शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

३.४६ लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:07 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात सुमारे २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परिजीवी जंतूपासून धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे१० फेब्रुवारीपासून विशेष मोहीम : कृमीदोष टाळण्यास्तव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात सुमारे २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परिजीवी जंतूपासून धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना अलंबेडाझॉल नामक जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात २ लाख २१ हजार ५८१ तर शहरी भागात १ लाख २५ हजार १९९ विद्यार्थी आहेत. त्यांना १० फेब्रुवारी रोजी या गोळ्या देण्यात येणार आहेत. निमशासकीय, नगर पालिका, जिल्हा परिषद, अंगणवाडी आदी ठिकाणी या गोळ्या आरोग्य विभागाच्यावतीने पोहोचविण्यात आल्या आहेत. या गोळ्या १ ते १९ वयोगटातील सर्वच बालकांना देण्यात येणार आहे. त्यापैकी १ ते २ वयोगटातील बालकांना अर्धी गोळी तर यावरील वयोगटातील बालकांना पूर्ण गोळी देण्यात येणार आहे.मुलांमध्ये वाढत असलेल्या कृमीदोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने १० फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन व १५ फेब्रुवारीला मॉप अप दिन राबविण्यात येणार आहे. या दोन दिवसात या गोळ्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.जिल्ह्यात ९१६ शासकीय शाळा, ९१ शासकीय अनुदानित शाळा, ९ नगर पालिकेच्या शाळा, १४६ खासगी अनुदानित शाळा, अशा एकूण ११६२ शाळा व १४४१ अंगणवाड्या आहेत. यातील सर्वच बालकांना गोळ्या देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शाळाबाह्य असलेल्या विद्यार्थ्यांना गोळ्या देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांमार्फत पार पाडण्यात येणार आहे.मोहिमेतून कॉन्व्हेंटचे विद्यार्थी वगळलेया मोहिमेतून आरोग्य विभागाने शहरी व ग्रामीण भागात असलेल्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना वगळल्याने या मोहिमेला भेदभावाचे गालबोट लागले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत केवळ शासकीय, खासगी अनुदानित व अंगणवाडीतील बालकांना गोळ्या देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला आहेत. बालकांसंदर्भात शासन भेदभाव करीत असून या निर्णयामुळे शासनाचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण होणार नसल्याचे दिसत आहे.कृमी दोषामुळे रक्ताशय आणि कुपोषणबालकांमध्ये होणाऱ्या दीर्घकालीन कृमीदोषांमुळे रक्ताशय आणि कूपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बालक कमजोर होतात. शिवाय त्यांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचा धोका निर्माण होतो. देशात पाच वर्षांखालील मुला-मुलींमध्ये रक्ताशयाचे प्रमाण ७० टक्के असल्याचे आढळून आले आहे. शिवाय १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये आणि ३० टक्के मुलांमध्ये रक्ताशय आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय महाराष्ट्रात हे प्रमाण २९ टक्के असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे.