शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

३२७५.२२ हेक्टरवर नुकसानालाच मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:20 IST

जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला आहे.

ठळक मुद्दे६६०३.७० हेक्टर नुकसान : सर्वाधिक नुकसान कारंजा तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार ६ हजार ६०३.७० हेक्टरवर नुकसान दर्शविण्यात आले आहे. असे असताना मदत मात्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. या निकषात जिल्ह्यातील ३ हजार २७५.२२ हेक्टर क्षेत्र बसत असल्याने इतरांना मात्र नुकसान सहन करावे लागणार आहे.फेब्रुवारी महिन्याच्या ११ ते १४ तारखेपर्यंत जिल्ह्यात गारपीट, वादळी वारा आणि पावसाने चांगलेच थैमान घातले. याचा फटका जिल्ह्यातील तब्बल २२२ गावांना बसला. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तर आर्वी तालुक्यातील पिंपळझरी गाव अक्षरश: उद्ध्वस्त झाले. सध्या रबी हंगाम असून शेतात गहू आणि हरभरा व भाजीपालावर्गीय पिके आहेत. यात पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. पावसासह आलेली गारपीट आणि वारा यामुळे पिकांचे चांगलेच नुकसान झाले. या नुकसानात ३ हजार २२०.५० हेक्टरवरील नुकसान ३३ टक्क्यांच्या आत आहे. यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे दिसून आले आहे.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात कारंजा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात एकूण १ हजार ६२५ हेक्टरवर नुकसान झाले. वर्धा आणि सेलू तालुक्यातील नुकसान ३३ मदतीच्या निकषात बसत नसल्याचे सांगण्यात आले आहे. इतर तालुक्यातील नुकसान मदतीकरिता पात्र ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी कृषी विभागाने सादर केलेला हा अहवाल बदलण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या त्रिस्तरीय सदस्यांकडून पाहणी केल्यानंतर अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अंतिम अहवालानंतरच मदती संदर्भात निर्णय होणार आहे.सर्वाधिक नुकसान हरभऱ्याचेया गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान हरभरा पिकाचे झाले आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ३९६.८० हेक्टरवर हरभऱ्याचे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. १ हजार २७६. ४० हेक्टरवर गव्हाचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. २९१ हेक्टरवर भाजीपाला, १५ हेक्टर तूर आणि ३९ हेक्टरवर फळपिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :Farmerशेतकरी