शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

३४ वर्षांनंतर पं.स.ला हक्काची इमारत

By admin | Updated: February 29, 2016 01:42 IST

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या ..

बांधकामाला प्रारंभ : २ कोटी २५ लक्ष रूपयांचे प्रावधान आष्टी (शहीद) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या म्हणून राज्य शासनाने शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा बहाल केला. तेव्हापासून पंचायत समितीला हक्काची इमारत नव्हती. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर २ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला. यातून बांधकाम सुरू झाले असून वर्षभरात इमारत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.१२ हजार ५०० फुट एवढ्या विस्तीर्ण जागेवर १८ प्रशस्त खोल्या, दोन मोठे हॉल अशी इमारत प्रस्तावित आहे. जोत्याचे काम पूर्ण झाले असून कॉलमची उंची सज्जा पर्र्यंत सात फुट पूर्ण झाली आहे. बसस्थानकापासून अवघ्या ३०० मीटरवर पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीला लागूनच लोकमान्य विद्यालय आहे. ही इमारत राज्यमार्गाला लागून असल्यामुळे सोयीचे होणार आहे. इमारत बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आर्वी उपविभागांतर्गत सुरू आहे. शाखा अभियंता प्रमोद चाफले स्वत: उपस्थित राहून बांधकाम करून घेत आहे. उपविभागीय अभियंता अनिल भडांगे यांच्याकडूनही वेळोवेळी पाहणी होत आहे.मध्यवस्तीतील पं.स. कार्यालयामुळे वाहतुकीचा खोळंबाआष्टी (शहीद) : सद्यस्थितीत मध्यवस्तीतील इमारतीमध्ये पंचायत समितीचा कारभार सुरू आहे. येथे अपुरी जागा आणि वाहतुकीचा प्रश्न सतत भेडसावत होता. हक्काची इमारत व्हावी म्हणून तत्कालीन आमदार दादाराव केचे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. वर्धा येथील कंत्राटदार चौधरी यांना कामाचे कंत्राट मिळाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि.प. उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती विलास कांबळे, जि.प. सदस्य राणा रणनवरे यांनी नुकतीच भेट देऊन कामाची पाहणी केली. वर्षाअखेरीस काम पूर्ण होण्याचा अंदाज बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. शासनाकडून टप्याटप्याने निधी येणे सुरू आहे. जितक्या लवकर पूर्ण निधी येईल तितक्या लवकर बांधकाम पूर्ण होणार आहे.(प्रतिनिधी)