शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३२७५.२२ हेक्टरवर नुकसानालाच मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:20 IST

जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला आहे.

ठळक मुद्दे६६०३.७० हेक्टर नुकसान : सर्वाधिक नुकसान कारंजा तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार ६ हजार ६०३.७० हेक्टरवर नुकसान दर्शविण्यात आले आहे. असे असताना मदत मात्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. या निकषात जिल्ह्यातील ३ हजार २७५.२२ हेक्टर क्षेत्र बसत असल्याने इतरांना मात्र नुकसान सहन करावे लागणार आहे.फेब्रुवारी महिन्याच्या ११ ते १४ तारखेपर्यंत जिल्ह्यात गारपीट, वादळी वारा आणि पावसाने चांगलेच थैमान घातले. याचा फटका जिल्ह्यातील तब्बल २२२ गावांना बसला. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तर आर्वी तालुक्यातील पिंपळझरी गाव अक्षरश: उद्ध्वस्त झाले. सध्या रबी हंगाम असून शेतात गहू आणि हरभरा व भाजीपालावर्गीय पिके आहेत. यात पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. पावसासह आलेली गारपीट आणि वारा यामुळे पिकांचे चांगलेच नुकसान झाले. या नुकसानात ३ हजार २२०.५० हेक्टरवरील नुकसान ३३ टक्क्यांच्या आत आहे. यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे दिसून आले आहे.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात कारंजा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात एकूण १ हजार ६२५ हेक्टरवर नुकसान झाले. वर्धा आणि सेलू तालुक्यातील नुकसान ३३ मदतीच्या निकषात बसत नसल्याचे सांगण्यात आले आहे. इतर तालुक्यातील नुकसान मदतीकरिता पात्र ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी कृषी विभागाने सादर केलेला हा अहवाल बदलण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या त्रिस्तरीय सदस्यांकडून पाहणी केल्यानंतर अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अंतिम अहवालानंतरच मदती संदर्भात निर्णय होणार आहे.सर्वाधिक नुकसान हरभऱ्याचेया गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान हरभरा पिकाचे झाले आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ३९६.८० हेक्टरवर हरभऱ्याचे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. १ हजार २७६. ४० हेक्टरवर गव्हाचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. २९१ हेक्टरवर भाजीपाला, १५ हेक्टर तूर आणि ३९ हेक्टरवर फळपिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :Farmerशेतकरी