शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

३०० किमीचे पांदण रस्ते सुधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:40 IST

शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अनेक पांदण रस्ते गत वर्षी मोकळे केले आहेत. २०१७ मध्ये २५ टक्के शेतकऱ्यांचा वाटा घेत मागेल त्याला पांदण रस्ता असा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन ५० किमी पर्यंतचे पांदण रस्ते सुस्थितीत केले आहेत.

ठळक मुद्देव्याप्ती वाढवणार : जिल्हाधिकारी नवाल यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अनेक पांदण रस्ते गत वर्षी मोकळे केले आहेत. २०१७ मध्ये २५ टक्के शेतकऱ्यांचा वाटा घेत मागेल त्याला पांदण रस्ता असा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन ५० किमी पर्यंतचे पांदण रस्ते सुस्थितीत केले आहेत. सध्या स्थितीत ११७ अर्ज प्रलंबित असून २०१८ मध्ये ३०० किमीपर्यंतचे पांदण रस्ते सुस्थितीत करण्याचा आमचा मानस जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.नवाल पुढे म्हणाले, २०१७ मध्ये रूरल मॉल, जलयुक्त शिवार आदी विविध उल्लेखनिय कार्य जिल्ह्यात झाली आहेत. सध्या रूरल मॉलमधून नफा मिळत नसला तरी त्यात काय सुधारणा हवी याचा विचार आम्ही करणार आहोत. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून त्याची प्रभावी अंमलबजाणी नवीन वर्षात होणार आहे. अंगठा लावा गावातच पैसे मिळवा असा उद्देश ठेऊन आधारचा वापर करून गावातच वयोवृद्ध व पेंशनर आणि नागरिकांना त्यांच्या बँक खात्यातील दोन हजारांपर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे.शेतकरी निर्मिती कंपनी, प्लास्टिक निर्मूलनासाठी विशेष कार्य केले जाणार आहे. शिवाय शेळीपाल, दुग्ध व्यवसाय, मत्स्य, रेशीम शेती आदी शेतीपुरक व्यवसायाला चालणा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील माता व बालमृत्यू दर सध्या १२ असून तो शुन्य कसा होईल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जलयुक्त शिवाराची जिल्ह्याची दोन मॉडेल राज्य शासनाने ग्राह्य धरली आहेत. या दोन्ही मॉडेलला केंद्रस्थानी ठेऊन तशा पद्धतीची कामे राज्यभरात होणार आहेत.सरत्या वर्षांत शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार २० शेतकऱ्यांना तसे साहित्य पुरविण्यात आले होते. यंदा यात वाढ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, या प्रकारातून नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविण्यासंदर्भातही ते म्हणाले.सध्या वर्धा शहरात ग्रीन जीम उभा झाला आहे. तसाच ग्रीन जीम जिल्ह्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये व्हावा, या दिशेने सन २०१८ मध्ये प्रयत्न केले जाणार असल्याचेही यावेळी शैलेश नवाल यांनी सांगितले. य पत्रकार परिषदे दरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या विविध विकास कामांच्या घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले.