादन कमी होईल, हे चित्र कायम असल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्ह्यात सातही बाजार समितीतून ३ लाख ४७ हजार क्ंिवटल कपाशीची खरेदी झाली आहे.जिल्ह्यात असलेल्या सात बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सुरू झाली आहे. या सातही बाजार समितीतून कापसाची खरेदी सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात कपाशीला ४ हजार १५० ते ४ हजार ८५१ रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे. यंदा कपाशीच्या उत्पानाची हमी नसल्याने हा दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर जिल्ह्यात असलेल्या १० बाजार समितीतून आतापर्यंत १ लाख २१ हजार २३६ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. येथेही हाच दर मिळाल्याचे दिसून आले आहे.वर्धा जिल्ह्यातच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागात यंदा पावसाची अनियमितता कायम होती. यामुळे अनेकांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट आले होते. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होईल असे अनेकांना वाटत होते. यातच उत्पादन निघण्याच्या काळात बीटी कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. अळीच्या हल्ल्यामुळे होते नव्हते उत्पादन शेतकºयांच्या हातून जाण्याची वेळ आली. प्रत्येक बोंडात अळी आल्याने उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळाले. या अळीवर ताबा मिळविणे शक्य नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतात ट्रॅक्टर फिरविले. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा एका वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे.नागपूर विभागात ३.७९ क्विंटल कापसाची खरेदी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कपाशीचे उत्पादन कमी होईल, हे चित्र खरे होत असल्याचे दिसत आहे.नागपूर आणि वर्धा अशा नागपूर विभागात खासगी आणि शासकीय अशी एकूण ३ लाख ७९ हजार ३ क्ंिवटल कपाशीची खरेदी झाली आहे. वातावरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांत पहिल्याच वेच्यात कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येत्या दिवसात कपाशीची आवक आणखी कमी होईल असे संकेत सध्यातरी जिल्ह्यात दिसून येत आहे.गत हंगामात वर्धेत डिसेंबर अखेर पर्यंत साडेनऊ लाख क्ंिवटलची आवकगत हंगामात वर्धेत डिसेंबर अखेर पर्यंत एकूण ९ लाख ५६ हजार क्ंिवटल कपाशीची आवक झाल्याची नोंद झाली होती. यंदा नोव्हेंबर अखेर पर्यंत साडेतीन लाख क्ंिवटलची आवक झाली आहे. शिवाय जिल्ह्यात असलेल्या परिस्थितीमुळे हा आकडा पार होण्याची चिन्हे दिसत नाही. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घटीचे संकेत खरे ठरत असल्याचे दिसत आहे.गतवर्षी वर्धेत ३१.९२ लाख क्विंटल कापूसगत हंगामात वर्धा जिल्ह्यात कपाशीची झालेली खरेदी ३१ लाख ९२ क्ंिवटल होती. यंदा यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. यंदाच्या हंगामात २ लाख ८० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. यातून २६ लाख ५० हजार क्ंिवटलचे उत्पादन होईल अशी आशा होती. मात्र कपाशीवर असलेल्या संकटामुळे यंदा अपेक्षित उत्पादन होणेही शक्य नसल्याचे दिसून आले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे यंदाचे उत्पादन सरासरी २२ ते २३ लाख क्ंिवटलवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.पणन महासंघाच्या केंद्रावर मुहूर्त नाहीनागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यात कापूस पणन महासंघाची एकूण नऊ केंद्रे सुरू झाली आहेत. यात सहा केंद्र नागपूर आणि तीन केंद्र वर्धेत आहे. या नऊ पैकी एकाही केंद्रावर मुहूर्तालाही कापूस आला नाही.