शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत ३२ लाखांचा दंड शासनाच्या तिजोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधिक उपायोजना केल्या जात आहे. त्यानुसारच २३ मार्चपासून तिन्ही उपविभागामध्ये ३६ पथकाव्दारे कारवाईला सुरुवात करण्यात आली असून अद्यापही कायम आहे. आतापर्यंत ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंड वसूल करणे हा प्रशासनाचा मुख्य उद्देश नसून लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.

ठळक मुद्देविदर्भातून वर्धा अव्वल : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोशल डिस्टन्सिंग, हॅण्ड वॉशचा आणि मास्कचा वापर या त्रिसुत्रीवर भर दिल्या जात असून नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील तिन्ही उपविभागात ५६२ गुन्हे दाखल करुन ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना रुग्णांची संख्या कमी ठेवण्यात वर्धा राज्यात अव्वल असताना दंडात्मक कारवाईच्या बाबतीतही विदर्भात वर्धा प्रथमस्थानीच आहे.कोरोना पाय पसरण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करीत जिल्ह्यामध्ये २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. संचारबंदी लागू करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कलम १८८ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला जात आहे. विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे तसेच कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बाहेर जिल्ह्यातून अवैधरीत्या प्रवास करणे, शिथिलेच्या काळात वेळेपूर्वी आणि वेळेनंतरही प्रतिष्ठाने सुरु ठेवणे आदींबाबत धडक मोहीम राबवून पथकांमार्फत कारवाई केली जात आहे.नियमांचे पालन होते की नाही, यावर वॉच ठेवण्यासाठी वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या तीन उपविभागामध्ये ३६ पथके तयार केली. या पथकांनी ३०३ गावांमध्ये भेटी देऊन ५६२ विरुद्ध गुन्हे दाखल करीत ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल केला. अजूनही पोलीस प्रशासन, महसूल विभाग व नगरपालिका यांच्या माध्यमातून कारवाईची प्रक्रीया सुरुच आहे. त्यामुळे हा दंडाचा आकडाही वाढतच जाणार आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधिक उपायोजना केल्या जात आहे. त्यानुसारच २३ मार्चपासून तिन्ही उपविभागामध्ये ३६ पथकाव्दारे कारवाईला सुरुवात करण्यात आली असून अद्यापही कायम आहे. आतापर्यंत ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंड वसूल करणे हा प्रशासनाचा मुख्य उद्देश नसून लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.- नितीन पाटील, उपजिल्हाधिकारी, वर्धा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या