शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

३२७५.२२ हेक्टरवर नुकसानालाच मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:20 IST

जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला आहे.

ठळक मुद्दे६६०३.७० हेक्टर नुकसान : सर्वाधिक नुकसान कारंजा तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार ६ हजार ६०३.७० हेक्टरवर नुकसान दर्शविण्यात आले आहे. असे असताना मदत मात्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. या निकषात जिल्ह्यातील ३ हजार २७५.२२ हेक्टर क्षेत्र बसत असल्याने इतरांना मात्र नुकसान सहन करावे लागणार आहे.फेब्रुवारी महिन्याच्या ११ ते १४ तारखेपर्यंत जिल्ह्यात गारपीट, वादळी वारा आणि पावसाने चांगलेच थैमान घातले. याचा फटका जिल्ह्यातील तब्बल २२२ गावांना बसला. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तर आर्वी तालुक्यातील पिंपळझरी गाव अक्षरश: उद्ध्वस्त झाले. सध्या रबी हंगाम असून शेतात गहू आणि हरभरा व भाजीपालावर्गीय पिके आहेत. यात पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. पावसासह आलेली गारपीट आणि वारा यामुळे पिकांचे चांगलेच नुकसान झाले. या नुकसानात ३ हजार २२०.५० हेक्टरवरील नुकसान ३३ टक्क्यांच्या आत आहे. यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे दिसून आले आहे.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात कारंजा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात एकूण १ हजार ६२५ हेक्टरवर नुकसान झाले. वर्धा आणि सेलू तालुक्यातील नुकसान ३३ मदतीच्या निकषात बसत नसल्याचे सांगण्यात आले आहे. इतर तालुक्यातील नुकसान मदतीकरिता पात्र ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी कृषी विभागाने सादर केलेला हा अहवाल बदलण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या त्रिस्तरीय सदस्यांकडून पाहणी केल्यानंतर अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अंतिम अहवालानंतरच मदती संदर्भात निर्णय होणार आहे.सर्वाधिक नुकसान हरभऱ्याचेया गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान हरभरा पिकाचे झाले आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ३९६.८० हेक्टरवर हरभऱ्याचे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. १ हजार २७६. ४० हेक्टरवर गव्हाचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. २९१ हेक्टरवर भाजीपाला, १५ हेक्टर तूर आणि ३९ हेक्टरवर फळपिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :Farmerशेतकरी