शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

तीन महिन्यांत ३२ लाखांचा दंड शासनाच्या तिजोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधिक उपायोजना केल्या जात आहे. त्यानुसारच २३ मार्चपासून तिन्ही उपविभागामध्ये ३६ पथकाव्दारे कारवाईला सुरुवात करण्यात आली असून अद्यापही कायम आहे. आतापर्यंत ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंड वसूल करणे हा प्रशासनाचा मुख्य उद्देश नसून लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.

ठळक मुद्देविदर्भातून वर्धा अव्वल : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोशल डिस्टन्सिंग, हॅण्ड वॉशचा आणि मास्कचा वापर या त्रिसुत्रीवर भर दिल्या जात असून नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील तिन्ही उपविभागात ५६२ गुन्हे दाखल करुन ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना रुग्णांची संख्या कमी ठेवण्यात वर्धा राज्यात अव्वल असताना दंडात्मक कारवाईच्या बाबतीतही विदर्भात वर्धा प्रथमस्थानीच आहे.कोरोना पाय पसरण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करीत जिल्ह्यामध्ये २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. संचारबंदी लागू करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कलम १८८ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला जात आहे. विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे तसेच कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बाहेर जिल्ह्यातून अवैधरीत्या प्रवास करणे, शिथिलेच्या काळात वेळेपूर्वी आणि वेळेनंतरही प्रतिष्ठाने सुरु ठेवणे आदींबाबत धडक मोहीम राबवून पथकांमार्फत कारवाई केली जात आहे.नियमांचे पालन होते की नाही, यावर वॉच ठेवण्यासाठी वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या तीन उपविभागामध्ये ३६ पथके तयार केली. या पथकांनी ३०३ गावांमध्ये भेटी देऊन ५६२ विरुद्ध गुन्हे दाखल करीत ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल केला. अजूनही पोलीस प्रशासन, महसूल विभाग व नगरपालिका यांच्या माध्यमातून कारवाईची प्रक्रीया सुरुच आहे. त्यामुळे हा दंडाचा आकडाही वाढतच जाणार आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधिक उपायोजना केल्या जात आहे. त्यानुसारच २३ मार्चपासून तिन्ही उपविभागामध्ये ३६ पथकाव्दारे कारवाईला सुरुवात करण्यात आली असून अद्यापही कायम आहे. आतापर्यंत ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंड वसूल करणे हा प्रशासनाचा मुख्य उद्देश नसून लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.- नितीन पाटील, उपजिल्हाधिकारी, वर्धा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या