शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सेवाग्रामच्या विकासासाठी ३१ कोटींची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:33 IST

महात्मा गांधीजींचा सहवास लाभलेल्या सेवाग्राम गावाच्या विकासाकडे शासनाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. सेवाग्राम विकास आराखड्या व्यतिरिक्त सेवाग्राम गावाच्या विकासासाठी ३१ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभुगाव, बरबडी, चितोडा, इंझापूर, सेलूकाटे या गावांचा होणार विकास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींचा सहवास लाभलेल्या सेवाग्राम गावाच्या विकासाकडे शासनाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. सेवाग्राम विकास आराखड्या व्यतिरिक्त सेवाग्राम गावाच्या विकासासाठी ३१ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी सुचविल्याप्रमाणे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पायाभूत सुविधा विकास व सौदर्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.सेवागाम गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २३ कोटी रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आली आहे. सेवाग्राम सोबतच भुगाव, बरबडी, चितोडा, इंझापूर, सेलूकाटे या गावांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर सेवाग्राम गावात ६० लक्ष ४४ हजार रुपयांची पूर सरंक्षणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महात्मा फुले जलभूमी अभियानाअंतर्गत अण्णा सागर तलाव पूनर्भरण व जलसंधारणाची ५ कोटी ५० लाख रुपयांचे काम सुरू आहे. यात ७५ लक्ष ४१ हजार रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. सेवाग्राम मधील मुळ गावठाणाचा विकास करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने सुचविलल्याप्रमाणे आराखड्याअंतर्गत कस्तुरबा चौक ते आश्रमपर्यंत नाली बांधकाम, फुटपाथ, सायकल ट्रॅक, विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे. सेवाग्राम विकास आराखड्याशिवाय सुद्धा सेवाग्राममध्ये विकास कामे सुरू आहेत. नागरिकांच्या मागणीप्रमाणे गावातील इतर विकास कामे सुद्धा वर्षभरात पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम