शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

३३ जोडपी अडकली विवाह बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:33 IST

स्व. आ. डॉ. शरदराव काळे स्मृती सेवा प्रतिष्ठान व जागृती सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली. सती मैदानावर तब्बल दहा हजार लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले.

ठळक मुद्देसामूहिक विवाह सोहळा : मंगळसुत्रासह वधू-वरांना दिले आंदण

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्व. आ. डॉ. शरदराव काळे स्मृती सेवा प्रतिष्ठान व जागृती सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली. सती मैदानावर तब्बल दहा हजार लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावनेरचे आ. सुनील केदार तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, आ. अमर काळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे, विधान परिषद सदस्य आ. ख्वाजा बेग, अशोक महाराज पालीवाल, नगराध्यक्ष मिरा येनुरकर, उपाध्यक्ष हमीद खाँ, माजी पं.स. सभापती प्रा. अरूण बाजारे, ईश्वर वरकड, मोहन बेले, जि.प. सदस्य त्रिलोकचंद कोहळे, मुकेश कराळे, कलावती वाकोडकर, मेघराज चौधरी यांची उपस्थिती होती.प्रारंभी अतिथींच्या हस्ते स्व.आ. डॉ. शरदराव काळे, स्व. मातोश्री अनुराधा काळे, स्व. बाबुजीदादा मोहोड यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. गत १८ वर्षांपासून दहा हजार लोकांचे नि:शुल्क भोजन तयार करणारे आचारी चैतराम भोंडवे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.मनोगत व्यक्त करताना चारूलता टोकस म्हणाल्या की, भारतात सर्वाधिक पैसा विवाह सोहळ्यासारख्या प्रथेवर खर्च होतो. आर्थिक व सामाजिक विषमता संपविण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज असल्याचे सांगितले. समाजात पुरूष व महिला यांना समान हक्क देणे गरजेचे आहे. समाजात बलात्कारासारखा दुर्दैवी व निंदनीय घटना घडत आहेत. त्यासाठी चांगले विचार व सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.आ. सुनील केदार यांनी युवकांना रोजगार नसल्याने प्रचंड बरोजगारी वाढल्याचे सांगून सामुहिक विवाह सोहळा आदर्श व स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. अशोक महाराज पालीवाल यांनी मुलींचा जन्मदर कमी झाल्याने मुलांना मुली मिळत नाहीत. त्यासाठी मुलीकडे सकारात्मक दृष्टीकोणाने पाहून स्त्री-भ्रूणहत्या थांबवावी. दोन जीव, दोन गाव, दोन कुटुंब याचे मिलन म्हणजे सामूहिक विवाह सोहळा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर अन्य मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.प्रारंभी बौद्ध धर्माच्या रितीप्रमाणे सात जोडप्यांचे लग्न पौराहित्य विनायक मतले यांनी लावून दिले. २६ हिंदू जोडप्यांचे लग्न यावेळी लावून देण्यात आले. सर्व ३३ वर-वधूंना वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कपडे व वृक्षलागवडीसाठी बियाणे भेट दिले.प्रतिष्ठानच्यावतीने आ. अमर काळे, पत्नी मयुरा काळे यांनी कपडे, भांडी, मंगळसुत्र दिले. वर-वधूंना ताटपाटाचे जेवण देण्यात आले. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरूण बाजारे यांनी केले. प्रास्ताविक आ. अमर काळे यांनी केले तर आभार अविनाश गोहाड यांनी मानले. कार्यक्रमाला गावकरी, कार्यकर्ते, महिला-पुरूष, युवक मंडळी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता छोटू शर्मा, प्रकाश मसराम, शक्ती गोरे, श्रीकांत गुल्हाने, नरेश राईकवार, संजय सिरभाते, डॉ. प्रदीप राणे, युवराज राऊत, सौदानसिंग टॉक, दिलीप राही, प्रमोद चोहटकर, गजानन गावंडे, जगदीश काळे आदींनी सहकार्य केले.वनविभागाच्या उपक्रमाची प्रशंसाशासकीय कामासोबतच सामाजिक सलोखा जोपासणारे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी ३३ ही जोडप्यांना वाटप केलेले कपडे व बियाणे याची आ. अमर काळे यांनी प्रशंसा केली. सर्व अधिकाºयांनी मनावर घेतले तर सामाजिक उपक्रम यशस्वी करू शकतात हे यामधून चौधरी यांनी दाखवून दिल्याचे अ‍ॅड. चारूलता टोकस म्हणाल्या. शासनाला याबाबतची माहिती पाठवून आदर्श अधिकारी पुरस्कारसाठी शिफारस करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.ख्वाजा बेग यांनी दिला निधीविधानपरिषद सदस्य आ. ख्वाजा बेग यांनी कब्रस्थान कमिटीला दहा लक्ष रूपयाचा निधी दिला होता. यामधून काम पूर्ण करण्यात आले. त्याबद्दल काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीचे प्रा. सय्यद अफसर अली, शोयब खान, अब्दुल्ला शहा यांनी त्यांचा मुस्लीम बांधवांच्यावतीने सत्कार केला.

टॅग्स :marriageलग्न